<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158</id><updated>2012-01-12T03:11:20.624+05:30</updated><title type='text'>महाभारत - काही नवीन विचार</title><subtitle type='html'>महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>96</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-8159542908352115208</id><published>2011-08-09T22:34:00.001+05:30</published><updated>2012-01-12T03:11:20.638+05:30</updated><title type='text'>महाभारताबाबत काही गैरसमजुती भाग ६</title><content type='html'>’सौभद्र’ हे मराठीतील एक गाजलेले व सदा लोकप्रिय नाटक आहे. अजूनहि कधीतरी त्याचे प्रयोग होतात. नाटकाची अन त्यातील पदांची मोहिनी अजून कायम आहे. मात्र या नाटकामुळे एक मोठा गैरसमज निर्माण झाला आहे ज्याला महाभारतात काही आधार नाही!&lt;br /&gt;नाटकातील कथानकाप्रमाणे अर्जुन-सुभद्रा यांचे बालवयापासून परस्पर प्रेम होते, अर्जुन तीर्थयात्रेला गेलेला असताना बलराम सुभद्रा दुर्योधनाला द्यायचे ठरवतो, सुभद्रा हवालदिल होते, अर्जुनाचा ठावठिकाणा नसल्यामुळे कृष्णालाहि काय करावे सुचत नाही. पण मग अर्जुन तीर्थयात्रेनिमित्तने भटकत द्वारकेच्या जवळ आल्याचे कृष्णाला कळते व मग अनेक गमतीचे बेत रचून अखेर कृष्ण सुभद्र-अर्जुनाचा विवाह घडवून आणतो! नाटकाची रचना सुरेखच आहे यात शंकाच नाही! मात्र महाभारतात असे काही नाही!&lt;br /&gt;महाभारताप्रमाणे अर्जुन सुभद्रा यांचे बालवयापासून काही ’रहस्य’ नव्हते. कधी गाठभेट झाल्याचेहि उल्लेख नाहीत. पांडव कृष्ण-बलराम यांची प्रथम प्रत्यक्ष भेट द्रौपदीच्य़ा स्वयंवर-मंडपात झालेली वर्णिली आहे. पांच पांडवांचे द्रौपदीशी विवाह झाले, मग त्यानी खांडवप्रस्थ वसवून तेथे राज्य करण्यास सुरवात केली. अर्जुनाने युधिष्ठिर-द्रौपदी याचा एकांतभंग केला म्हणून पांडवांनी स्वत:च केलेल्या नियमाप्रमाणे त्याला तीर्थयात्रेला जावे लागले. (माझ्या मते, ‘स्वयंवराचा पण मी जिंकला, मात्र द्रौपदी पाचांची पत्नी झाली आतां युधिष्ठिर, भीम यांच्या नंतर ज्येष्ठता क्रमाने ती माझ्या वाट्याला येणार कधी?’ असा वैताग येऊन त्याने रस्ता सुधारला व आपली सोय पाहिली!) त्याने ब्रह्मचर्य पाळावे अशीहि अट खरे तर होती पण त्याने ते मुळीच पाळले नाही! उलुपी, चित्रांगदा अशी एकेक ‘प्रकरणे’ करीत तो काही काळाने द्वारकेला आला. यादव समुदायात सुखाने काही काळ काढत असताना कृष्णासमवेत असताना एकदा सुभद्रा त्याचे नजरेस पडली. त्याने कृष्णाला विचारले ‘कोण रे ही?’ कृष्णाने म्हटले ‘अरे ही माझी सावत्र बहिण सुभद्रा’ &lt;br /&gt;अर्जुनाचे मन सुभद्रेवर गेलेले ओळखून कृष्णाने विचारले की ‘ही तुला आवडली आहे काय?’ अर्जुनाने कबूल केल्यावर कृष्णाने सल्ला दिला की ‘हिचा आतां विवाह करावयाचा आहे पण स्वयंवर योजले तर तेव्हा ही कोणाला वरील याचा काय भरवसा? तू हिला संधी पाहून पळवून ने. क्षत्रियाना मुलगी पळवून नेऊन केलेला ‘राक्षस विवाह’ शास्त्रसंमत आहे.’ &lt;br /&gt;मग योग्य संधी पाहून अर्जुनाने सुभद्रेला रथात घालून पळवून नेले! सर्व यादव वीर रागाने खवळून जाऊन युद्धाला तयार होऊ लागले पण कृष्ण ‘थंड’ बसलेला पाहून बलरामाने म्हटले कीं ‘अरे त्या कृष्णाचे काय मत ते तरी विचारा.’ तेव्हा कृष्णाने सल्ला दिला ‘युद्धाला उभे राहण्यापूर्वी जरा विचार करा. गाठ अर्जुनाशी आहे, कोणा सोम्यागोम्याशी नव्हे. निभाव लागला नाहीं म्हणजे अब्रू जाईल. अर्जुनापेक्षा चांगला पती सुभद्रेला मिळेल काय? तेव्हा झाले आहे ते चांगलेच आहे. दोघाना बोलावून आणून सन्मानाने त्यांचा विवाह करून द्यावा आणि यादव-पांडवांचे सख्य साधावे.’ हे सर्वांना पटले व तसेच झाले. या सर्व कथेत दुर्योधनाचे नाव कुठेच आलेले नाहीं. &lt;br /&gt;तेव्हा सौभद्र नाटक छानच आहे. पण महाभारताबद्दल तो एक मोठाच गैरसमज!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-8159542908352115208?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/8159542908352115208/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=8159542908352115208' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8159542908352115208'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8159542908352115208'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/08/blog-post.html' title='महाभारताबाबत काही गैरसमजुती भाग ६'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-2146510658595083795</id><published>2011-07-18T19:03:00.000+05:30</published><updated>2011-07-18T19:03:49.018+05:30</updated><title type='text'>महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ५</title><content type='html'>नरो वा कुंजरो वा।&lt;br /&gt;हे आपण बाळपणापासून ऐकत आलो. असे खोटे वाक्य बोलल्यामुळे चार बोटे अधांतरी चालणारा युधिष्ठिराचा रथ पंक्चर होऊन जमिनीवर टेकला अशीहि हरदासी कथा आपण ऐकत आलो. पण महाभारतात असे वाक्यच नाही! &lt;br /&gt;हा उलगडा मलाहि हल्लीच वाचलेल्या श्री. जातेगांवकर यांच्या एका पुस्तकावरून झाला. &lt;br /&gt;भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला व चौथ्या दिवशी जयद्रथवध झाल्यावर पांचव्या दिवशी द्रोण फार त्वेषाने युद्ध करू लागला व त्या दिवशी पांडव व पांचाल यांचा विध्वंस त्याने आरंभला. तो कोणालाच, अर्जुनाला देखील आवरेना. कृष्णाने अखेर पांडवांना सावध केले कीं असेच युद्ध चालले तर दिवस अखेर तुम्ही पूर्ण नष्ट व्हाल. तेव्हां काहीहि करून याला युद्धत्याग करण्यास उद्युक्त केले पाहिजे. कृष्ण व भीमाने एक कुटिल बेत ठरवला. भीमाने प्रथम एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि द्रोणापाशी जाऊन ’अश्वत्थामा हत:’ असे पुन्हापुन्हा त्याला म्हणाला! आपला पुत्र मारला गेला यावर द्रोणाचा विश्वासच बसेना पण पुन्हापुन्हा ऐकल्यावर खात्री करून घेण्यासाठी तो युधिष्ठिरापाशी आला. असे होईल याची कल्पना असल्यामुळे कृष्ण व भीम यानी युधिष्ठिराला विनवले होते कीं ‘तूं होय म्हण!’ भीमाने त्याला सांगितले कीं मी अश्वत्थामा हत्ती खरोखरीच मारला आहे. असत्य बोलण्यास युधिष्ठिर सहजीं तयार होणेच शक्य नाही याची कृष्ण व भीमाला भीति होती. पण हत्ती कां होईना, अश्वत्थामा मारला गेला आहे या आधारावर युधिष्ठिराने मनाशी तडजोड केली आणि द्रोणाने जेव्हां विचारले कीं &lt;b&gt;’किं अश्वत्थामा हत:? ’&lt;/b&gt;, तेव्हा जबाब दिला &lt;b&gt;’हत:, कुंजर:’&lt;/b&gt; ! जबाब देताना &lt;b&gt;कुंजर:&lt;/b&gt; हा शब्द हळू व तोंड चुकवून उच्चारला जेणेकरून तो द्रोणाला ऐकू जाऊ नये!&lt;br /&gt;द्रोणाला युधिष्ठिराचा ’हत:’ एवढाच शब्द ऐकू गेला व त्याचे मनोधैर्य खचले. काही काळाने त्याने धनुष्य खाली ठेवले आणि मग त्याचा वध झाला. कृष्ण-भीमाचा हेतू साध्य झाला पण खोटे बोलल्याचा डाग युधिष्ठिराला लागला नाहीं! कारण &lt;b&gt;‘हत:, कुंजर:’&lt;/b&gt; हे सत्यच होते! त्याने &lt;b&gt;‘नरो वा कुंजरो वा’ &lt;/b&gt;म्हटले असते तर ते मात्र असत्य भाषण ठरले असते कारण युधिष्ठिराला नर अश्वत्थामा मारला गेलेला नाहीं हे पक्के ठाऊक होते! कृष्ण आणि भीम खरे हुशार म्हटले पाहिजेत. आपल्याला पाहिजे ते त्यांनी युधिष्ठिराकडून बरोबर वदवून घेतले!  आपण मात्र अजूनही ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत असतो! पण तो गैरसमजच!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-2146510658595083795?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/2146510658595083795/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=2146510658595083795' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2146510658595083795'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2146510658595083795'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/07/blog-post_18.html' title='महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ५'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-7589012579446322371</id><published>2011-07-13T10:51:00.001+05:30</published><updated>2011-07-13T10:52:27.051+05:30</updated><title type='text'>महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ४</title><content type='html'>&lt;b&gt;धृतराष्ट्राला युद्धदर्शन&lt;br /&gt;&lt;/b&gt;कौरव-पांडव युद्ध सुरू होण्यापूर्वी धृतराष्ट्राला, आपल्याला युद्धवार्ता कशा कळतील असे वाटत होते. संजयाला दिव्य दृष्टि देऊन कृष्णाने त्याला धृतराष्ट्राशेजारीच बसून सर्व युद्ध पाहता येईल असे केले व मग संजयाने ’आंखों देखा हाल’ धृतराष्ट्राला रोजच्या रोज सांगितला अशी समजूत असते. कृष्णाने कौरवदरबारात विश्वरूपदर्शन घडवले तेव्हां धृतराष्ट्राला व गांधारीला ते दिसावे म्हणून दिव्य दृष्टि दिली होती (खरेखोटे देव जाणे) त्यामुळे अशी समजूत होते.&lt;br /&gt;प्रत्यक्षात दिव्यदृष्टि व्यासानी दिली होती आणि धृतराष्ट्राला नव्हे तर संजयाला दिली होती असे महाभारतात म्हटले आहे. मात्र १८ दिवसांच्या युद्धवर्णनांत काही वेळा संजय स्वत: युद्धभूमीवर होता असा स्पष्ट उल्लेख आहे. युद्धवर्णनहि १८ दिवसांचे अलगअलग नसून चार सरळ भागात आहे. पहिला भाग भीष्मपतनापर्यंतच्या दहा दिवसांचा, मग दुसरा भाग द्रोणवधापर्यंतच्या पांच दिवसांचा, तिसरा भाग कर्णवधापर्यंतच्या दोन दिवसांचा व अखेरचा भाग शेवटच्या दिवशी शल्यवध व दुर्योधन-भीम गदायुद्ध झाले तोपर्यंतचा असे चार भागात युद्धवर्णन संजयाने धृत्रराष्ट्राला ऐकवलेले आहे.&lt;br /&gt;संजयाचे वर्णन तो स्वत: सर्व घटना पाहत असल्याप्रमाणे आहे. दिव्यदृष्टि वगैरे अद्भुत कल्पना सोडून दिल्या तर असे मानावे लागते कीं हल्ली युद्धात जसे वार्ताहराना वा टी. व्ही. ला वा रेड-क्रॉसला संरक्षण असते तसे संजयाला असावे व त्यामुळे त्याला युद्धभूमीवर सर्वत्र फिरतां येत होते व घटना पाहतां येत होत्या. त्यामुळे त्याचे वर्णन प्रत्यक्षदर्शी झाले आहे. चार महत्वाच्या टप्प्यांवर युद्धभूमि सोडून धृतराष्ट्रापाशी परतून त्याने झालेल्या घटना वर्णिल्या आहेत. तेव्हा दिव्यदृष्टि ही एक गैरसमजूतच!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-7589012579446322371?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/7589012579446322371/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=7589012579446322371' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7589012579446322371'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7589012579446322371'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/07/blog-post_13.html' title='महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ४'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-4751791324572423596</id><published>2011-07-06T20:30:00.000+05:30</published><updated>2011-07-06T20:30:03.444+05:30</updated><title type='text'>महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग 3</title><content type='html'>भारतीय युद्धाचे वेळीं अभिमन्यु काय वयाचा होता?&lt;br /&gt;हा प्रश्न विचारला असतां महाभारताशी कमीजास्त परिचय असलेल्या बहुतेकांचे उत्तर १७-१८ वर्षांचा नवतरुण होता असें येईल. पण हें बरोबर आहे का?&lt;br /&gt;थोडासा विचार केला तर लक्षात येईल कीं हें शक्य नाहीं. पहा बरें! अभिमन्यूच्या जन्मानंतरच द्रौपदीच्या पांच पुत्रांचा जन्म झाला असें महाभारतच म्हणते. अर्थातच द्रौपदीचा  सर्वात लहान पुत्र (सहदेवाचा) अभिमन्यूपेक्षा ७-८ वर्षांनी तरी नक्कीच लहान होता. राजसूय यज्ञाचे वेळी द्रौपदी अगदीच लेकुरवाळी होती असें महाभारत म्हणत नाही, म्हणजे हा पुत्र २-३ वर्षांचा तरी झाला होता असे मानणे भाग आहे म्हणजे अभिमन्यु निदान १० वर्षांचा झालेला होता! राजसूय यज्ञानंतर काही महिन्यांचा काळ दुर्योधनाचे व शकुनीचे कुटिल बेत ठरून व धृतराष्ट्राची त्याला मान्यता मिळण्यात गेला. मग द्यूत झाले आणि त्यानंतर १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात गेले. अर्जुन प्रगट झाला तेव्हा ग्रीष्म ऋतु चालू होता असे भीष्माने स्पष्ट म्हटलेले आहे. त्यानंतर  कार्तिक अमावास्येपर्यंतचा काळ - सहा महिने  - कृष्णशिष्टाईपर्यंत व युद्धाला सुरवात होईपर्यंत गेला. तेव्हा युद्धाचे वेळी अभिमन्यु कमीतकमी २४ वर्षांचा नक्कीच झाला होता. द्रौपदीचे सर्व पुत्र युद्धात लढले होते व शेवटच्या दिवशी अश्वत्थाम्याकडून मारले गेले. त्या सर्वाना भीष्माने रथी ठरवले होते. द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र युद्धात सक्रीय भाग घेत होता तेव्हां तो १७-१८ वर्षांचा तरी असला पाहिजे हेहि अभिमन्यूच्या वयाशी व दोघांच्या वयातील फरकाशी जुळते. अज्ञातवासात विराटाची कन्या अर्जुनापाशी नृत्य शिकत होती व ती लहान होती असा उल्लेख असल्यामुळे (तिने आपला भाऊ उत्तर याला कौरवांची उची वस्त्रे मला बाहुल्या करण्यासाठी घेऊन ये असे म्हटले होते व अर्जुनाने कौरववीरांचा पराभव केल्यावर उत्तराकडून तसे करून घेतले)आणि तिचा अभिमन्युशी अज्ञातवास संपल्यावर लगेचच विवाह झाला तेव्हा तोही नवतरुण - १८ वर्षांचा - होता असा गैरसमज आपण करून घेतो! पण तो गैरसमजच! प्रत्यक्षात द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र १७-१८ वर्षांचा व अभिमन्यु २४-२५ वर्षांचा होता हे खरे!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-4751791324572423596?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/4751791324572423596/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=4751791324572423596' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4751791324572423596'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4751791324572423596'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/07/3.html' title='महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग 3'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-8571390034476112022</id><published>2011-07-03T10:27:00.000+05:30</published><updated>2011-07-03T10:27:43.608+05:30</updated><title type='text'>महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग २</title><content type='html'>‘दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्’&lt;br /&gt;कर्णाच्या तोंडचे हे वाक्य फार प्रसिद्ध आहे. उत्तम कुलात जन्म न लाभलेल्या पण असाधारण कर्तबगारी अंगी असलेल्या अनेक व्यक्तीना या वाक्याने स्फूर्ती दिली असेल. ही उक्ती महाभारतात असणार अशी आपली ठाम समजूत असते. मात्र महाभारतात शोधू गेले असता हे वाक्य सापडत नाहीं!&lt;br /&gt;हे महाभारतातील वचन नाहीच मग सापडणार कसे? ‘वेणीसंहार’ नावाच्या संस्कृत नाटकात कर्ण आणि अश्वत्थामा यांच्या कलहाचा एक जोरदार प्रवेश आहे. त्यात अश्व्त्थाम्याने कर्णाला सूतपुत्र म्हणून हिणवल्यावर कर्णाने त्याला हे प्रत्युत्तर दिले आहे.  पूर्ण श्लोक असा आहे –&lt;br /&gt;सूतोSवा सूतपुत्रोSवा यो वा को वा भवाम्यहम् |&lt;br /&gt;दैवायत्तम् कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्  ||&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-8571390034476112022?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/8571390034476112022/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=8571390034476112022' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8571390034476112022'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8571390034476112022'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/07/blog-post.html' title='महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग २'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-4581394833408564682</id><published>2011-06-30T21:48:00.000+05:30</published><updated>2011-06-30T21:48:17.983+05:30</updated><title type='text'>महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग १</title><content type='html'>काही शब्दप्रयोग आपल्या कानावर बालपणापासून पडत आलेले आहेत आणि त्यामुळे ते खरेच आहेत असे आपण गृहीत धरतो. पण ते गैरसमजुतीवर आधारलेले असतात. &lt;br /&gt;१. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ – &lt;br /&gt;जयद्रथ वधाचे दिवशी कृष्णाने काहीतरी उपायाने काही काल सूर्य दिसणार नाहीं असें केले. मग जयद्रथ ‘आपण आतां वाचलो’ असें समजून गैरसावध झाला. कौरव वीरही गैरसावध झाले. जयद्रथ अर्जुनासमोर आल्यावर कृष्णाने सूर्यासमोरचे आच्छादन अचानक काढून घेतले व अर्जुनाला म्हटले ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ मग लगेच अर्जुनाने जयद्रथाला बाण सोडून मारले. अशी कथा बालपणापासून हरदास पुराणिक आपल्याला सांगत आले. आणि ती आपण खरी मानत आलो! &lt;br /&gt;महाभारतात असें काही नाहीं. प्रत्यक्षात काय घडले याचे विस्तृत विवेचन मी पूर्वी केलेच आहे. अर्जुनाने अखेरचा बाण मारून जयद्रथाचा वध केला तोपर्यंत तो स्वत:च्या रथावर बसून जमेल तसा अर्जुनाचा प्रतिकार करत होता कृष्णाने अर्जुनाला सावध केले कीं ‘सूर्य अस्ताला जाण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा वेळ फुकट घालवू नकोस.’ मग अर्जुनाने तो अखेरचा बाण सोडला व जयद्रथाचा वध केला. त्यानंतरही काही काळ युद्ध चालू राहिले व मग सूर्यास्त झाला. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ असें शब्द महाभारतात कृष्णाच्या तोंडी मुळीच आलेले नाहीत. आपले गैरसमज मात्र पक्के असतात त्यामुळे यां शब्दांना साहित्यात व व्यवहारातही अनेकदां स्थान मिळते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-4581394833408564682?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/4581394833408564682/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=4581394833408564682' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4581394833408564682'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4581394833408564682'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/06/blog-post.html' title='महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग १'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-6577633987661583784</id><published>2011-05-19T20:53:00.004+05:30</published><updated>2011-05-20T09:47:13.269+05:30</updated><title type='text'>अभिमन्युवध - भाग ८</title><content type='html'>दिवस मावळला. सैन्ये शिबिरात परतलीं. त्यानंतर संशप्तकांकडून कॄष्ण व अर्जुन परत आले असे महाभारत म्हणते. पांडव शिबिरात सामसूम व शोक पाहून काय झाले ते अर्जुनाने विचारले व मग नाइलाजाने युधिष्ठिराने अभिमन्यु मारला गेल्याचे अर्जुनाला सांगितले. त्याने अर्जुनाला सांगितलेली हकिगत व आधीच्या लेखात दिलेली हकीगत यात किरकोळ विसंगति दिसते. युद्धाच्या सुरवातीला पांडववीरानी संयुक्तपणे द्रोणावर हल्ला केल्याचे व तो द्रोणाने परतवून लावल्याचे युधिष्ठिर सांगत नाही. तो म्हणाला, ’मला पकडण्याचा द्रोणाने शर्थीचा प्रयत्न केला आणि त्याचाच प्रतिकार आम्हाला जड पडत होता मग सैन्याचा मुख्य चक्रव्यूह कोण तोडणार हा प्रष्न होता. नाइलाजाने ते काम अभिमन्यूवर सोपवावे लागले कारण त्यालाच ते माहीत होते. त्याने व्यूह तोडल्यावर त्याच वाटेने त्याच्या पाठोपाठ जाऊन त्याचे रक्षण करण्याचे आमचे सर्व प्रयत्न जयद्रथामुळे विफल झाले आणि अभिमन्यु एकटाच व्यूहात सापडला. मग द्रोण, कृप, अश्व्त्थामा, कर्ण, बृहत्बल व कृतवर्मा यांनी त्याला घेरले आणि अखेर दु:शासनपुत्राकडून तो मारला गेला.’&lt;br /&gt;अर्जुन संशप्तकांकडे अडकलेला असो वा माझ्या शंकेप्रमाणे शिबिरातच असो, पण एक दिवस तो नसताना त्याचा पुत्र मारला गेला. अर्जुनाने, जणू, जयद्रथाला या अनर्थाला जबाबदार धरून, ’उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर अग्निकाष्टे भक्षण करीन’ अशी घोर प्रतिज्ञा अचानक केली. प्रत्यक्षात अभिमन्यूला घेरणार्‍या सहाही वीरांना सोडून (त्यातील बृहत्बलाला अभिमन्यूनेच मारले होते.) जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने कां केली हे एक जरासे कूट आहे. आपले हरदास-पुराणिक म्हणत कीं अर्जुन आणि कृष्ण रणात अभिमन्युचा शोध घेत फिरत होते व मरणासन्न अभिमन्यूने त्याना सर्व हकीगत स्वत:च सांगितली. रणात पडलेल्या अभिमन्यूला जयद्रथाने लाथ मारली हे अभिमन्यूकडून ऐकून चिडून अर्जुनाने त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. महाभारतात असें काही मुळीच नाही. थोडा विचार केल्यावर अर्जुनाच्या प्रतिज्ञेचा मला असा खुलासा सुचतो कीं कौरववीरांनी अनेकांनी मिळून एकट्या पडलेल्या अभिमन्युचा वध केला तर आतां त्या सर्वांना अर्जुनाचे हे एक निर्वाणीचे आव्हान होते कीं ‘मी जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे, ती माझ्या एकट्याच्या बळावरच विसंबून. अभिमन्यु एकटाच होता त्याला तुम्ही सर्वानी मिळून मारलेत, आता तुमच्यात बळ असेल तर सर्वांनी मिळून जयद्रथाला एकट्या माझ्यापासून वांचवा!’ पुत्राच्या मृत्यूमुळे त्याला अनिवार शोक झाला असणारच तेव्हा आता एक तर कौरववीरांचा नक्षा उतरवणे किंवा स्वत: मरून जाणेच श्रेयस्कर असे त्याला वाटणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. दुसर्‍या दिवशी काय घडले याचा विस्तृत परामर्ष मी पूर्वीच जयद्रथवध प्रकरणात घेतला आहे. तो वाचकानी अवश्य पुन्हा नजरेखालून घालावा. अनेकांनी मिळून केलेला अभिमन्यूचा वध कौरवपक्षाला फार महाग पडला व दिवस अखेर पांडवपक्षाची अंतिम विजयाकडे वाटचाल सुरू झाली एवढेच म्हणून हा विषय पुरा करतों.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-6577633987661583784?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/6577633987661583784/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=6577633987661583784' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6577633987661583784'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6577633987661583784'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/05/blog-post_19.html' title='अभिमन्युवध - भाग ८'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-383181447581890615</id><published>2011-05-16T12:40:00.001+05:30</published><updated>2011-05-16T13:06:26.003+05:30</updated><title type='text'>अभिमन्युवध - भाग ७</title><content type='html'>जयद्रथाला मिळालेल्या वराची हकीगत पांडव पक्षाच्या वीराना व्यूहात शिरण्यात आलेल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी रचली असावी असा संशय येतो! जयद्रथाला स्वप्नात शंकराने वर दिला असें म्हटले आहे त्यामुळे असें वाटते. काही असो, अभिमन्यु चक्रव्यूहात एकटा अडकला. त्याने दिवसभर कोरवांच्या पक्षाच्या एकाही महावीराला दाद दिली नाही. अनेकजण मिळून चालून आले तरीहि त्याने त्याना पळवले. त्याने कोणाकोणाला मारले याची मोठी यादी होईल. अखेर द्रोणाचा सल्ला मानून कर्णाने पुन्हा अभिमन्यूवर चाल केली आणि अखेर त्याचे धनुष्य तोडले. महाभारतातील युद्धवर्णनात अनेक वीरांचीं धनुष्ये अनेकवार तोडली गेल्याचे उल्लेख येतात. त्याला अपवाद फक्त अर्जुनाचा! त्याचे गांडीव धनुष्य मात्र कधीहि तोडले गेल्याचा उल्लेख मिळत नाही. कर्णाजवळ गांडीवधनुष्याच्या तोडीचे धनुष्य होते असे म्हटलेले आहे मात्र त्याचे धनुष्य जयद्रथवधाचे दिवशी भीमाने मोजून सतरा वेळां तोडले असे वर्णन आहे. सात्यकी, अभिमन्यु आणि इतर अनेकांनीहि ते तोडले. धनुष्य तोडणे याचा अर्थ प्रत्यंचा तोडणे असाहि कदाचित असेल! &lt;br /&gt;अभिमन्यूचे धनुष्य तुटले, सारथी मेला, घोडे मेले. मग हाताशी मिळेल त्या आयुधाने त्याने युद्ध चालूच ठेवले. अखेर सर्व संपल्यावर दु:शासनाचा पुत्र व अभिमन्यु यांचे गदायुद्ध झाले, दोघे मूर्छित पडले मात्र दु:शासनपुत्र आधी शुद्धीवर आला व त्याने गदेच्या प्रहाराने अभिमन्यूची अखेर केली. दिवस संपत आलेला होता. त्यामुळे युद्ध संपवून दोन्ही सैन्ये माघारीं फिरलीं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-383181447581890615?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/383181447581890615/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=383181447581890615' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/383181447581890615'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/383181447581890615'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/05/blog-post_16.html' title='अभिमन्युवध - भाग ७'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-5706329734293387313</id><published>2011-05-11T19:46:00.002+05:30</published><updated>2011-05-11T19:53:08.551+05:30</updated><title type='text'>अभिमन्युवध - भाग ६</title><content type='html'>कौरवपक्षाचे अनेक महावीर अभिमन्यूवर चालून आले. कर्णासह सर्वांना अभिमन्यूने अनेकवार चकमकींत हरवून पळवून लावले. शल्याला हरवल्यावर त्याचे सैन्य पळून जाऊ लागले तेव्हां त्याच्या भावाने ते सावरून धरले. मात्र अभिमन्यूने त्याच्यावर हल्ला चढवून त्यालाच मारले. अभिमन्यूचा पराक्रम पाहून द्रोण त्याचे कौतुक करू लागला तेव्हा दुर्योधनाला राग येऊन तो द्रोणाला म्हणाला कीं ’त्याचे कौतुक कसले करता? तो कोणालाच आवरत नाहीं. त्याच्या वधाचा उपाय सांगा.’ तेव्हा द्रोणाने म्हटले कीं ’त्याच्या हातातले धनुष्य चालू आहे तोंवर आपल्या कोणाही वीराला तो दाद देणार नाही. एकजुटीने हल्ला करूनहि तुमचा निभाव लागत नाही. तेव्हा प्रयत्नपूर्वक त्याचे धनुष्य तोडा!’ अभिमन्युपुढे कोणीच उभा राहूं शकत नव्हता. कर्णालाहि त्याने पुन्हापुन्हा पळवून लावले. त्याच्या भावाला अभिमन्यूने मारले. एक उल्लेख आहे कीं ’एक जयद्रथ सोडला तर इतर कोणाचेच काही चालत नव्हते’ मात्र प्रत्यक्षात जयद्रथ व अभिमन्यूचे युद्ध झालेले अजिबात वर्णिलेले नाही! &lt;br /&gt;अभिमन्यु चक्रव्यूहात एकटाच शिरला अशी समजूत आहे. एके ठिकाणी मात्र असाही उल्लेख संजयाच्या वर्णनात आहे कीं ’युधिष्ठिर, भीम, शिखंडी, सात्यकी, धृष्टद्युम्न व इतर अनेक अभिमन्यूच्या मार्गाने गेले व त्याच्या भोवती संरक्षक कडे करून त्यानी कौरवांचा पाठलाग केला, मात्र मग त्या सर्वांना जयद्रथाने अडवले'एके ठिकाणी असाहि उल्लेख आहे कीं ’अभिमन्यूच्या सारथ्याने व्यूहात पडलेल्या भगदाडातून कौशल्याने त्याचा रथ बाहेर काढला व पांडवानी त्याचा जयजयकार केला.’ मात्र हे क्षणिक उल्लेख सोडले तर अभिमन्यु एकटाच चक्रव्यूहात शिरला आणि त्याने उघडून दिलेल्या वाटेने इतर पांडववीर व्यूहात शिरण्याचा प्रयत्न करीत असताना एकट्या जयद्रथाने त्यान यशस्वीपणाने अडवून धरले असेच महाभारत म्हणते. त्याला वर मिळाला होता कीं ’युद्धात कोणत्यातरी एका दिवशी अर्जुन सोडून इतर सर्व पांडवाना तूं अजिंक्य ठरशील.’ हा वर त्याने जेव्हा पांडव वनात असताना द्रौपदीला एकटी असताना पळवण्याचा प्रयत्न केला होता व मग पांडव परत आल्यावर भीमार्जुनानी तिला सोडवून मग त्याची भयानक अप्रतिष्टा केली होती तेव्हा चिडून जाऊन तप:चर्या करून मिळवला होता असे महाभारत म्हणते. यात गोम अशी आहे कीं या वरामध्ये सात्यकी किंवा धृष्टद्युम्न किंवा पांडवाकडील इतर रथी-महारथी यांचा समावेश कुठे होता? मग त्यांचेहि जयद्रथापुढे कां चालले नाही? महाभारत याचा खुलासा करत नाही! अर्थ इतकाच घ्यावयाचा कीं Every dog has his day या उक्तीप्रमाणे हा जयद्रथाचा दिवस होता! त्यामुळे अभिमन्यूच्या मदतीला कोणीहि व्यूहात शिरू शकले नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-5706329734293387313?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/5706329734293387313/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=5706329734293387313' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5706329734293387313'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5706329734293387313'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/05/blog-post_11.html' title='अभिमन्युवध - भाग ६'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-863289868879823878</id><published>2011-05-01T12:02:00.001+05:30</published><updated>2011-05-14T09:43:08.732+05:30</updated><title type='text'>अभिमन्युवध भाग ५</title><content type='html'>संजयाने सर्व १८ दिवसांच्या युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकविले हे सर्व ज्ञात आहे. त्याचेसाठी कृष्णाने त्याला दिव्यदृष्टि दिली होती, तो सर्ववेळ धृतराष्ट्रापाशी बसून युद्धाचा ’आंखों देखा हाल’ त्याला ऐकवत होता, अशी एक भोळसट हरदासी समजूत आहे. प्रत्यक्षात तसे काही नाही. संजय प्रत्यक्ष युद्धभूमीवरच उपस्थित होता असे अनेक उल्लेख युद्धवर्णनात आहेत. शेवटच्या दिवशी तर त्याने स्वत: युद्धातहि भाग घेतला! मात्र त्याचे आधी, त्याला युद्धभूमीवर कोठेहि फिरण्यास आडकाठी करू नये असे दोन्ही पक्षानी मान्य केले असावे. आजहि वृत्तपत्रे वा रेडिओ-टीव्ही याना असे स्वातंत्र्य असते. त्याने, भीष्म पडल्यावर, द्रोण मारला गेल्यावर, कर्णाचा मृत्यु झाल्यावर व अखेरच्या दिवशी, अशा चार टप्प्यात युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला प्रथम संक्षिप्त व पुन्हा खुलासेवार असे ऐकवले असे महाभारतच म्हणते! पण कृष्णाला देवाचा अवतार बनवणाराना कोण आवरणार?&lt;br /&gt;या दिवसाचे युद्धवर्णनहि व्यासानी संजयाच्या तोंडून धृतराष्ट्राला ऐकवले आहे. युद्धाला तोंड लागले तेव्हां चक्रव्यूहाच्या पुढे द्रोण स्वत:, जयद्रथ, अश्वत्थामा, शकुनि, शल्य व भूरिश्रवा हे पांडवांना सन्मुख सज्ज होते. द्रोणाने युधिष्ठिरावर आक्रमण करण्यापूर्वीच पांडवांच्या प्रमुख वीरांनी द्रोणावरच हल्ला केला. मदतनिसांच्या सहाय्याने द्रोणाने त्याना यशस्वीपणे तोंड दिले. आता आपल्या वीरांची परवा न करतां द्रोण आपल्यावरच कोसळेल असे दिसल्यामुळे (अर्जुन अर्थातच जवळ नव्हताच), नाइलाजाने युधिष्ठिराने अभिमन्यूला द्रोणावर आक्रमण करण्यास सोडले. हा वेळ पर्यंत चक्रव्यूह मागे तसाच होता. तो तोडण्यासाठी कोण पुढे येतो हे द्रोण पहात होता. तोंच द्रोणावर आक्रमण करून अभिमन्यूने अचानक, द्रोणाचीहि पर्वा न करतां, मुख्य चक्रव्यूहावरच आक्रमण केले. चक्रव्यूह तोडून आत घुसून त्याने अनन्वित संहार आरंभला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी दुर्योधन स्वत; पुढे झाला. अभिमन्यु हा महारथी असल्यामुळे दुर्योधनाचा पाड लागणार नाही हे जाणून द्रोणाने त्याच्या मदतीला दु:सह, दु:शासन, कृप, विविंशति, यांचे बरोबरच, स्वत:जवळ असलेल्या अश्वत्थामा, भूरिश्रवा, शल्य, शकुनि यानाहि पाठवले व मग काही वेळाने तो स्वत:हि तिकडेच धावला. यामुळे युधिष्ठिरावर हल्ला करण्याचा बेत बाजूलाच पडला. युधिष्ठिराचा हेतु त्या वेळेपुरता सफळ झाला पण त्याची फार भयानक किंमत पांडवांना मोजावी लागली.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-863289868879823878?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/863289868879823878/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=863289868879823878' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/863289868879823878'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/863289868879823878'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='अभिमन्युवध भाग ५'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-8141057947866815068</id><published>2011-04-27T13:47:00.001+05:30</published><updated>2011-05-15T10:11:19.005+05:30</updated><title type='text'>अभिमन्युवध - भाग ४</title><content type='html'>तिसर्‍या दिवशी पुन्हा त्रिगर्तानीच अर्जुनाला आव्हान दिले व अर्जुन पुन्हा एकदा त्यांच्याशी लढायला गेला असे महाभारत म्हणते. दुसर्‍या  दिवशीच्या त्रिगर्त-अर्जुन युद्धाचे दीर्घ आणि रसभरित वर्णन करणार्‍या व्यासानी या दिवशीचे अर्जुन-त्रिगर्त युद्ध कसे झाले, कोणी काय पराक्रम केला, अर्जुनाने कोणाकोणाला मारले याबद्दल अवाक्षरहि लिहिलेले नाही. सर्व दिवसाच्या युद्धाचे वर्णन &lt;b&gt;फक्त दोन श्लोकांत &lt;/b&gt;’उरकले’ आहे. हे अतिशय संशयास्पद आहे! शिवाय यादिवशी युधिष्ठिराच्या रक्षणाची कोणतीहि व्यवस्था अर्जुनाने केली नव्हती! आदल्या दिवशी ती जबाबदारी सत्यजितावर सोपवली त्याचे काय झाले हे कृष्णार्जुनाना ठाऊक नव्हते काय? या सर्वांमुळे मला असा दाट संशय आहे कीं त्या तिसर्‍या दिवशी अर्जुन थकव्यामुळे वा जखमांमुळे युद्धाला बाहेर पडलाच नसावा! मात्र या तर्काला महाभारत ग्रंथात कोणताही आधार मला देता येत नाही. या दिवशी अर्जुन युद्धात असणार नाही हे बहुधा कौरवपक्षाला खात्रीपूर्वक माहीत नसावे कारण तसे असते तर द्रोणाने युधिष्ठिराला पकडण्याच्या दृष्टीने ’आक्रमक’ व्यूहरचना केली असती. प्रत्यक्षात त्याने दुर्योधनाला आश्वासन दिले कीं ‘आज मी पांडवपक्षाच्या एकातरी प्रमुख वीराचा वध घडवून आणीन!’ आणि त्याने कौरव सैन्याचा चक्रव्यूह रचला. या व्यूहाचे &lt;b&gt;’भेदण्यास अत्यंत अवघड’ &lt;/b&gt;असे व्यासानी वर्णन केले आहे. हे वर्णन बचावात्मक व्यूहाला जास्त योग्य वाटते आक्रमक व्यूहाला नव्हे! त्यामुळे असे वाटते कीं अर्जुन  आज कदाचित युद्धामध्ये नसेल याची कौरवाना काही कल्पना असती तर द्रोणाने सर्व बळ एकवटून युधिष्ठिराला पकडण्याचा प्रयत्न केला असता. बचावात्मक व्यूह रचला नसता. प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागल्यावर काय झाले ते पुढील लेखात पाहूं&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-8141057947866815068?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/8141057947866815068/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=8141057947866815068' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8141057947866815068'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8141057947866815068'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/04/blog-post_27.html' title='अभिमन्युवध - भाग ४'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-6848748202267637827</id><published>2011-04-22T12:16:00.001+05:30</published><updated>2011-04-22T12:18:40.326+05:30</updated><title type='text'>अभिमन्युवध - भाग ३</title><content type='html'>पहिल्या दिवशी अर्जुन त्रिगर्त सैन्याशी लढण्यात बराच काल व्यग्र राहिला. हे संशप्तक सैन्य हे एक जरासे धुसर प्रकरण आहे. युद्धाच्या पहिल्या दिवसापासून यांनी आव्हान दिले कीं अर्जुन त्यांच्याशी लढत बसे. अठरा अध्याय गीता ऐकून देखील अर्जुन पितामह भीष्म वा गुरु द्रोण यांच्याशी अटीतटीने लढण्यास कधीच उत्सुक नसे. तो आपला संशप्तकांशी लढत राही! अगदी पांडवांच्या इतर वीराना भीष्म वा द्रोण झेपेनासे झाले म्हणजे त्याला पुढे व्हावेच लागे. कृष्णही त्याला तसे करू देत होता असें दिसते. या द्रोणपर्वातीलप्रथम दिवशीही दिवस अखेर द्रोणाचा हल्ला परतवण्यासाठी अर्जुनाला संशप्तकांचा नाद सोडून देऊन द्रोणाशी सामना करावा लागला. मात्र द्रोणालाही युधिष्ठिराला पकडण्यात यश आले नाही. दुर्योधनाने नाराजी व्यक्त केल्यावर द्रोणाने पुन्हा निक्षून सांगितले कीं अर्जुन प्रतिकार करत असताना युधिष्ठिराला पकडणे मला जमणार नाही तेव्हां त्याला दिवसभर अडकवून ठेवा. मग पुन्हा त्रिगर्तराज सुशर्मा, त्याचे भाऊ व इतर त्रिगर्त वीरांनी हे आव्हान स्वीकारले व आम्ही पडेल ती किंमत देऊन उद्यां दिवसभर अर्जुनाला व्यग्र ठेवूं असे दुर्योधनाला आश्वासन दिले. त्याप्रमाणे युद्धाच्या बाराव्या दिवशी अर्जुन युधिष्ठिराच्या रक्षणाचे काम सत्यजित नावाच्या द्रुपदपुत्रावर सोपवून त्रिगर्तांशी लढायला गेला. वास्तविक, सत्यजित हा कोणी सात्यकी वा धृष्टद्युम्न यांच्यासारखा महावीर नव्हता. तेव्हां ही व्यवस्था पुरेशी नव्हती. पण याबद्दल युधिष्ठिर, इतर पांडव वा कृष्ण यांनी नाराजी व्यक्त केली नाही. बहुधा वेळ आलीच तर नेहेमीप्रमाणे आपण त्रिगर्ताना सोडून परत येऊं असे अर्जुनाला वाटले असावे. मात्र हा सर्व दिवस त्रिगर्तानी अर्जुनाला सोडले नाही. अर्जुनाने त्यांची अपरिमित हानि केली. अनेकाना मारले. या युद्धाचे रसभरित वर्णन व्यासानी केले आहे. मात्र इकडे बिचारा सत्यजित द्रोणापुढे काही न चालून अखेर मारला गेलाच. दिवसभर प्रयत्न करून द्रोणालाहि युधिष्ठिराला पकडता आले नाहीच कारण इतर पांडवपक्षाच्या वीरानी प्रखर प्रतिकार केला. दिवसाच्या उत्तरभागात कौरवपक्षाचा एक योद्धा भगद्त्त हा पांडवांना फार भारी पडूं लागला व कोणालाही आवरेना त्यामुले अखेरीस, द्रोण बाजूलाच राहून, अर्जुनाला भगदत्ताचाच प्रतिकार करण्यासाठी धाव घ्यावी लागली. अर्जुनाने भगदत्ताला मारेपर्यंत दिवस मावळला व दुर्योधन व द्रोण यांचा युधिष्ठिराला पकडण्याचा मुख्य बेत असफलच राहिला. दुर्योधनाने नाराजी व्यक्त केल्यावर द्रोणाने पुन्हा तेच कारण सांगितले कीं अर्जुन असताना जमणार नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-6848748202267637827?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/6848748202267637827/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=6848748202267637827' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6848748202267637827'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6848748202267637827'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/04/blog-post_22.html' title='अभिमन्युवध - भाग ३'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-549588161633156654</id><published>2011-04-19T13:03:00.000+05:30</published><updated>2011-04-19T13:03:45.516+05:30</updated><title type='text'>अभिमन्युवध - भाग २</title><content type='html'>अभिमन्यूचा वध ही भारतीय युद्धातील एक फार महत्त्वाची घटना आहे. कारण आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे चिडून जाऊन अर्जुनाने जयद्रथाचा दुसऱ्या दिवशींच वध करण्याची प्रतिज्ञा केली आणि दिवसभर जयद्रथाचे अर्जुनापासून संरक्षण करण्याचा कौरवांनी आटोकाट प्रयत्न करूनही ते जयद्रथाला  वाचवू शकले नाहीत. अर्जुनापुढे आपले कोणाचेच काही चालत नाही हे त्याना कळून चुकले. जयद्रथाच्या वधाबद्दल मी विस्ताराने लिहिले आहे. त्यामुळे आतां त्याची पार्श्वभूमी असलेल्या अभिमन्यू वधाबद्दल लिहिणार आहे. &lt;br /&gt;युद्धाचे पहिले दहा दिवस भीष्म कौरवांचा सेनापती होता. त्याने प्रथमच दुर्योधनाला सांगितले होते कीं मी एकाही पांडवाला मारणार नाही. दहा दिवसात पांडव पक्षाचा एकही प्रमुख वीर मेला नव्हता. भीष्माने पांडव सैन्याचा मात्र फार संहार केला होता. भीष्म शरपंजरी पडल्यावर त्याने दोन्ही पक्षांना युद्ध संपवा असें विनवले होते. मात्र ते शक्य नव्हते. भीष्म पडल्यावर दुर्योधनाने द्रोणाला सेनापती होण्यास विनवले. त्याने ते स्वीकारले. येथून पुढे डावपेचाचे युद्ध झाले. सुरवातीलाच द्रोणाने दुर्योधनाला विचारले कीं तुला काय हवे आहे. त्यावर दुर्योधनाने म्हटले कीं ‘युधिष्ठिराला पकडावे. द्रोणाने आनंद व्यक्त केला कीं ‘तू युधिष्ठिराला मारुं इच्छित नाहीस.’ दुर्योधनाने म्हटले कीं ‘युधिष्ठिराला मारून युद्ध संपणार नाही, इतर पांडव आमचा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाहीत. युधिष्ठिराला पकडले तर मी त्याला पुन्हा द्युत खेळायला बसवीन व पुन्हा वनवासाला धाडीन.’ द्रोणाला हा विचार पसंत पडला कारण पांडवाना मारण्याचे अप्रिय काम यामुळे टळणार होते. द्यूत खेळणे योग्य कीं अयोग्य याचा विचारही त्याला पडला नाही. तेव्हा त्याने मान्य केले कीं ‘मी युधिष्ठिराला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करीन मात्र अर्जुन त्याचे संरक्षण करण्यास उपस्थित असेल तर हे शक्य होणार नाही. तेव्हां त्याला काही करून दूर ठेवा.’ दुर्योधनाने हे मान्य केले. पुढील तीन-चार दिवस कौरवांचा हा मुख्य युद्धहेतू राहिला व सर्व युद्धबेत त्याप्रमाणे ठरले. ही गोष्ट अर्थातच पांडवाना समजलीच व त्यांनीही युधिष्ठिराचे संरक्षण करण्याला प्राधान्य दिले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-549588161633156654?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/549588161633156654/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=549588161633156654' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/549588161633156654'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/549588161633156654'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/04/blog-post_19.html' title='अभिमन्युवध - भाग २'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-4383174452241309110</id><published>2011-04-18T13:31:00.000+05:30</published><updated>2011-04-18T13:31:17.863+05:30</updated><title type='text'>अभिमन्युवध भाग १</title><content type='html'>महाभारतांतील विविध विषयांवर विस्ताराने लिहून झाले. माझ्या अपेक्षेपेक्षाहि अनेक वाचक, विषेशेकरुन तरुण वाचक मला लाभले. नवीन लिहिण्यासारखे मला काहि सुचले नसल्यामुळे लिखाण बरेच दिवस बंदच आहे. मात्र अजूनहि नित्यनेमाने हा ब्लॉग नवनवीन व जुनेहि वाचक वाचतच आहेत. आजपासून एका नवीन विषयाला सुरवात करीत आहे. खरे तर जयद्रथवधावरच्या माझ्या लेखांमध्ये त्याची पार्श्वभूमि या नात्याने अभिमन्युवधाबद्दल थोडेफार लिहिले आहेच तेव्हां काही प्रमाणात पुनरुक्ति होणार आहे. ती  आपण चालवून घ्यावी.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-4383174452241309110?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/4383174452241309110/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=4383174452241309110' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4383174452241309110'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4383174452241309110'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/04/blog-post_18.html' title='अभिमन्युवध भाग १'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-6754877622679515774</id><published>2011-04-01T13:12:00.004+05:30</published><updated>2011-04-01T13:29:43.101+05:30</updated><title type='text'>ब्लॉग स्पर्धा</title><content type='html'>या ब्लॉगला स्टार माझाच्या स्पर्धेत बक्षीस मिळाले हे वाचकांस माहीत आहेच. बक्षीससमारंभाचे चित्रीकरण दि. २७ मार्चला दाखवले गेले. श्री. गंगाधर मुटे यांनी त्याची व्हिडिओ क्लिप पाठवली त्यातला पांचवा भाग (ज्यात मी आहे!) खालील URL वर YOUTUBE वर पाहतां येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt; http://www.youtube.com/watch?v=301ZV7LNEqU&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम्ही पहाल अशी आशा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;धन्यवाद.&lt;br /&gt;प्र. के. फडणीस&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-6754877622679515774?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/6754877622679515774/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=6754877622679515774' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6754877622679515774'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6754877622679515774'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/04/blog-post.html' title='ब्लॉग स्पर्धा'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-3355193846302743554</id><published>2011-01-10T20:37:00.003+05:30</published><updated>2011-01-10T20:50:06.780+05:30</updated><title type='text'>महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ९</title><content type='html'>अज्ञातवास संपल्यावर पांडवांतर्फे द्रुपदाचा पुरोहित कौरवांकडे आला व त्याने राज्याची मागणी केली. ती दुर्योधनाने नाकारली. भीष्माने पुरोहिताला सांगितले कीं आम्ही विचार करून काय तो जबाब कळवू. पांडवांची मागणी मान्य केलीच पाहिजे असा आग्रह भीष्माने धरला नाहीं. मागणी नाकारली गेली. कटु सवाल जबाबांनंतर अखेरचा प्रयत्न म्हणून पांडवांतर्फे कृष्ण कौरवदरबारांत शिष्टाईला आला. पांडवांचा, अज्ञातवास पुरा केल्याचा दावा वादग्रस्त आहे हें ओळखून, कृष्णाने त्यावर मुळीच भर न देतां शम हा दोन्ही पक्षांना कसा हितावह आहे यावरच जोर दिला. दुर्योधनाने पांडवांचा दावा सपशेल फेटाळून लावला व ’युद्धाला भिऊन मी राज्य देणार नाहीं’ असे म्हटलें. यावर भीष्मद्रोणांनी ’तूं असा आडमुठेपणा केलास तर आम्ही तुझी बाजू घेणार नाहीं, युद्धापासून अलिप्त राहूं’ असे त्याला बजावले नाहीं. पांडवांचे मुख्य समर्थक द्रुपद व पांचालराजपुत्र  असल्यामुळे द्रोणाला त्यांच्याशीं युद्धाची खुमखुमी असणे समजूं शकतें पण भीष्माने अशी धमकी दिली असती तर जन्मभर भीष्माच्या हो ला हो करणार्‍या द्रोणालाहि स्वस्थ बसावें लागले असते. भीष्माने असे कांही केले नाहीं. पांडवांचा अज्ञातवास पुरा केल्याचा दावा त्यालाहि मान्य नव्हता काय? त्याने तसेंहि म्हटलेले नाहीं! दुर्योधन अजिबात बधत नाही असे दिसल्यावर कृष्णाने अखेर धृतराष्ट्र, भीष्म व इतरांना बजावलें कीं कुलक्षय टाळण्यासाठी तुम्ही दुर्योधनाला आवरा. तसे केलेत तर पांडवांना मी आवरीन.’ कोणीहि काही केले नाही. एव्हांना दुर्योधनाला ठामपणे विरोध करण्याचे बळ वा इच्छाशक्ति भीष्म वा इतर कोणातहि उरली नव्हती. शिष्टाई असफल होऊन कृष्ण परत गेला व कार्तिक प्रतिपदेपासून युद्ध सुरू करूं असा कर्णातर्फे त्याने कौरवांना निरोप दिला. युद्ध आतां अटळ होतें. &lt;br /&gt;भीष्माने या अटीतटीच्या वेळीदेखील कौरवपक्ष सोडून पांडवांची बाजू घेण्याचा विचारहि केलेला दिसत नाही. त्याने अजूनहि तसा धाक दुर्योधनाला घातला असता तर द्रोण, कृप, अश्वत्थामा यांनी काय केले असते, दुर्योधनाने काय केले असते, हे तर्क निष्फळ आहेत. कौरवांचे दुर्योधनाने देऊं केलेले सेनापतिपद भीष्माने खळखळ न करतां स्वीकारलें. फक्त एकच अट घातली कीं ’एकतर कर्ण किंवा मी, एकच कोणीतरी लढेल’. यात मात्र एक गोष्ट दिसून येते कीं युद्धावर नियंत्रण ठेवण्याचा त्याचा हेतु असावा. आततायी व पांडवाचा दीर्घद्वेष करणार्‍या कर्णाला ’अर्धरथी’ ठरवण्यामागे आणि अशी अट घालण्यामागे कर्णाने युद्धापासून दूर रहावें हाच भीष्माचा हेतु होता तो अचूक सफळ झाला. ’भीष्म जिवंत असेपर्यंत मी युद्धात भाग घेणार नाही कारण मी कितीहि पराक्रम केला तरी विजयाचे श्रेय सेनापति या नात्याने भीष्मालाच मिळेल. भीष्माच्या मृत्यूनंतरच मी युद्धाला उभा राहीन.’ असे त्याने दुर्योधनाला म्हटले. ज्याच्यावर दुर्योधनाचा भरवसा होता त्या कर्णानेच एक प्रकारे त्याला दगा दिला! कर्णासाठी भीष्माला बाजूला सारण्याचे धैर्य दुर्योधनाला झाले नाही. ’मी रोज १०,००० सैन्य मारीन पण एकाहि पांडवाला मारणार नाही’ हेहि भीष्माने दुर्योधनाला प्रथमच सांगून टाकलें. यावरून माझा तर्क असा कीं सर्व राजे व प्रचंड सैन्य जमलें आहे तेव्हां थोडेंफार युद्ध अटळच आहे तर तें जमेल तितके नियंत्रणाखालीं ठेवलें तर निदान कुलक्षय टळेल असा भीष्माचा प्रयत्न दिसतो. त्याच्या सेनापतित्वाखाली पहिले दहा दिवस युद्ध झाले तोंवर धर्मयुद्धाचे त्यानेच घालून दिलेले नियम सर्रास मोडले जात नव्हते. जरी सैन्याचा व कित्येक वीरांचा मृत्यु झाला होता तरी कौरव व पांडवांपैकी कोणीहि मेले नव्हते. त्यामुळे भीष्माचा हेतु साध्य झाला होता असे म्हटले पाहिजे. युद्धामध्ये भीष्माला कोणीहि रोखूं शकत नव्हतें. तो फार अनावर झाला म्हणजे नाइलाजाने अर्जुनालाच त्याचेशीं लढावे लागत होते. अंबेने ज्या शिखंडी रूपाने पुनर्जन्म घेतला होता त्याचेशी युद्ध करण्याचे भीष्म नाकारत राहिला कारण शिखंडी प्रथम स्त्री म्हणून जन्माला आला होता. मात्र शिखंडीचे  हातून भीष्म मेला असे महाभारत मुळीच म्हणत नाही. त्याचे आड राहून अर्जुनाने भीष्माशी युद्ध केले असेहि महाभारत म्हणत नाही. युद्धाच्या दहाव्या दिवशीं अर्जुनाचेच प्रखर बाण लागून अखेर भीष्म शरपंजरीं पडल्यावर ’आतांतरी युद्ध पुरे करा’ असें त्याने दोन्ही पक्षांना सांगितले पण आतां फार उशीर झाला होता. कुलक्षय व्हायचा टळला नाहीं. उत्तरायण लागेपर्यंत भीष्म शरपंजरी जीव धरून होता. त्यामुळे युद्धाचा भीषण शेवट त्याला मृत्यूपूर्वी ऐकावा लागला. &lt;br /&gt;भीष्मचरित्राचा आढावा घेतल्यावर त्याच्या वागण्याचा कित्येक वेळां उलगडा होत नाहीं असेंच म्हणावे लागते. ज्या कुरुकुळाच्या वाढीसाठी तो कौरव-पांडवांच्या जन्मापर्यंत आपल्यापरीने झटला त्या कुळातील दुर्योधनाचे अनाचार तो थांबवू शकला नाही. तसा निकराचा प्रयत्नहि त्याने केलेला दिसत नाही. परिणामी कुरुकुळाचा क्षयच त्याला अखेर पहावा लागला. भीष्मप्रतिज्ञा एकप्रकारे विफल झाली असें म्हणावे लागते. मात्र प्रतिज्ञापालनाचा एक उज्वल आदर्श त्याने उभा केला हे खरे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-3355193846302743554?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/3355193846302743554/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=3355193846302743554' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3355193846302743554'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3355193846302743554'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ९'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-1688852731959780243</id><published>2010-12-31T12:09:00.008+05:30</published><updated>2010-12-31T15:44:38.089+05:30</updated><title type='text'>’स्टार माझा’ स्पर्धा</title><content type='html'>आज महाभारत थोडे बाजूला ठेवावे म्हणतो. (एवीतेवी आता ते संपतच आले आहे!)&lt;br /&gt;ठरल्याप्रमाणे रविवार दि. २५ डिसेंबरला ’स्टार माझा’च्या वरळी येथील स्टुडिओत स्पर्धेचा बक्षीससमारंभ पार पडला. सर्वच स्पर्धक उपस्थित राहिले नव्हते तरी उपस्थिति चांगली होती. माझ्या या ब्लॉगला बक्षीस असल्यामुळे मी उत्सुकतेने गेलो होतो. ’हे TV Channel चे शूटिंग म्हनजे काय असते रे भाऊ?’ अशी मुख्य उत्सुकता होती! कार्यक्रम मजेत पार पडला. बर्‍याच ब्लॉगलेखकांचा कमीजास्त परिचय झाला. अनेकांचे चेहेरे ब्लॉगांवर पाहिलेले होते. श्री. प्रमोद देवहि उपस्थित होते. त्यांचेशी अनेकवार बोललो होतो, ई-मेलची देवघेव झाली होती. त्याना प्रत्यक्ष भेटता आले. परीक्षकांशी गप्पा मारून त्यांचा दृष्टिकोन समजावून घेतां आला. श्री. प्रसन्न जोशी यानी नावाप्रमाणे प्रसन्नपणे कार्यक्रम नेटका घडवून आणला.&lt;br /&gt;काही ब्लॉगलेखकानी आपाअपली प्रशस्तिपत्रे हौसेने ब्लॉगवर टाकलेली पाहिली तर म्हटले आपलेहि टाकूया! मला भेटवस्त म्हणून एक Speaker cum Mike मिळाला. तो म्हणे bluetooth वर चालतो! आता हे काय नवीन लचांड? माझ्याकडे त्यातला फोन किंवा इतर काही Gadget नाही. मग मला याचा काय उपयोग होणार असे वाटले. मग Manual वाचून पाहिले तेव्हा कळले कीं त्याचा साधा speaker म्हणूनहि उपयोग करतां येईल. मग सरळ Computerलाच जोडला आणि गाणे ऐकतां आले. म्हटले चला speaker तर speaker. &lt;br /&gt;तेव्हा खालचे फोटो पहा.&lt;br /&gt;प्र. के. फडणीस&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2suvi05SI/AAAAAAAADZ0/HIP7PNB1njg/s1600/Me.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 186px;" src="http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2suvi05SI/AAAAAAAADZ0/HIP7PNB1njg/s400/Me.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5556787434281559330" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2suRUhuCI/AAAAAAAADZs/_p7Wy-5aF98/s1600/IMG_3071.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 344px;" src="http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2suRUhuCI/AAAAAAAADZs/_p7Wy-5aF98/s400/IMG_3071.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5556787426168518690" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2suPTSmgI/AAAAAAAADZk/kVVXyPrmig4/s1600/IMG_3073.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 227px;" src="http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2suPTSmgI/AAAAAAAADZk/kVVXyPrmig4/s400/IMG_3073.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5556787425626462722" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2H6e32izI/AAAAAAAADZE/XU_ju2-9kPM/s1600/IMG_3078.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 299px; height: 400px;" src="http://3.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2H6e32izI/AAAAAAAADZE/XU_ju2-9kPM/s400/IMG_3078.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5556746954034547506" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2H6omHN0I/AAAAAAAADZM/4SfKPtf2SPc/s1600/IMG_3082_2.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://1.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2H6omHN0I/AAAAAAAADZM/4SfKPtf2SPc/s400/IMG_3082_2.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5556746956644497218" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2K1t7XoJI/AAAAAAAADZc/k41oXgmL5Lc/s1600/IMG_3085%2B-trim.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 319px;" src="http://1.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2K1t7XoJI/AAAAAAAADZc/k41oXgmL5Lc/s400/IMG_3085%2B-trim.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5556750170711367826" /&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-1688852731959780243?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/1688852731959780243/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=1688852731959780243' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1688852731959780243'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1688852731959780243'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/12/blog-post_31.html' title='’स्टार माझा’ स्पर्धा'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/TR2suvi05SI/AAAAAAAADZ0/HIP7PNB1njg/s72-c/Me.JPG' height='72' width='72'/><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-6424132258645718715</id><published>2010-12-24T10:20:00.003+05:30</published><updated>2010-12-24T10:30:54.493+05:30</updated><title type='text'>महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ८</title><content type='html'>पांडव वनवासाला गेले. त्यांची खबरबात हस्तिनापुराला कळत होतीच. पांडवांना हिणवण्यासाठीं दुर्योधन व कर्ण यांनी गायींचीं खिल्लारे तपासण्याच्या निमित्ताने वनांत त्यांच्या सन्निध जाऊन त्यांना आपल्या वैभवाचे प्रदर्शन घडवावे व त्यांची दैन्यावस्था पहावी म्हणून द्वैतवनात दौरा काढला. हा बेत धृतराष्ट्राला पसंत नव्हता आणि भीष्महि त्याला मान्यता देणार नाही असे त्याने दुर्योधनाला म्हटले. दुर्योधनाने बापाची समजूत काढली अन भीष्माला विचारलेच नाहीं! एव्हांना दुर्योधनाने व कर्णाने भीष्माला काडीइतकीहि किंमत द्यायची नाही असेच ठरवले होते! भीष्म तरीहि हस्तिनापुराला चिकटून राहिला ! कां कोण जाणे. &lt;br /&gt;कौरव वनात गेले तेथे त्यांचा गंधर्वांशी झगडा होऊन सडकून मार मिळाला. कर्ण दुर्योधनाला सोडून जीव वाचवण्यासाठी पळून गेला. दुर्योधन गंधर्वांचा बंदी झाला. अखेर पांडवांनी दुर्योधनाला मुक्त केले. भयंकर अपमान सोसून सगळे हस्तिनापुराला परत आले. यावेळी मात्र भीष्माने ’कर्ण पांडवांच्या चौथ्या हिश्शानेहि नाही’ असें दुर्योधनाला ऐकवलें. दुर्योधन व कर्ण यांनी नेहमी प्रमाणे भीष्माकडे पूर्ण दुर्लक्ष केले. भीष्म तरीहि अपमान सोसत हस्तिनापुरातच राहिला!&lt;br /&gt;पांडव अज्ञातवासात असताना त्याना शोधण्याच्या दुर्योधनाच्या प्रयत्नांमध्ये भीष्माने उत्साहाने भाग घेतला. जणूं पांडवांना शोधून काढून पुन्हा वनवासाला धाडण्यात त्याला स्वत:ला काहीच वावगे वाटत नव्हते आणि त्याला तेच हवे होते! एवढा तो पांडवांच्या विरोधात कां गेला असावा? विराटाचा सेनापति असलेल्या कीचकाच्या वधानंतर त्रिगर्त राजाच्या सूचनेप्रमाणे विराटावर हल्ला करून त्याचीं गायींचीं खिल्लारे लुटण्याच्या दुर्योधनाच्या बेतातहि तो सहभागी झाला. खरे तर कौरवांचे व विराटाचे काही पुराणे वैर नव्हते मग त्याने दुर्योधनाला विरोध कां केला नाहीं? &lt;br /&gt;महाभारतात स्पष्टपणे म्हटलेले नाही पण सूचित केले आहे कीं कीचकाच्या वधाची बातमी ऐकून दुर्योधनाला वाटले कीं हा वध भीमाशिवाय दुसर्‍या कोणी केला असणे असंभव आहे. त्रिगर्तराजाची सूचना त्याने स्वीकारली यामागे विराटाच्या आसर्‍याला पांडव असतील तर विराटाच्या मदतीला ते युद्धात उतरतीलच व ओळखता येतील असा त्याचा विचार होता असे दिसते. भीष्म वा विदुराला अशी शंका आली असती तर विराटावर हल्ला करण्याचा बेत त्याना कदाचित मोडून काढतां आला असता. भीष्माने तसा प्रयत्न केला असता काय हा प्रष्नच आहे! कौरवांचा हल्ला पहिल्या दिवशी सप्तमीला झाला असता तर अर्जुन नव्हे तर भीम कौरवांशी युद्धाला आला असता व तोहि लगेच ओळखला गेला असताच. प्रत्यक्षात त्रिगर्तांचा हल्ला सप्तमीला दुपारी झाला. त्रिगर्तांच्या विरुद्ध भीम लढला व त्याने मोठा पराक्रम गाजवला पण सुदैवाने, त्रिगर्ताला त्याला ओळखता आले नाही. युधिष्ठिराने त्याला ’इतरांप्रमाणेच लढ, झाड उपटून घेण्यासारखे तुझे खास प्रकार करूं नको, नाहीतर ओळखला जाशील’ असे बजावले होते. &lt;br /&gt;प्रत्यक्षात कौरवांचा हल्ला दुसर्‍या दिवशी अष्टमीला सकाळीच झाला. विराटाचे वतीने त्याचा पुत्र उत्तर व अर्जुन युद्धाला उभे राहिल्यावर कौरवांनी अर्जुनाला लगेच ओळखलें व ’तेरावे वर्ष पुरे होण्यापूर्वीच अर्जुन ओळखला गेला आहे’ असे दुर्योधनाने लगेच म्हटले. द्रोणाचार्यांनी, ’पांडवांनी असे कसे केले’ अशी शंका व्यक्त केल्यावर भीष्माने सौरवर्ष व चांद्रवर्ष यांचे गणित उलगडून &lt;strong&gt;’आज सकाळीच, सौरमानाने पांडवांनी तेरा वर्षे पुरीं केलीं आहेत’ &lt;/strong&gt;असें म्हटलें. (कौरवांचा हल्ला एक दिवस आधी झाला असता तर तेहि झाले नसते!) चांद्रमानाने आवश्यक तेवढे अधिक महिने मोजून तेरा वर्षे उघडच पुरीं झालेलीं नव्हती. मग पांडवांनी अनुद्यूताचा पण पुरा केला असे ठरते कीं नाहीं याबद्दल भीष्माने &lt;strong&gt;स्वत:चे नि:संदिग्ध मत&lt;/strong&gt;, अनुकूल वा प्रतिकूल, तेव्हां (वा नंतर पुढे केव्हांहि, कृष्णशिष्टाईचे वेळीं देखील) दिलेच नाहीं! अर्जुनापासून कर्णाला व कौरवांना यावेळीं वांचवून हस्तिनापुराला परत नेण्याचें काम मात्र त्याने केलें.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-6424132258645718715?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/6424132258645718715/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=6424132258645718715' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6424132258645718715'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6424132258645718715'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/12/blog-post_24.html' title='महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ८'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-6574234861436220188</id><published>2010-12-15T20:26:00.002+05:30</published><updated>2010-12-15T20:33:16.567+05:30</updated><title type='text'>महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ७</title><content type='html'>पांडवानी इंद्रप्रस्थ राजधानी वसवली. राजसूय यज्ञाचा बेत केला. त्यासाठी जरासंधाला मारले. दिग्विजय केला. यज्ञाच्या वेळी सर्व कौरव उपस्थित होते. यज्ञानंतर अग्रपूजेचा मान कृष्णाला देण्याचा सल्ला भीष्माचा. तो पांडवांना मानवला. शिशुपालाने कडाडून विरोध केला. भीष्मालाहि दुरुत्तरे केलीं. भीष्माने त्याला अतिशय तुच्छतेने झिडकारले. अखेर कृष्णाने त्याला मारले. भीष्माला हा अतिरेक टाळतां आला असता काय? या अतिप्रसंगाच्या छायेखाली यज्ञ पुरा झाला.&lt;br /&gt;पांडवांच्या दरार्‍याचा व वैभवाचा हेवा वाटून शकुनीच्या सल्ल्यावरून दुर्योधनाने द्यूताचा बेत ठरवला व धृतराष्ट्राच्या गळीं उतरवला. भीष्माला विचारले नाही पण कळले असणारच. द्यूत होऊं नये यासाठी त्याने कांहींहि केलेले नाहीं. त्याने स्पष्टपणे धृतराष्ट्राला निक्षून सांगितले असते तर बहुधा द्यूत टळले असते पण भीष्म स्वस्थ बसला. पांडव हस्तिनापुरात आल्यावर सर्वांना भेटले व द्यूत दुसर्‍या दिवशीं झालें. तोंवर वेळ मिळाला होता मात्र भीष्माने युधिष्ठिरालाहि ’द्यूत खेळूं नको’ असा निकराचा सल्ला दिला नाही. ’खेळताना संयम पाळ’ येवढेहि निक्षून सांगितले नाहीं! कुटुंबप्रमुख असलेल्या भीष्माला हा नाकर्तेपणा कां ग्रासून राहिला हे उलगडत नाही.&lt;br /&gt;द्यूत झालेच. युधिष्ठिर कायम हरतच राहिला. पांडव सर्व संपत्ति हरेपर्यंत द्यूत चालले. मग त्याने सहदेवास पणास लावले. हीच वेळ होती, खरे तर द्यूत संपवण्याची! येथून पुढील युधिष्ठिराचा सर्व अतिरेक दरबारातील सर्वांनी चालूं दिला. भीष्माने, पहिल्या पांडवाला पणाला लावण्याच्या वेळेसच, निर्धाराने हा गैरप्रकार कां थांबवला नाहीं? ’राज्य वैभव तुम्हा नालायकांना राखतां आले नाहीं, आतां निघा आणि भीक मागा किंवा पुन्हा पराक्रम गाजवून नवीन राज्य व वैभव कमवा. तुमच्या दुर्दशेला युधिष्ठिरच कारण आहे, तेव्हां कौरवांना दोष देऊं नका’ असें म्हणून त्याने पांडवांना हांकलून कां दिलें नाहीं? द्यूत तेव्हांच थांबवले असते तर पुढील घोर अपमान, द्रौपदीचा छळ व अनावर वैर टळलें असतें. महाभारतात याचे उत्तर मिळत नाहीं. &lt;br /&gt;युधिष्ठिर चारी भावांनंतर स्वत:ला पणाला लावून हरला. सर्व पांडव दास झाले. शकुनीने द्रौपदीला पणाला लावण्याची सर्वथैव अनुचित सूचना केली. तिलाहि भीष्माने काडीचाहि विरोध केला नाहीं! हा पणहि हरल्यावर द्रुपदकुळाची राजकन्या असलेल्या द्रौपदीची सर्व प्रकारे होणारी अप्रतिष्ठा भीष्मानेहि निमूट पाहिली. यांतून उद्भवणारे पांचाल-कौरव घोर वैर त्याला दिसत नव्हतें काय? कुरुकुळाचा प्रमुख या नात्याने त्याने तें टाळावयास हवें होतें. द्रौपदीने विचारलेल्या,’मी दासी झाले कीं नाहीं?’ या प्रष्नाचे उत्तरहि भीष्माने दिलेच नाहीं. ’मला उत्तर समजत नाहीं ’  असा जबाब त्याने दिला. अखेर धृतराष्ट्रानेच तिला वर देऊन पांडवांना दास्यांतून मुक्त केले व जिंकलेले सर्व धनहि परत दिले व ’सर्व प्रकार विसरून परत जा’ असा युधिष्ठिराला निरोप दिला. पांडव परत गेले. या सर्व प्रसंगानंतरहि भीष्म, विदुर, धृतराष्ट्र, द्रोण, कृप वा इतर कुरुवृद्धांनी युधिष्ठिराची अतिरेकी द्यूताबद्दल खरडपट्टी काढली नाही.&lt;br /&gt; पांडवांच्या  झालेल्या अपमानांमुळे लगेचच युद्ध उभे राहील या धास्तीने, माझ्या मते, ते भय  दूर सारण्यासाठी अनुद्यूत झाले. कोणताही पक्ष जिंकला तरी युद्ध तेरा वर्षे टळणार होते. मात्र युधिष्ठिर जिंकला असता तर कौरवांतर्फे कोणकोण वनात जाणार होते हे स्पष्ट सांगितलेले नाही. अनुद्यूताचा  बेत मुळात कोणाचा हे महाभारतात स्पष्ट नाही. या बेतालाहि  भीष्माने विरोध केला नाहीं. पांडव पुन्हा हरून १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासासाठी वनात गेले. या सर्व अनर्थपरंपरेचा भीष्म निव्वळ साक्षीदार राहिला. तो इतका निष्क्रिय कां झाला याचे उत्तर महाभारतात नाहीं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-6574234861436220188?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/6574234861436220188/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=6574234861436220188' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6574234861436220188'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6574234861436220188'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/12/blog-post_15.html' title='महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ७'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-1788122392216302865</id><published>2010-12-02T20:44:00.002+05:30</published><updated>2010-12-02T20:52:11.934+05:30</updated><title type='text'>महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ६</title><content type='html'>पांडवांना वारणावतास पाठवण्याच्या दुर्योधनाच्या बेतामागील कारस्थान भीष्माला उमगले नाहीं. विदुराला उमगले व आपल्यापरीने त्याने पांडवांना वांचवण्यासाठी साह्य केलें (वाड्यातून पळून जाण्यासाठी भुयार खणण्यासाठी आपला विश्वासू माणूस युधिष्ठिराकडे पाठवला), मात्र नवल म्हणजे त्याने आपला संशय भीष्माच्या कानावर मुळीच घातला नाहीं वा वारणावतास पांडवांना पाठवूं नये असें त्याने भीष्माला मुळीच विनवले नाहीं! असें कां झालें? भीष्म कांहीहि करणार नाहीं असें विदुराला वाटलें काय? महाभारत याबद्दल गप्प आहे! शेवटी वारणावतास जे व्हायचे ते झाले. वाड्याला लागलेल्या आगीतून पांडव व कुंती कसेबसे वांचले व परागंदा झाले. तीं वांचल्याची कुणकूण विदुराला लागलीच असणार पण त्याने तेहि भीष्माला कळूं दिले नाही. कौरवांनी पांडव व कुंती यांचे और्ध्वदैहिकहि केले असे महाभारत म्हणते. सत्य परिस्थितीबाबत भीष्म पूर्ण अंधारात राहिला.&lt;br /&gt;द्रौपदीच्या स्वयंवराच्या मंडपांत वारणावतांतून वांचून परागंदा झालेले पांच पांडव ब्राह्मणवेषांत प्रगट झाले होते. अनेक वर्षांचा सहवास असूनहि, कौरवांपैकीं कोणीहि, भीष्मानेदेखील, त्यांना अजिबात ओळखले नाहीं. अर्जुनाने दुष्कर पण जिंकला तरीहि ’हा अर्जुन तर नव्हे’ अशी शंका कोणालाहि आली नाहीं. नंतर ’पण अखेर एका ब्राह्मणाने जिंकला’ म्हणून रागावलेल्या क्षत्रिय राजांबरोबर अर्जुन व भीम यांचे जोरदार युद्ध झाले त्यांत भीमाचे अफाट बळहि प्रगट झाले तरीहि युद्ध संपल्यावर इतरांप्रमाणे कौरव तसेंच भीष्महि पांडवांना अखेरपर्यंत न ओळखतां हस्तिनापुरास निघून गेले. पांडवद्रौपदी विवाहालाहि कौरवांकडून कोणी आलें नाहीं. काही काळ गेल्यावर पांडव-द्रौपदी–कुंती हस्तिनापुराला परत आल्यावर मग अखेर भीष्माने राज्याचा वांटा पांडवांना द्यावा असा सल्ला दिला. यावेळीं त्याने म्हटलें कीं ’वारणावत प्रकरणीं लोक मलाच दोष देतात’ ! खरे तर युधिष्ठिराला पूर्वीच यौवराज्याभिषेक केलेला होता तर मग आतां तो जिवंत परत आल्यावर धृतराष्ट्राचे जागीं त्यालाच हस्तिनापुरचे राज्य मिळावयास हवे होते. भीष्माने तसे केले नाहीच. राज्याचा वाटाहि खरे तर दिला नाही. ’खांडवप्रस्थास जाऊन तुम्ही राज्य करा’ असे पांडवांना म्हटले. तेथे खांडववन जाळून, नवीन प्रदेश वस्तीखाली आणून, नवीन इंद्रप्रस्थ राजधानी बनवून, नवेच राज्य पांडवांना मिळवावे लागले. या सर्व घटनांमध्ये भीष्माची न्यायबुद्धि दिसत नाही. आपला निर्णय धृतराष्ट्रावर वा दुर्योधनावर लादण्याची त्याची इच्छा वा तयारी नव्हती असे म्हणावे लागते. येथून पुढे त्याने दुर्योधनाच्या कुटिल बेताना कधीच प्रखर प्रतिकार केलेला नाही. दुर्योधनाचा सर्वाधिकार त्याने जणू मान्यच केलेला दिसतो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-1788122392216302865?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/1788122392216302865/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=1788122392216302865' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1788122392216302865'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1788122392216302865'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ६'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-2633732462315937015</id><published>2010-11-19T20:21:00.000+05:30</published><updated>2010-11-19T20:23:43.251+05:30</updated><title type='text'>महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५</title><content type='html'>पदरीं पडलें तें पवित्र मानून, इच्छा असो वा नसो, हे दोन्ही पुत्र मोठे होईपर्यंत भीष्माला राज्य संभाळावे लागले! धृतराष्ट्र आंधळा त्यामुळे राजा होण्यास लायक नव्हताच त्यामुळे पांडु पुरेसा मोठा झाल्यावर त्याला राज्यावर बसवून भीष्म मोकळा झाला. पांडूमध्ये कोणता जन्मदोष होता हे स्पष्ट नाही. तर्क करावयाचा तर बहुधा त्याच्या हृदयाला छिद्र वगैरे असावे त्यामुळे लहानपणी तो पांढराफटक असावा. बाल व तरुण वयात तो दोष काहीसा झाकला गेला असावा म्हणून त्याचा युद्धकलेचा अभ्यास झाला व तो वीरपुरुष बनला. पुढे वय वाढल्यावर तो दोष पुन्हा पुढे आला असावा व कोणताही ताण, राज्यकारभाराचा वा संसारसुखाचा, झेपणे त्याला शक्य राहिले नाही. त्यामुळे त्याला राज्यनिवृत्ति स्वीकारून वनवास व पुत्रासाठी कुरुकुळात पुन्हा एकदां नियोग स्वीकारावा लागला. पांडु वनात भार्यांसह गेला त्याला भीष्माने रोखले नाही. राजधानीतच राहून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घे असे सत्यवतीने वा भीष्माने त्याला म्हटले नाहीं. आधीच्या पिढीचा अनुभव लक्षात घेऊन ’तूं हिमालयाकडे जाऊन कुरुसमुदायांतील तिकडील एखाद्या योग्य पुरुषामार्फत नियोगमार्ग पत्कर’ असें भीष्मानेच त्याला सुचवले असा माझा तर्क आहे. (पांडवांचा जन्म देवांपासून हे एक रूपकच म्हटले पाहिजे. तें शब्दश: घेणे योग्य नाहीं )&lt;br /&gt;पांडु राज्य सोडून वनांत गेल्यामुळे नाइलाजाने धृतराष्ट्राला राज्यावर बसवून कारभार भीष्म व विदुर यांना पहावा लागला. विवाह पांडूबरोबरच होऊनहि अद्याप धृतराष्ट्रालाहि अपत्यें झालीं नव्हतीं. कुंतीला वनात युधिष्ठिर पुत्र झाल्याचें गांधारीला कळले तेव्हां तीहि गरोदर होती असें महाभारत म्हणतें पण हे बरोबर वाटत नाहीं. तिचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन युधिष्ठिरापेक्षा लहान, भीमाच्याच वयाचा होता! कुंतीपुत्र आधीं जन्मल्यामुळे आपल्या पुत्राला पुढे राज्य मिळण्याची खात्री तिला व धृतराष्ट्राला राहिली नाहीं. कौरव-पांडव वैराची ही सुरवातच होती! कालांतराने पांडू व माद्री यांचा वनात मृत्यु झाला व कुंती पांच पुत्रांसह हस्तिनापुरास परत आली. कौरव पांडव दोघेंहि लहान असल्यामुळे राज्याची व्यवस्था कायम राहिली. मात्र दुर्योधनाला युधिष्ठिर हा आपला प्रतिस्पर्धी आहे हें लहानपणापासूनच स्पष्ट दिसूं लागलें.&lt;br /&gt;कौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्था भीष्माने नीट लावली. आधी कृप व मग द्रोण यांचेपाशी ते युद्धकला उत्तम शिकले. सर्व राजपुत्र मोठे झाल्यावर अस्त्रदर्शनाचा प्रसंग घडला. त्यावेळी अचानक उपस्थित होऊन कर्णाने अर्जुनाची बरोबरी करून मग त्यांच्या द्वंद्वापर्यंत पाळी आली. ते थांबवण्याचे श्रेय कृप व भीमाला दिले पाहिजे. भीष्माने कुरुप्रमुख या नात्याने वेळीच हस्तक्षेप केला नाही. दुर्योधनाने आततायीपणे कर्णाला अंगराज्य देऊन टाकले व राज्याभिषेकहि केला. त्याला भीष्माने थांबवले नाही. कुलप्रमुख या नात्याने त्याच्या संमतीशिवाय हे कसे होऊ शकले? दुर्योधनाचा अधिकार येथून पुढे जणूं भीष्माने मान्यच केला! मात्र पुढे नवीनच पेंच उभा राहिला. राज्यावर धृतराष्ट्र पण यौवराज्य युधिष्ठिराला दिले. हा अर्थातच भीष्माचा निर्णय होता. यातून तिढाच निर्माण झाला. कौरव-पांडवांतील वाढता वैरभाव व दुर्योधनाला मिळालेली कर्णाची साथ हे दिसत असूनहि भीष्माने वेळीच राज्य वाटून देण्याचा उपाय योजला नाही. दुर्योधन सुखासुखी युधिष्ठिराला राज्य मिळू देणार नाही हे उघड होते व धृतराष्ट्र दुर्योधनाच्या आहारी जातो आहे हेहि दिसत होते तरीहि भीष्माने काही केले नाही. या वेळीं भीष्माचा सल्ला वा निर्णय धृतराष्ट्र वा दुर्योधन झिडकारूं शकले नसते. पण भीष्माने तसे केले नाही. अलिप्तपणा एवढेच कारण?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-2633732462315937015?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/2633732462315937015/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=2633732462315937015' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2633732462315937015'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2633732462315937015'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/11/blog-post_19.html' title='महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-2344633368325102269</id><published>2010-11-12T10:28:00.002+05:30</published><updated>2010-11-12T10:45:11.020+05:30</updated><title type='text'>महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ४</title><content type='html'>विचित्रवीर्याने दोन्ही भार्यांसह संसारसुख काही वर्षे उपभोगले. मात्र त्याला अपत्य झाले नाही. त्याच्यात काय दोष होता ते महाभारतात सांगितलेले नाही. विचित्रवीर्य या नावावरून तर्क करावा. ऐन तारुण्यातच तो मरून गेला. शांतनूने ज्या हेतूने सत्यवतीशी विवाह केला तो वंशवृद्धीचा हेतु निष्फळ ठरला. वंश टिकवण्यासाठी सत्यवतीने भीष्माला त्याच्या प्रतिज्ञेतून मुक्त करून ’तूं विवाह कर’ असे सुचवले ते त्याने अर्थातच नाकारले. ’वडील दीर या नात्याने अंबालिका, अंबिका यांना तूं अपत्य मिळवून दे’ असे विनवले तेहि नाकारले. मात्र वंश टिकवण्यासाठी पूर्वीं, परशुरामाने क्षत्रिय घराणीं नामशेष केलीं होतीं तेव्हां, अनेक क्षत्रिय स्त्रियांनी श्रेष्ठ ब्राह्मणांपासून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घेऊन वंशविस्तार केला, याचा दाखला देऊन, अंबालिका व अंबिका यांनीहि तसेंच करावे असें सुचवलें. तेव्हां सत्यवतीने आपल्याला ऋषि पराशरापासून झालेल्या व्यास या पुत्राचे नाव नियोगासाठी सुचवले ते भीष्मानेहि मान्य केले. यावेळीं कुरुकुळांतीलच दुसर्‍या कोणा पुरुषाचा विचार दोघांनीहि कां केला नाही हे एक कोडेच आहे. ज्या बाल्हीकाचे नाव वरचेवर येते, त्याच्या वंशातला कोणी योग्य पुरुष कसा सुचला नाहीं? (बाल्हीक सोमदत्त व त्याचा पुत्र भूरिश्रवा याचे नाव पुढे कथेत अनेकदां येते. भूरिश्रवा साधारण कौरव-पांडवांचा समवयस्कच दिसतो तेव्हां सोमदत्त वा त्याचा पिता हा नियोगासाठी कदाचित योग्य वयाचा ठरला असता!)&lt;br /&gt;सासूची सूचना दोन्ही सुनांनी अनिच्छेनेच मान्य केली असणार कारण व्यासाचे ओंगळ ऋषिरूप. खुद्द व्यासालाहि त्याची जाणीव होतीच. व्यासाला शुक नावाचा एक पुत्र होता तेव्हां सत्यवतीने विनवले तरीहि या भानगडीत आपण पडूं नये असें व्यासाला कां वाटलें नाहीं? अंबालिका व अंबिका दोघीनाहि जन्मदोष असलेले पुत्र झाले. त्याचें दिलेले कारण (अंबालिकेने डोळे मिटून घेणे व अंबिकेने भीतीने पांढरीफटक पडणे) निव्वळ हास्यास्पद आहे. इच्छेविरुद्ध (उदा. बलात्काराने) मातृत्व लादले गेले तरीदेखील स्त्रीला अनेकदां सुदृढ अपत्य होतें! येथे तर मातृत्व हवेच होते! जणू व्यासावर पुत्रांच्या व्यंगांचा दोष नको म्हणून तो त्या दोघींवर ढकललेला वाटतो! मात्र धृतराष्ट्र आंधळा निपजल्यावर तरी व्यासाचा नाद सोडून देऊन दुसरा कोणी शोधावा असें सत्यवतीला वाटले नाही वा भीष्मालाहि सुचले नाही. यांतहि भीष्माचा अति अलिप्तपणाच जाणवतो. तिसरा प्रयोग अंबालिका-अंबिका यांनी युक्तीने टाळला. आपल्या जागीं दासीलाच पाठवले! व्यासांना कळले होतेच कीं यावेळी आपल्यासमोर दासी आली आहे पण व्यासानी सत्यवती वा भीष्माकडे तक्रार केली नाही वा माघार घेतली नाही! दासीचे पोटीं विदुर जन्माला आला.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-2344633368325102269?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/2344633368325102269/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=2344633368325102269' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2344633368325102269'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2344633368325102269'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/11/blog-post.html' title='महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ४'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-5422749421104764972</id><published>2010-11-03T18:36:00.002+05:30</published><updated>2010-11-03T18:45:49.315+05:30</updated><title type='text'>महाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3</title><content type='html'>शांतनूला व सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. त्यानंतर थोड्या काळानेच शांतनूचा मृत्यु झाला. ठरल्याप्रमाणे चित्रांगद राजा झाला. हा शूर होता. भीष्माला त्याने सत्तेपासून दूर ठेवले असावे. त्याचा विवाह झाल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे पत्नी वा अपत्याचे नाव नाहीच. त्याचे व चित्रांगद याच नावाच्या गंधर्वाचे कुरुक्षेत्रात युद्ध झाले. &lt;strong&gt;तीन वर्षे एवढा दीर्घ काळ चाललेल्या या युद्धात &lt;/strong&gt;भीष्माने कोणताही भाग घेतला नाही. असें कां झालें असावें? एक तर चित्रांगदाने भीष्माला खड्यासारखे दूर ठेवले असावे किंवा भीष्म कुरुकुळांत राहत असूनहि पूर्ण अलिप्त झाला असावा. महाभारत याबाबत काहीच सांगत नाहीं. युद्धात चित्रांगद मारला गेला एवढेच म्हणतें. त्याला मदत न केल्याबद्दल सत्यवतीनेहि भीष्माला दोष दिलेला नाही! हे प्रकरण जरासे धूसरच आहे!&lt;br /&gt;चित्रांगदानंतर विचित्रवीर्य राजा झाला. (असे ’विचित्र’ नाव त्याला कां दिले असावे?). त्या वेळेला तो वयाने लहान असावा. तो मात्र भीष्माच्या कलाने वागत होता असे दिसते. काही काळानंतर त्याला भार्या मिळवून देण्यासाठी भीष्म काशिराजाच्या तीन मुलींच्या स्वयंवराला गेला. मात्र एकटाच! विचित्रवीर्याला बरोबर नेलेच नाही! ब्रह्मचर्याचा गाजावाजा झालेल्या भीष्माला स्वयंवरमंडपात एकटाच पाहून साहजिकच त्याची बरीच टिंगल झाली. तिन्ही मुलींना पळवून आणावयाचे असाच भीष्माचा बेत होता म्हणूनच बहुधा विचित्रवीर्याचे लोढणे त्याने बरोबर बाळगले नसावे. विचित्रवीर्यामध्ये काहीतरी जन्मदोष असावा व त्यामुळे त्याला सुखासुखी योग्य भार्या मिळण्यात अडचण पडेल असे दिसल्यामुळेच असा आडमार्ग भीष्माला पत्करावा लागला असावा. ठरवलेल्या बेताप्रमाणे भीष्माने केले. सर्व चिडलेल्या राजांशी यशस्वी सामना केला. एकट्या शाल्वाने अंबेला सोडवण्यासाठी निकराचे युद्ध केले पण त्याचाहि निभाव लागला नाही. मात्र भीष्माने त्याला न मारतां जिवंत सोडले. या प्रसंगात भीष्माने शौर्य प्रगट केले. शाल्व हेहि एक कुळ असावे व त्यातील पुरुषांना शाल्व म्हणत असावे कारण पुढे खूप दीर्घ काळानंतर, कृष्ण व शाल्व यांचे वैर व युद्ध झाले. तेव्हा तो शाल्व हा या कथेतील शाल्वाचा वंशज असला पाहिजे. अंबेच्या इच्छेप्रमाणे भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले पण त्याने तिला स्वीकारले नाही. ती भीष्माकडे परत आली व ‘तुम्ही माझा हात धरलात म्हणून शाल्व मला स्वीकारीत नाही तेव्हा आता तुम्हीच माझा स्वीकार करा’ असे विनवले पण भीष्मानेहि प्रतिज्ञेमुळे तिला स्वीकारले नाहीच. तिची परवड झाली. अंबेने परशुरामाकडे तक्रार नेली आणि तिच्या वतीने खुद्द परशुरामाने आव्हान दिल्यामुळे त्याच्याशी झालेल्या युद्धात परशुरामालाही भीष्माने दाद दिली नाही. परशुरामाने अंबेला सांगितले कीं ’तुझ्यासाठी मी आणखी काही करूं शकत नाहीं, तुझे तूं पहा!’ या युद्धानंतर भारतीय युद्धापर्यंत एकाही प्रसंगात भीष्माचे शौर्य &lt;strong&gt;विशेषत्वाने&lt;/strong&gt; प्रगट झालेले नाही! कौरव राज्याच्या वतीने त्याने अश्वमेध वगैरे केला नाही वा कोणा राजाचे पारिपत्य करून राज्य विस्तारहि  केलेला नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-5422749421104764972?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/5422749421104764972/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=5422749421104764972' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5422749421104764972'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5422749421104764972'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/11/3.html' title='महाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-3774584845856696373</id><published>2010-10-28T17:57:00.000+05:30</published><updated>2010-10-28T18:21:56.709+05:30</updated><title type='text'>महाभारतातील भीष्मचित्रण - भाग २</title><content type='html'>देवव्रत (भीष्माचे खरे नाव)तरुण झाला, पित्याने त्याला यौवराज्याभिषेकहि केला अन मग, चार वर्षे गेल्यावर, उतारवयाच्या पित्याची सत्यवतीशीं विवाह करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याने सर्वस्वाचाच त्याग केला. आपण विवाह व संसाराच्या बंधनात अडकून पडावयाचे नाही असे त्याचे आधीच ठरले असावे अशी मला शंका येते कारण त्याच्या विवाहाचा विचारहि शांतनूने अद्याप केला नव्हता. त्याच्या या विचारांची शांतनूला बहुधा कल्पना आली असावी आणि त्यामुळे याचेकडून आपला वंश चालू राहण्याची त्याला उमेद राहिली नसावी. सत्यवतीशीं उतार वय असूनहि विवाह करावा असें आपल्याला कां वाटते याचे त्याने पुत्राशी केलेले स्पष्टीकरण वाचले म्हणजे ही शंका बळावते. सर्वच क्षत्रिय राजांना शिकारीचा नाद असताना ’तुला शिकारीचा फार नाद आहे आणि तूं नेहमीं शस्त्र घेऊन फिरत असतोस त्यामुळे तुझ्या जीवनाची शाश्वति नाही’ असे तो देवव्रताला म्हणतो हे नवलाचे नव्हे काय? आपल्याकडून वंश टिकण्याची पित्याला उमेद नाही तेव्हां त्याला पुन्हा विवाह करून वंशवृद्धि करावयाची आहे तर ते होऊ द्यावे, आपण त्याआड येऊ नये उलट सत्यवतीला व तिच्या पित्याला हवे असलेले आश्वासन द्यावे असे देवव्रताला वाटले काय? महाभारतात वर्णन केलेल्या घटनांचे असेहि एक स्पष्टीकरण असूं शकतें! मला तें जास्त नैसर्गिक वाटते.&lt;br /&gt;सत्यवती ही उपरिचर या क्षत्रिय राजाची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होती. (महाभारतातील वर्णन, उपरिचराच्या वीर्यापासून एका मत्स्यीला झालेली कन्या, असें आहे तें अर्थातच रूपकात्मक आहे.) मात्र राजकुळात न वाढता ती धीवर कुळात वाढली होती. ऋषि पराशराने तिची अभिलाषा धरून तिच्या पदरांत एक पुत्र टाकून मग तिला सोडून तपश्चर्येचा मार्ग धरला होता. पुत्र व्यास याला सत्यवतीने धीवरकुळांतच वाढवले. व्यास ’मोठा झाल्यावर’ मातेची अनुज्ञा घेऊन आपल्या मार्गाने गेला असा उल्लेख आहे. शांतनू सत्यवतीच्या प्रेमात पडला तोवर तीहि लहान राहिलेली नव्हती असे त्यामुळे म्हणावे लागते. तिचा विवाह कोणातरी थोर क्षत्रियाशींच व्हावा असा तिच्या धीवर पालक पित्याचा हेतु होता. म्हणून त्याने एका थोर ऋषीला नकारहि दिला होता. राजा उपरिचर व सत्यवतीचा धीवर पालक यांची भेट होत असे असें महाभारत म्हणतें व शांतनूशीं सत्यवतीचा विवाह व्हावा अशी उपरिचराचीहि इच्छा होती. प्रष्न फक्त तिच्या पुत्राला राज्य कसें मिळणार हा होता! तो देवव्रताने पूर्णपणे सोडवला व भीष्म ही पदवी वा नाम मिळवले. धीवराला हवे असलेले, राज्यावर हक्क न सांगण्याचे आणि स्वत: ब्रह्मचर्यहि पाळण्याचे आश्वासनहि भीष्माने दिले व अखेरपर्यंत पाळले. जन्मभर कुरुकुळातच राहण्याचे व कुळाचे हित जपण्याचे वचन काही सत्यवतीच्या पित्याने मागितलेले नव्हते व भीष्माने दिलेले नव्हते. मात्र तो हस्तिनापुर सोडून कोठेच गेला नाही. स्वत: संसारात न पडूनहि सर्व सांसारिक सुखे व अनेक दु:खेहि त्याला भोगावी लागलीच!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-3774584845856696373?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/3774584845856696373/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=3774584845856696373' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3774584845856696373'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3774584845856696373'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/10/blog-post_28.html' title='महाभारतातील भीष्मचित्रण - भाग २'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-7578538307710917091</id><published>2010-10-25T10:57:00.000+05:30</published><updated>2010-10-25T11:28:24.441+05:30</updated><title type='text'>महाभारतातील भीष्मचित्रण - भाग १</title><content type='html'>आज नव्या विषयाला आरंभ करीत आहे.&lt;br /&gt;महाभारतात आरंभापासून अखेरपर्यंत वावरलेले एक प्रमुख पात्र म्हणजे भीष्म. आपल्या मनात भीष्माबद्दल फार आदरभाव असतो. तो अयोग्य वा अकारण आहे असे मुळीच म्हणतां येणार नाही. मात्र सर्व कथेमध्ये ज्या ज्या प्रसंगांत त्याची उपस्थिति आहे त्या अनेक प्रसंगांतील त्याचे वर्तन काही वेळा अनाकलनीय वाटते, त्याची संगति लागत नाही. अर्थात कल्पनारम्य वर्णने वा अद्भुतरस बाजूला ठेवून या विविध प्रसंगांकडे मानवी पातळीवरून पाहिले म्हणजे काही प्रष्नचिन्हे उभी रहातात. या दृष्टिकोनातून भीष्मकथेचा विस्ताराने आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.&lt;br /&gt;भीष्माची जन्मकथा महाभारतात खूप विस्ताराने सांगितलेली आहे. ती शब्दश: घेतली तर काही प्रश्न नाही पण अद्भुतरस बाजूला ठेवला व तर्क वापरावयाचे म्हटले म्हणजे काही प्रश्न पडतातच. भीष्माचा पिता शांतनु, प्रतीप या त्याच्या पित्यानंतर राजा झाला. त्याचा जन्म त्याचा पिता प्रतीप खूप वृद्ध झाल्यावर झाला होता. प्रतीपाला देवापि व बाल्हीक असे दुसरे दोन पुत्र होते असेहि म्हटलेले आहे. देवापि राज्याचा लोभ सोडून तपश्चर्येला गेला होता. बाल्हीक व शांतनु दोघेहि राजे झाले असेहि एके ठिकाणी म्हटले आहे. मात्र बाल्हीक हस्तिनापुराचा राजा झाला नाही. त्याचे राज्य कोठे होते हे स्पष्ट नाहीं. बाल्हीक या नावाचा महाभारतात अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगी उल्लेख आहे. कुरूंच्या दरबारात त्याचे अस्तित्व वेळोवेळी जाणवते ते थेट भारतीय युद्धापर्यंत. खुद्द भीष्मच युद्धापर्यंत खूप वृद्ध झाला होता मग त्याचा काका युद्धात होता? बहुधा त्याच्या वंशातील सर्वच पुरुषांचा ’बाल्हीक’ असाच उल्लेख होत असावा. (बाल्हीक म्हणजे अफगाणिस्तानातील ’बल्ख’ शहर असे एक मत वाचलेले आहे.)&lt;br /&gt;शांतनूने राजा झाल्यावर छत्तीस वर्षे स्त्रीसुखाचा अनुभव घेतला पण त्याला तेव्हां अपत्य झाल्याचा उल्लेख नाही. त्याची पत्नी मृत झाली असे मात्र म्हटलेले नाही. त्यानंतर &lt;strong&gt;गंगा ही नदी मानव शांतनूची पत्नी &lt;/strong&gt;झाली. ती ’नदी’ हे शब्दश: घेतले नाही तर ती गंगाकिनारच्या एखाद्या कुळातील मानव  स्त्री मानावी लागते. गंगेने स्वत:चे व शांतनूचे सात पुत्र जन्मत:च मारून टाकले. कां? तिचे कुळ मातृसत्ताक असल्याने अपत्य पुरुष असेल तर नष्ट करणे हा तिच्या कुळाचा रिवाज होता कीं काय? श्री. विश्वास दांडेकर यांनी ’धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ मध्ये असाच तर्क केला आहे व मला तो सयुक्तिक वाटतो. तिने शांतनूला वरताना अटच घातली होती कीं ’मी करीन त्या कोणत्याही कृत्याला विरोध करावयाचा नाही, तसे केल्यास मी तुला सोडून जाईन’ त्यामागे हेच कारण असावे. गंगेला, राजा महाभिषाला (शांतनु हा त्याचा अवतार) व अष्टवसूंना स्वर्गांत मिळालेल्या शापांची कथा हे एक रूपकच आहे. ही कथा या अपत्यनाशांचे (लंगडे) समर्थन करण्यासाठी उघडच रचलेली दिसते. पूर्वीचे अपत्य नसूनहि सात पुत्रांचा मृत्यु शांतनूने सहन केला हे नवलच. आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी मात्र, गंगा आपल्याला सोडून जाईल याची पर्वा न करतां, शांतनूने तिला ’एक पुत्र तरी राहूंदे’ असे विनवले म्हणून गंगेने त्याला न मारतां आपल्याबरोबर नेले पण ती शांतनूला सोडून गेलीच. कुमार वयाचा झाल्यावर तिने हा पुत्र देवव्रत पुन्हा शांतनूच्या स्वाधीन केला. त्याने वेदाभ्यास केला आहे व तो ज्ञानी आणि शूर आहे असे गंगा म्हणाली. मात्र परशुरामापाशी त्याने धनुर्विद्या शिकल्याचा येथे उल्लेख नाही. पण तो परशुरामशिष्य म्हणून मानला जातो. मग तो केव्हां परशुरामापाशी शिकला याचा उलगडा होत नाहीं. शांतनूकडे आल्यावर शिकला असावा. गंगेच्या मातृसत्ताक कुटुंबियांत तो वाढला याचा त्याच्या मनोवृत्तीवर काही परिणाम झाला काय? त्याने आमरण ब्रह्मचर्य पत्करले त्या मागे त्याच्या बालवयातील काही संस्कार कारण होते काय? प्रत्यक्ष मातेने केलेले पुत्रघात त्याला कळले असणारच शिवाय आईच्या जनसमुदायांत असे इतरहि प्रसंग घडले असतील ते पाहून आपल्याला गृहस्थाश्रम नकोच अशी त्याची मनोभूमिका झाली होती कीं काय अशी शंका येते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-7578538307710917091?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/7578538307710917091/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=7578538307710917091' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7578538307710917091'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7578538307710917091'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/10/blog-post_24.html' title='महाभारतातील भीष्मचित्रण - भाग १'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-5317382905729334871</id><published>2010-10-11T20:15:00.000+05:30</published><updated>2010-10-11T20:21:23.197+05:30</updated><title type='text'>नलदमयंतीकथा भाग ११</title><content type='html'>तिने आपल्या दासींना सांगितले कीं बाहुकाला पाणी वा विस्तव देऊं नका व तो स्वत:साठी अन्न कसे शिजवतो तें नीट पाहून मला सांगा. त्याने मांस शिजवले तर जमल्यास त्याचा नमुना माझ्यासाठी आणा. नलराजाला अग्नि व वरुण यांनी वर दिलेले असल्यामुळे जर बाहुक हाच नल असेल तर त्याचे पाणी वा अग्नि यावांचून अडणार नाहीं तसेंच नल पाकक्रियेत खास प्रवीण असल्यामुळे बाहुकाने मांस शिजवले तर त्याला नलाच्या हातची चव असेल अशा तिच्या अपेक्षा होत्या. त्याप्रमाणेच झाले. दासींनी येऊन सांगितले कीं त्याच्या चुलीत अग्नि आपोआप प्रगट झाला व कलशामध्ये जळहि आपोआप भरले! याचा तारतम्याने इतकाच अर्थ घ्यावयाचा कीं स्वयंपाकघरांतील सर्व क्रियांमध्ये नल प्रवीण होता व ही गोष्ट सर्वसामान्य पुरुषांना (त्याकाळींहि) सहजसाध्य नसल्याने बाहुकाचे नलाशीं साम्य दिसून आले. अजूनहि खात्री करण्य़ासाठी दमयंतीने आपल्या दोन्ही लहान मुलांना बाहुकाकडे पाठवलें व दासींना लक्ष ठेवण्यास सांगितले. मुलें दृष्टीस पडल्यावर बाहुकाला म्हणजे नलाला मन आवरतां आलें नाहीं व तो त्यांना कवटाळून रडूं लागला. हे ऐकून दमयंतीची जवळपास खात्री झाली पण रूप मुळीच जुळत नव्हते. नलाचे वेषांतर उत्तम जमले होते. अखेर दमयंतीने आईला विश्वासात घेऊन म्हटले कीं बाहुक हाच नल असला पाहिजे तेव्हां खात्री करण्यासाठी मला त्याची एकांतात भेट घेऊंदे. पित्याला काही न सांगतां आपल्या जबाबदारीवर तिने हे धाडस केले. प्रत्यक्ष भेटीत दमयंतीने स्पष्टच विचारल्यावर नलाचा नाइलाज झाला व त्याने मीच नल असें मान्य केलें. ’वनात तुला एकटीला टाकून गेलो कारण नाहींतर तूं मला सोडून माहेरीं गेली नसतीस व तूं हरप्रयत्नाने माहेरीं पोंचशीलच असा मला भरवसा होता’ असा खुलासा केला. मग वेषांतर टाकून स्वरूप धारण केले. ’तूं पुन्हा स्वयंवर करणार आहेस हे ऐकून मला काही सुचेना’ असे नल म्हणाला तेव्हां अर्थातच दमयंतीने खुलासा केला कीं ’हा सर्व, पित्यालाही न कळवतां, माझाच बेत होता आणि त्याचा हेतु फक्त एकच होता कीं तुम्हीच बाहुकरूपाने ऋतुपर्णापाशीं असाल तर फक्त तुम्हीच एक दिवसात येथे येऊन पोंचाल दुसर्‍या कोणासही हे शक्य होणार नाही हें मी खात्रीने जाणत होतें’ पतिपत्नींतील परस्पर विश्वासाचे हे एक उत्तम उदाहरण म्हटले पाहिजे.&lt;br /&gt;नलाने व दमयंतीने एकेकट्याने सोसलेल्या संकटांची हकीगत एकमेकांना सर्व सांगितली. दुसर्‍या दिवशीं नलदमयंतीने वडील माणसांस व ऋतुपर्णासहि सर्व हकिगत सांगितली. स्वयंवराबाबत फसवणूक झाल्याबद्दल बिलकुल राग न धरतां ऋतुपर्णाने दोघांचे अभिनंदन केले व ’नला मी तुला न ओळखून नोकराप्रमाणे वागवले याचे वाईट वाटते’ असे म्हटले. नलाकडून रथसंचालनात प्रावीण्य मिळवून ऋतुपर्ण परत गेला. दमयंतीच्या पित्यानेहि कन्या व जावई पुन्हा एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त केला व नलाचा आदरसत्कार केला.&lt;br /&gt;यथावकाश, द्यूतविद्येत नव्याने प्रावीण्य मिळवलेल्या नलाने आपल्या राजधानीला परत जाऊन पुष्कराला आव्हान दिले व द्यूतामध्ये विजय मिळवून सर्व गतवैभव जिंकून घेतले. मात्र पुष्कराला शासन न करतां क्षमा करुन राज्याबाहेर घालवले. &lt;br /&gt;येथे नलदमयंती कथा संपली. संकटपरंपरा कोसळली तरी कुलीन व गुणवंत व्यक्ति धैर्य न सोडतां योग्य कालाची वाट पाहून दीर्घ प्रयत्नाने पुन्हा गतवैभव प्राप्त करून घेऊं शकतात हा मथितार्थ युधिष्ठिराला पटवण्यासाठी बृहदश्वाने ही कथा त्याला सांगितली. त्या पासून योग्य तो बोधहि युधिष्ठिराने घेतला असे म्हणतां येईल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-5317382905729334871?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/5317382905729334871/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=5317382905729334871' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5317382905729334871'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5317382905729334871'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/10/blog-post_11.html' title='नलदमयंतीकथा भाग ११'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-9218519646274381560</id><published>2010-10-04T19:04:00.000+05:30</published><updated>2010-10-04T19:07:42.532+05:30</updated><title type='text'>नलदमयंतीकथा भाग १०</title><content type='html'>प्रवासामध्ये ऋतुपर्णाच्या आणखी एका विषयांतील प्रावीण्याचे प्रदर्शन झाले. तो गणनशास्त्रातहि प्रवीण होता. रथ भरवेगाने चालला असतां ऋतुपर्णाचे एक उपवस्त्र वार्‍याने उडाले तेव्हां तो बाहुकाला रथ थांबव असें म्हणाला. बाहुकाने म्हटलें कीं रथाच्या वेगामुळे ते आता फार मागे पडले आहे व पुन्हा मागे वळून जाण्यात फार वेळ जाईल. ऋतुपर्णाला गप्प बसणे भाग झाले. मग पुढे एक भलामोठा वृक्ष दिसल्यावर ऋतुपर्णाने ’या वृक्षावर अमुक इतकीं पानें आहेत’ असें म्हटलें. विश्वास न बसून, नलाने म्हणजे बाहुकाने रथ थांबवला व ’मी पानें मोजून पाहणार’ असें म्हणाला. ’यांत वेळ घालवला तर पोंचणार कसें’ असें ऋतुपर्णाने म्हटल्यावर एका फांदीची पाने मोजून पहावी असे ठरले. तीं ऋतुपर्णाच्या अंदाजाप्रमाणे बरोबर निघालीं! नल चाट झाला. हे वर्णन मजेशीर आहे. ही Sampling ची विद्या असावी, म्हणजे एका फांदीच्या पानांचा काळजीपूर्वक अंदाज घेऊन व एकूण वृक्षाचा विस्तार विचारात घेऊन सर्व पानांचा अंदाज घेणे असा कांहीतरी प्रकार असावा. एकमेकांना एकमेकांच्या विद्या देऊन रथ दमयंतीच्या गावी संध्याकाळपर्यंत पोंचला. तेथे स्वयंवर असल्याचा काही मागमूस दिसत नव्हता त्यामुळे ऋतुपर्ण चक्रावून गेला. दमयंतीव्या पित्याशी भेट झाल्यावर त्यालाही कळेना कीं राजा ऋतुपर्ण अचानक कशासाठीं आला आहे! त्याने ऋतुपर्णाला विचारल्यावर काय उत्तर द्यावे हा त्यालाही पेच पडला. ’मी निव्वळ आपणाला भेटण्यासाठी आलो आहे’ असे उत्तर देऊन त्याने वेळ मारून नेली. काय प्रकार आहे तें कळेलच असा विचार करून दमयंतीच्या पित्याने त्याला ’आज तुमचा प्रवास फार झाला आहे तेव्हां आराम करा, मग उद्यां बोलूं’ असे म्हटले. राजाची सोय लागली व वार्ष्णेय-बाहुक या जोडीचीहि रथशालेत व्यवस्था लागली. &lt;br /&gt;अपेक्षेप्रमाणे ऋतुपर्ण तातडीने येऊन पोंचला त्यामुळे दमयंतीची आशा बळावली. वार्ष्णेय तिला माहीतच होता पण बाहुक हाच नलराजा काय याची शहानिशा करणे आवश्यक होते. त्याचे बाह्यरूप तर नलासारखे मुळीच नव्हते. दमयंतीने त्यासाठी अनेक युक्त्या केल्या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-9218519646274381560?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/9218519646274381560/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=9218519646274381560' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/9218519646274381560'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/9218519646274381560'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/10/blog-post.html' title='नलदमयंतीकथा भाग १०'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-777170250228996672</id><published>2010-09-25T22:09:00.000+05:30</published><updated>2010-09-25T22:20:55.369+05:30</updated><title type='text'>नलदमयंतीकथा  भाग ९</title><content type='html'>वडिलाच्या पदरीं असलेल्या काहीं ब्राह्मणांना तिने नलाचा शोध घेण्यासाठीं सर्व दिशांना पाठवलें. कोणा एका पतीने वनात पत्नीला एकटीला सोडून दिल्याचे व तिच्या झालेल्या हाल अपेष्टांचे वर्णन करणारे एक कवन त्याना शिकवून ’ते अनेकांना ऐकवा व कोणाचा काही प्रतिसाद मिळाला तर येऊन मला सांगा’ असे त्याना सांगितले. सर्व जण हात हलवीत परत आले पण पर्णाद नावाच्या एका ब्राह्मणाने मात्र म्हटले कीं मी राजा ऋतुपर्णाच्या राजधानीला गेलो होतो व तुमचे काव्य ऐकवले असतां राजाचा बाहुक नावाचा एक सारथी व्याकुळ होऊन त्याने उद्गार काढले कीं ’उच्चकुळांतील स्त्रिया संकटे कोसळलीं म्हणून धीर सोडत नाहीत वा पतीला दोष देत नाहीत. पत्नीला ज्याने एकटे सोडले त्या पतीला तसेच काही कारण झाले असेल. त्या पत्नीने पतीवर राग धरूं नये’ हे ऐकून दमयंतीला तो नल तर नव्हे अशी शंका आली पण त्या सारथ्याचे रूपगुण नलासारखे मुळीच नव्हते असे त्या ब्राह्मणाच्या वर्णनावरून दिसत होते.  फक्त तो रथचालनात प्रवीण आहे व पाककलेतहि तज्ञ आहे एवढे वर्णन नलाशीं जुळते होते. तेव्हां खरें काय हे कळण्यासाठी आईशी विचारविनिमय करून पण वडिलांशी न बोलतां तिने एक नवीनच धाडसी युक्ति केली. सुदेव नावाच्या दुसर्‍या ब्राह्मणाला ऋतुपर्णाकडे निरोप देऊन पाठवलें कीं ’नलाचा शोध अजिबात लागत नसल्यने दमयंतीने पुन्हा स्वयंवर ठरवले आहे मात्र ते उद्यांच आहे तेव्हां वेळेत आमच्या राजधानीला पोचता येते का पहा.’ हा निरोप इतर कोणा राजाकडे अर्थातच पाठवलेला नव्हता. बाहुक हाच नल असेल तर त्याच्या रथचालनाच्या अद्वितीय कौशल्याने ऋतुपर्ण येऊन पोंचेल व बाहुकाला प्रत्यक्ष पाहतां येईल असा तिचा विचार होता.&lt;br /&gt;सुदेव त्याप्रमाने ऋतुपर्णाच्या राजधानीला जाऊन त्याला भेटला व निरोप सांगितला. ऋतुपर्णाने बाहुकाला म्हटले कीं ’इतक्या थोड्या वेळांत इतके दूर कसें पोंचतां येईल?’ बाहुकाला दमयंतीचा पुन्हा स्वयंवराचा बेत ऐकून फार दु:ख झाले पण स्वत:च्या रथसंचालनाच्या अभिमानापोटीं त्याने ऋतुपर्णाला म्हटलें की तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला नेऊन पोंचवीन! ऋतुपर्ण बाहुक व वार्ष्णेय तिघेही निघाले. नलाने अश्वशाळेतील स्वत: पारख केलेले दिसायला हाडकुळे पण तेजस्वी घोडे रथाला जोडले. घोडे पाहून ऋतुपर्णाला शंका वाटली. नलाने म्हटलें कीं माझी निवड तुम्हाला पटत नसली तर तुमच्या पसंतीचे घोडे जोडा आणि वार्ष्णेयाला घ्या, तोहि उत्तम सारथ्य जाणतो. ऋतुपर्ण मुकाट बसला.&lt;br /&gt;राजा ऋतुपर्ण हा द्यूतविद्येत व गणनाशास्त्रात प्रवीण होता. नल रथसंचालनात व अश्वपरीक्षेत तज्ञ होता. नलाचे द्यूतातील अज्ञान दूर झाल्याखेरीज त्याला आपले राज्य व वैभव पुष्कराकडून परत मिळवता येणार नव्हते. नलाच्या वेष पालटून ऋतुपर्णाच्या पदरीं नोकरी करण्यामागे त्याचेकडून अक्षविद्या प्राप्त करून घ्यावी हा हेतु असावा. कदाचित कर्कोटकानेच त्याला ही कल्पना सुचवली असावी असा तर्क सयुक्तिक वाटतो. प्रवासात वाटेतच हे विद्येचे आदानप्रदान झाले असे वर्णन महाभारतात आहे. कदाचित नलाच्या ऋतुपर्णाच्या सेवेत असण्याच्या काळात ते वेळोवेळी झाले असेल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-777170250228996672?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/777170250228996672/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=777170250228996672' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/777170250228996672'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/777170250228996672'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/09/blog-post_25.html' title='नलदमयंतीकथा  भाग ९'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-6703722348063115683</id><published>2010-09-21T19:25:00.000+05:30</published><updated>2010-09-21T19:31:07.929+05:30</updated><title type='text'>नलदमयंतीकथा भाग ८</title><content type='html'>नल व दमयंती वेगळ्या मार्गाला लागलीं. नल आपल्याला एकटी सोडून गेला हे कळल्यावर, हिंम्मत न सोडतां, अरण्यांतून अनेकानेक संकटांना तोंड देत प्रवास करून दमयंती अखेर आपल्या पित्याच्या घरीं पोंचली. या सर्व संकट परंपरेचे मी वर्णन करीत नाहीं. मात्र हे सर्व होऊनहि दमयंतीचे नलावरचे प्रेम कणभरहि कमी झाले नाहीं! त्याचे काय झाले असेल व तो आपल्याला पुन्हा कसा भेटेल याचीच चिंता तिला लागून राहिली. इकडे नलाचीहि पाठ संकटांनी सोडली नाहीं. अर्ध्या वस्त्राने वनात फिरताना त्याला कर्कोटक नाग डसला व त्याचे सुंदर रूपच क्षणात नष्ट झाले. मात्र कर्कोटकाने त्याला म्हटलें ’ मी मुद्दामच असे केले कारण काही काळ तरी तुला विजनवासात काढावा लागणार आहे तर निदान तुझी ओळख कुणाला पटूं नये. योग्य वेळीं माझ्या कृपेने तुला तुझे मूळ रूप प्राप्त होईल.’ कर्कोटक नागाचा दंश हेहि माझ्या मते एक रूपकच आहे. खुद्द नलालाच आपण काळ अनुकूल येईपर्यंत अज्ञात रहाणे आवश्यक आहे हे लक्षात येऊन त्याने रूप व वेष पालटला असावा. (वनातील कर्कोटक नावाच्या नागकुळातील पुरुषाने त्याला साह्य केले.) तसे करून नलहि वनातून भटकत अखेर त्याच ऋतुपर्ण राजापर्यंत पोचला. त्याच्या दीर्घकाळच्या सारथ्याने, वार्ष्णेयाने, त्याला ओळखले नाही. स्वत: नलहि रथसंचालनाच्या कामात महान तज्ञ होता. त्याने ऋतुपर्णापाशीं सारथ्याची नोकरी धरली व तो व वार्ष्णेय दोघेहि जोडीने ते काम करत राहिले. नल अज्ञातवासात दु:खाने कालक्रमणा करीत होता व दमयंतीचे काय झाले असेल याची चिंता करत होता पण त्याला आशा वाटत होती कीं दमयंतीने हर प्रयत्नाने माहेर गाठले असेल. तसे झाले असेल तर ती आपल्या काळजीने चूर झाली असेल असेच त्याला वाटत होते. इकडे दमयंती पित्याच्या घरीं तुलनेने सुखात होती दोन्ही मुलेंहि तिच्या पाशीं सुखरूप होतीं पण नलाचे काय झालें असेल व पुन्हा त्याची भेट कशी होणार हा विचार तिला स्वस्थ बसूं देत नव्हता. तिने आपल्या परीने नलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-6703722348063115683?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/6703722348063115683/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=6703722348063115683' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6703722348063115683'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6703722348063115683'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/09/blog-post_21.html' title='नलदमयंतीकथा भाग ८'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-3098618303497123832</id><published>2010-09-16T20:13:00.000+05:30</published><updated>2010-09-17T22:59:08.537+05:30</updated><title type='text'>नलदमयंतीकथा भाग ७</title><content type='html'>पुष्कर व नल यांचे द्यूत अनेक दिवस चालले. कौरव-पांडवांच्या द्यूताप्रमाणे तें अर्ध्या दिवसांत संपले नाही. मात्र युधिष्ठिराप्रमाणेच नलही कायम हरतच होता पण द्यूत संपवीत नव्हता. राज्याच्या मंत्र्यांना भेटावयासहि त्याला सवड नव्हती. दमयंतीला काय करावे हे काहीच सुचत नव्हते. तिने नलाला निरोप पाठवले कीं ’इतकें धन गेलें व इतकेच शिल्लक आहे.’ परिणाम शून्य! शेवटीं तिने वार्ष्णेय नावाच्या विश्वासू सारथ्याला बोलावून घेऊन त्याच्या बरोबर आपल्या दोन्ही मुलांना माहेरीं पाठवून दिलें. वार्ष्णेयाला सांगितले ’मुलांना पोंचवून व रथ तेथेच सोडून तूं निघून जा कारण राजाला आतां तुझा उपयोग होईल असे दिवस राहिलेले नाहीत.’ वार्ष्णेयाने त्याप्रमाणे केलें. तो दुसर्‍या ऋतुपर्ण नावाच्या राजाचे पदरीं नोकरीला राहिला. इकडे दमयंतीने येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मनाची तयारी केली. सर्व धन संपत्ति हरून नल निष्कांचन झाला. पुष्कराने, नलाला (शकुनिप्रमाणेच)) ’दमयंतीला पणाला लाव’ असें सुचवलें. मात्र नलाने ती मर्यादा ओलांडली नाहीं. सर्वस्व हरल्यामुळे नल व दमयंती नेसत्या वस्त्रानिशी नगराबाहेर पडलीं. पाठोपाठ आलेल्या नगरजनाना परत पाठवून दोघें वनांत शिरलीं. नलाची दुर्दशा होऊनहि ’कली’चे समाधान झालेले नव्हते असे महाभारत म्हणते. &lt;br /&gt;रात्रीं उपाशींपोटीं वनात भटकत असताना दमयंतीला ग्लानि येऊन झोपली असताना नलाला तीन सोनेरी पक्षी जमिनीवर दाणे टिपताना दिसले. त्यांना पकडावे म्हणून नलाने नेसते वस्त्र सोडून त्यांच्यावर टाकले पण ते वस्त्रच घेऊन ते पक्षी उडून गेले. दमयंतीच्याच वस्त्राचा थोडा भाग फाडून घेउन नलाने तो कमरेला गुंडाळला. त्याने आधी दमयंतीला ’तूं माहेरीं या अमुक रस्त्याने जा’ असें दाखवले होतें पण अशा आपत्काळीं त्याला सोडून जायचे तिने साफ नाकारले होते. आतां अर्ध्या वस्त्रावर पाळी आली तेव्हां नलाने विचार केला कीं आपण हिला झोपेत असताना सोडून गेलो तर ही नाइलाजाने माहेरीं जाईल, आता दुसरा इलाजच नाहीं. म्हणून अतिशय दु:खी अंत:करणाने दमयंतीला तशीच एकटी, अर्ध्या वस्त्रांत व निद्रित अवस्थेत सोडून नल वेगळ्या रस्त्याने निघून गेला. ’कली’ने नलाला म्हटलें ’तुम्ही दोघें वस्त्रांत होतांत तेंहि मला पाहवलें नाहीं म्हणून द्यूताचे तीन फासेच मी पक्षीरूपाने तुझ्याकडे पाठवले होते, आतां माझे कार्य झाले तुझी पुरती दुर्दशा झाली.’ याचा अर्थ असा विचार नलाच्या मनात आला एवढाच घ्यावयाचा असे मला वाटते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-3098618303497123832?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/3098618303497123832/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=3098618303497123832' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3098618303497123832'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3098618303497123832'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/09/blog-post_16.html' title='नलदमयंतीकथा भाग ७'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-6264084400969351404</id><published>2010-09-03T20:32:00.000+05:30</published><updated>2010-09-03T20:38:59.665+05:30</updated><title type='text'>नलदमयंतीकथा भाग ६</title><content type='html'>विवाहानंतर सर्व राजे आणि देवहि परत निघाले. देवांना वाटेत ’कलि आणि द्वापर’ असे दोघे भेटले. हे देव वा मानव कोणीच नव्हते. या कोणी दैवी शक्ति होत्या. मात्र देवांना टाकून दमयंतीने मानव नलाला वरिलें याचे कलीला वैषम्य वाटलें व त्याने जाहीर केले कीं मी नलाला धडा शिकवीन. पुढे नल-दमयंतीवर जी अनर्थपरंपरा कोसळली त्याचे कारण खरेतर नलाचे आत्यंतिक द्यूतप्रेम होते पण त्या जबाबदारीतून त्याला मुक्त करण्यासाठी ’तो सर्व कलीचा प्रभाव होता’ असे त्याचे कारण दर्शविले गेले आहे. ’कलीचा प्रभाव’ म्हणजे काही काळपर्यंत स्वत:ची विवेकबुद्धि हरवून बसणे एवढेच म्हणावयाचे. &lt;br /&gt;नलदमयंतीचा संसार सुखाने चालला होता. त्याना दोन मुले झालीं. बराच काळ पर्यंत ’कली’ला आपला बेत साध्य करतां आला नाही. पण अखेर काळ नलाला प्रतिकूल झाला अन मग कलीने दावा साधला. नलाचा एक भाऊ होता. त्याचे नाव पुष्कर. तो नलाच्या राज्यात राहत होता असे म्हटलेले नाही. त्याचा व नलाचा काही झगडा झाला होता वा नलाने त्याचा अपमान करून त्याला राज्यातून हाकलून दिले होते असे म्हटलेले नाही आणि पुष्कराचे वेगळे राज्य होते असेहि म्हटलेले नाही. मग या पुष्कराने नलाशी वैर कां धरावें? ’कलीचा प्रभाव!’ एक दिवस अचानक हा पुष्कर नलाकडे आला आणि त्याने नलाला द्यूताचे आव्हान दिले. ते नलाने राजेलोकांच्या स्वभावाप्रमाणे स्वीकारले आणि मग ’कलीच्या प्रभावामुळे’ नलाची विवेकबुद्धि त्याला सोडून गेली. तो बेभानपणे द्यूताच्या संपूर्ण आहारीं गेला अन मग अनर्थपरंपरा सुरू झाली.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-6264084400969351404?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/6264084400969351404/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=6264084400969351404' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6264084400969351404'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6264084400969351404'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='नलदमयंतीकथा भाग ६'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-8722010695888414626</id><published>2010-08-19T19:51:00.000+05:30</published><updated>2010-08-19T19:54:40.699+05:30</updated><title type='text'>नलदमयंतीकथा भाग ५</title><content type='html'>स्वयंवर मंडपात सर्व राजे, राजपुत्र जमले. नलहीं त्यांत होताच. चारी देवांनी त्याच्या शेजारचींच आसने पकडलीं एवढेच नव्हे तर चारी देवांनी नलाचेच रूप धारण केले! मंडपांत एका ओळीत पांच नल बसलेले दिसत होते. दमयंती स्वयंवर मंडपांत आली. तिला नलालाच माळ घालावयची असल्याने इतर राजांकडे न पाहतां ती सरळ नल बसला होता तेथेच आली. पाहते तों पांच नल! तिला काही सुचेना. तिला अर्थातच कळले कीं चारी देवांनी नलाचें रूप घेतले आहे. खरा नल ओळखल्याशिवाय माळ घालतां येईना. मग तिने मनांतल्या मनांत देवांची प्रार्थना केली कीं मी मनाने नलालाच वरले आहे तेव्हां आतां दुसर्‍या कोणाला माळ घातली तर ती प्रतारण होईल तेव्हां देवांनो तुम्हीच मला खरा नल कसा ओळखावा तें सांगा. देवांना तिच्या शुद्ध प्रेमाची खात्री पटली व मग नलाचें रूप त्यानी टाकलें नाहीं पण अशीं लक्षणे प्रगट केलीं कीं त्यायोगें नलरूपी देव ओळखूं यावे आणि तिलाच तीं लक्षणे ओळखण्याचीहि प्रेरणा दिली. तीं लक्षणे अशीं कीं न्यांचे नेत्र स्थिर होते म्हणजे पापण्या व बुबुळे हलत नव्हतीं, त्यांच्या गळ्यांतील हारांचीं फुले एकजात सारखीच टवटवीत व धुळीचा कणहि न उडालेलीं होतीं, एकहि किंचितहि सुकलेले नव्हतें, त्यांचे पाय जमिनीला न टेकतां अधांतरी होते. त्यांचे चेहेर्‍यावर किंचितहि घाम नव्हता. खर्‍या नलराजाचे ठायीं अशीं लक्षणे अर्थातच नव्हतीं. सूक्ष्म निरीक्षणाने दमयंतीला खरा नल ओळखता आला व तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. लगेचच देवांनीहि नलाचें रूप टाकून ते स्वत:च्या नित्य रूपांत दिसूं लागले. सर्व उपस्थितांनाहि हा सर्व प्रकार पाहून आश्चर्य व आनंद वाटला. देवांनी नलाचे अभिनंदन केले व त्याला अनेक वर दिले. त्यांत मुख्य म्हणजे अग्नीने ’तुला पाहिजे तेव्हा व तेथे मी लगेच प्रगट होईन’ असा वर दिला व वरुणाने ’पाहिजे तेव्हां तुला जल प्राप्त होईल’ असा वर दिला. स्वयंवर संपून नल-दमयंतीचा यथासांग विवाह झाला.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-8722010695888414626?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/8722010695888414626/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=8722010695888414626' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8722010695888414626'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8722010695888414626'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/08/blog-post_19.html' title='नलदमयंतीकथा भाग ५'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-1885237847088154911</id><published>2010-08-14T19:51:00.000+05:30</published><updated>2010-09-18T12:15:34.847+05:30</updated><title type='text'>नलदमयंतीकथा भाग ४</title><content type='html'>दमयंतीच्या रूपगुणांचे वर्णन ऐकून चार देव तिच्या प्रेमांत पडून तिच्या स्वयंवराला चालले होते ते नलाला वाटेत भेटले. मानव स्त्रीच्या प्राप्तीसाठी प्रत्यक्ष देवच स्पर्धेत उतरले होते ही मोठी रमणीय कल्पना आहे. इंद्र, अग्नि, यम व वरुण हे ते चार देव. नलाला पाहून त्याचे रूप व गुण लक्षात आल्यावर आपल्याला काही चान्स नाही असेंच त्याना वाटले! मात्र प्रयत्न न सोडतां त्यांनी  एक डाव टाकला! त्यांनी खुद्द नलालाच आपला दूत बनवलें व सांगितलें कीं तूं दमयंतीला निरोप दे कीं आम्ही चौघे स्वयंवराला येणार आहों व आमच्या पैकींच एकाला तूं पसंत कर! देवांची आज्ञा त्यामुळे नलाला हे एक धर्मसंकट उभें राहिलें राहिलें! आपल्यापरीने त्याने ते टाळण्यासाठी सबब सांगितली कीं दमयंतीला मी एकांतात कसा भेटणार व निरोप सांगणार तेव्हां माफ करा. पण देवांना त्याची परीक्षाच पहावयाची होती. त्यांनी म्हटलें कीं आमच्या प्रभावाने तुला तिला भेटतां येईल. नाइलाजाने नलाला कबूल करावें लागलें. त्याप्रमाणे नल नगरांत गेल्यावर दमयंतीला भेटला व त्याने मन घट्ट करून देवांचा निरोप तिला सांगितला. दमयंती म्हणाली कीं मी तुम्हालाच वरण्याचा निश्चय केला आहे. नलाने पुन्हा म्हटलें कीं प्रत्यक्ष देवांना सोडून तूं एका य:कश्चित मानवाला कसें वरण्याची इच्छा करतेस? दमयंतीने सांगितलें कीं मी तुमच्या रूपगुणांवर लुब्ध होऊन तुम्हाला वरण्यासाठीच स्वयंवर मांडले आहे. नल पुन्हा म्हणाला कीं मी देवांच्या आज्ञेवरून दूत म्हणून तुला भेटतो आहें तेव्हां मला यश देण्यासाठीं तूं त्यांच्या इच्छेप्रमाणे कर. त्यांची अवकृपा न होतां तूं मला कसें वरणार? दमयंती म्हणाली कीं हे स्वयंवर आहे आणि मंडपात देवांच्या उपस्थितीतच मी तुम्हाला माळ घालीन म्हणजे तुम्हाला दोष येणार नाहीं. नल परत गेला व 'मी तुमचा निरोप दमयंतीला दिला पण तिने मलाच वरण्याचे ठरवले आहे! तेव्हा माझा नाइलाज झाला’ असें त्यांना म्हणाला.देवांनी दोघांचीहि परीक्षाच पहायचे ठरवले होते त्यामुळे त्यांनी नलाला माफ केले पण स्वयंवर मंडपात एक नवीनच युक्ति केली. ती पुढल्या भागात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-1885237847088154911?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/1885237847088154911/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=1885237847088154911' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1885237847088154911'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1885237847088154911'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/08/blog-post.html' title='नलदमयंतीकथा भाग ४'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-7608738138328496106</id><published>2010-06-16T11:59:00.000+05:30</published><updated>2010-06-16T12:03:28.309+05:30</updated><title type='text'>नलदमयंती कथा - भाग 3</title><content type='html'>नल हा निषध देशाचा राजा. त्याच्या अनेक गुणांचे ऋषि बृहदश्व यांनी वर्णन केले त्यांत तो सुंदर, अश्ववेत्ता, द्यूतप्रेमी, शूर, प्रजाहितदक्ष असल्याचे म्हटले आहे. दमयंती ही विदर्भ देशाची राजकन्या रूपवान व गुणवान होती. एकमेकांचे गुण कर्णोपकर्णी एकमेकांना कळून, प्रत्यक्ष न पाहतांच ती एकमेकांच्या प्रेमांत पडलीं होतीं. प्रेमविव्हल होऊन उपवनांत बसला असतां नलाने एका सोनेरी पंखांच्या हंसाला पकडले. त्याने विनवले कीं मला जिवंत सोडलेस तर मी दमयंतीला भेटून तिच्यापाशी तुझे गुणवर्णन करीन. नलाने त्याला सोडले व हंसाने देशांतराला जाऊन दमयंतीला भेटून नलाच्या रूपगुणांचे वर्णन तिला ऐकविले. ते ऐकून दमयंतीने ’तूं नलापाशी माझे वर्णन कर’ असे हंसाला म्हटले. त्याप्रमाणे हंसाने नलाकडे परत येऊन झालेली हकीगत त्याला सांगितली. हंस हा प्रेमदूत ही कल्पना कालिदासाच्या मेघदूतासारखीच आहे. महाभारत आधीचे, तेव्हां कालिदासाने नलदमयंतीच्या कथेवरून यक्षाने मेघाला दूत करण्याची कल्पना उचलली काय़? कसेहि असले तरी दोन्ही कल्पना रम्यच हे खरे.&lt;br /&gt;नलाचें हंसकृत वर्णन ऐकून दमयंतीचा प्रेमरोग बळावला! एकंदर लक्षणे पाहून तिच्या पित्याने तिचें स्वयंवर ठरवलें व सर्व राजेलोकांना आमंत्रणे धाडलीं त्यांत नलहि होताच. स्वयंवर आहे म्हटल्यावर मोठ्या आशेने नल स्वयंवराला निघाला. वाटेत काय झाले ती कथा फारच मजेशीर आहे. ती पुढल्या भागांत.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-7608738138328496106?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/7608738138328496106/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=7608738138328496106' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7608738138328496106'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7608738138328496106'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/06/3.html' title='नलदमयंती कथा - भाग 3'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-6863764759830423167</id><published>2010-06-04T12:15:00.000+05:30</published><updated>2010-06-04T12:17:59.541+05:30</updated><title type='text'>नलदमयंती कथा - भाग २</title><content type='html'>बृहदश्वाने ही कथा युधिष्ठिराला कां ऐकविली याचे कारण असे कीं बृहदश्वापाशी युधिष्ठिराने गार्‍हाणे गाइले की ’फासे खेळण्यात पटाईत असलेल्या धूर्त जुगार्‍यांनी मला बोलावून माझे सर्व धन व राज्य हरण केले, मी अत्यंत दु:खी होऊन कष्टाने वनवास भोगीत आहे. माझ्या दु:खाने पीडित झालेल्या मित्रांचीं संतापजनक भाषणे माझ्या हृदयात आहेत. अस्त्रविद्या मिळवण्यासाठी मी अर्जुनाला दूर पाठवले आहे पण त्याच्या विरहाने आम्ही हवालदिल आहोत. माझ्यासारखा दुसरा कोणी भाग्यहीन राजा या पृथ्वीवर असेल काय? आपण अशा कोणाला पाहिले आहे काय? माझ्यापेक्षा दु:खी दुसरा कोणी नसेल.’&lt;br /&gt;त्यावर बृहदश्वाने म्हटले कीं ’तुला वाटते तसे नाहीं. तुझ्याहूनहि भाग्यहीन आणि दु:खी राजाची कथा तुला सांगतो. निषध देशाच्या वीरसेन राजाचा पुत्र नला, जो धर्मार्थवेत्ता होता, तो बंधु पुष्कराकडून द्यूतांत जिंकला गेला आणि त्याने पत्नीसह वनवासाचे दु:ख भोगले. त्याच्या बरोबर सेवक, रथ, बंधुबांधव नव्हते. त्याच्याजवळ यापैकीं कांहींच राहिले नव्हते. तूं तर वीरबंधूंनी युक्त असून श्रेष्ठ व विद्वान ब्राह्मणांनीहि वेढलेला आहेस तेव्हां तूं शोक करणे योग्य नाहीं’&lt;br /&gt;आपली विपत्ति ज्यालात्याला असह्य वाटते पण आपल्याहूनहि अधिक विपत्ति भोगलेले व भोगत असलेले अनेक असतातच त्यांचेकडे पाहून विवेकाचा आश्रय करणे हेच उचित हे चिरंतन सत्य येथे या संवादानिमित्ताने समॊर मांडलेले आहे. महाभारतात असा वैचारिक अनुभव जागोजागीं येतो. त्यासाठी श्रद्धेवांचून अडत नाहीं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-6863764759830423167?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/6863764759830423167/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=6863764759830423167' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6863764759830423167'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6863764759830423167'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/06/blog-post_03.html' title='नलदमयंती कथा - भाग २'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-5871126698776455311</id><published>2010-06-01T18:12:00.000+05:30</published><updated>2010-06-01T18:31:38.544+05:30</updated><title type='text'>नलदमयंती कथा - भाग १</title><content type='html'>पुन्हा सुरवात करताना काय लिहावे असा विचार करताना नल-दमयंतीची कथा नजरेसमोर आली. या कथेत अद्भुत भाग पुष्कळ आहे मात्र तरीहि काही नवीन दृषिकोनातून लिहिता येईल असे वाटल्यामुळे सुरवात करीत आहे. आपल्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहेच.&lt;br /&gt;महाभारतातील हे एक अप्रतिम उपाख्यान आहे. यातील अद्भुत भाग सोडून जर कोणी पटकथा लिहिली तर एक सुंदर सिनेमा बनेल. अद्याप माझ्या माहितीप्रमाणे कोणी केलेला नाही.&lt;br /&gt;पांडव द्यूतात हरून बारा वर्षांच्या वनवासात गेल्यावर कौरवांवर सूड उगवण्यासाठी द्रौपदी व भीम उतावळे झाले होते. तेरा वर्षे फुकट न घालवतां लगेच कौरवांवर चाल करावी असा त्यांचा आग्रह होता. द्यूताचा कैफ उतरल्यावर युधिष्ठिराला मात्र परिस्थितीचे उत्तम भान होते. भीम, द्रौपदी, कृष्ण, यादव, पांचाल यांनी कितीहि भरीस घातले तरी १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास हा पण मोडून ताबडतोब युद्धाला उभे राहण्यास तो मुळीच तयार नव्हता. मात्र वचन मोडावयाचे नाही या विचाराबरोबरच दुसरे मुख्य कारण म्हणजे लगेच युद्ध उभे केले तर भीष्म-द्रोण पूर्ण ताकदीने कौरवांची बाजू घेतील, इतर अनेक महावीर (त्यांत प्रमुख कर्ण, अश्वत्थामा, भूरिश्रवा) दुर्योधनाच्या मदतीला आहेत व विजय सहजीं मिळणार नाही हे तो जाणून होता. आरण्यकपर्वातील अध्याय ३६ मध्ये श्लोक १ ते २० मध्ये त्याने हे भीमाच्या गळीं उतरवले आहे ते मुळातून वाचण्यासारखे आहे. आपली बाजू बळकट करण्यासाठी, व्यासांच्या सांगण्याप्रमाणे, अर्जुनाला अस्त्रविद्येतील पुढील शिक्षणासाठी व तपाचरण करून देवांना संतुष्ट करण्यासाठी त्याने दूर पाठवले व ’तुझ्यावर आमचा सर्व भार आहे आणि भीष्म-द्रोणांच्यापेक्षा जास्त अस्त्रज्ञान तुझ्यापाशी आल्याशिवाय आपला विजय होणार नाही’ याची त्याला स्पष्ट कल्पना दिली. अर्जुनाने प्रत्यक्ष महादेव व इंद्र यांचकडून नवीन अस्त्रविद्या संपादन केली. (माझ्या मतें त्याने ती वनातील अनार्य - किरात - योद्ध्यांकडून मिळवली! मात्र युद्धाचे प्रारंभीं ’माझ्यापाशीं जी अस्त्रे आहेत त्यांचे ज्ञान भीष्माला वा द्रोणालाहि नाहीं’ असें तो अभिमानाने त्यामुळेच म्हणूं शकला.) नंतर तो स्वर्गात इंद्रापाशी आहे असे व्यासांकडून पांडवांना कळले व ते त्याच्या परत येण्याची वाट पाहात होते. अशा काळात एकदां बृहदश्व नावाचे एक ऋषि पाडवांकडे आले. त्यांनी नल-दमयंतीची कथा पांडवांना ऐकवली. ती पुढील भागांत पाहूं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-5871126698776455311?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/5871126698776455311/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=5871126698776455311' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5871126698776455311'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5871126698776455311'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/06/blog-post.html' title='नलदमयंती कथा - भाग १'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-4051597862013502263</id><published>2010-04-27T18:03:00.000+05:30</published><updated>2010-04-27T18:09:13.834+05:30</updated><title type='text'>पुन्हा सुरवात?</title><content type='html'>मित्रानो नमस्कार.&lt;br /&gt;अमेरिकेतून भारतात परत आलो आहे. महाभारतातील बर्‍याच विषयांवर लिहून झाले. नवीन लेखन केव्हांच बंद झाले. नवल म्हणजे अजूनहि हा ब्लॉग उघडून वाचला जातो आहे. तेव्हां पुन्हा सुरवात करून काही लिहावे असे वाटते पण थोडी तयारी झाल्याशिवाय काय लिहिणार? प्रयत्न करणार आहे पण थोडी वाट पहाल अशी आशा आहे.&lt;br /&gt;प्र. के. फडणीस&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-4051597862013502263?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/4051597862013502263/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=4051597862013502263' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4051597862013502263'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4051597862013502263'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='पुन्हा सुरवात?'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-3756803238365984657</id><published>2009-03-03T21:39:00.000+05:30</published><updated>2009-03-03T21:50:32.818+05:30</updated><title type='text'>स्फुट प्रकरणे - भाग ६</title><content type='html'>&lt;strong&gt;रुरु आणि प्रमद्वरा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;महाभारताच्या आदिपर्वात सुरवातीला भृगुऋषींच्या कुळातील अनेक व्यक्तींच्या कथा आहेत. त्यांतील एक पुरुष म्हणजे रुरु. भृगूचा पुत्र च्यवन, त्याचा पुत्र प्रमति व त्याला घृताची नावाच्या अप्सरेपासून झालेला पुत्र म्हणजे रुरु. रुरुचा पुत्र शुनक व नातू शौनकऋषि. हा ऋषि व त्याचे सहकारी यांनी एक द्वादशवर्षीय यज्ञसत्र केले. त्या सत्रासाठी जमलेल्या अनेक ऋषिमुनींना, संध्याकाळच्या वेळी, सूत लोमहर्षण याचा पुत्र, सौति नावाचा पुराणिक, मनोरंजनासाठी अनेक कथा सांगत असे. पूर्वी व्यासांनी परीक्षितपुत्र जनमेजयाला त्याच्या पूर्वजांच्या कथा सांगितल्या होत्या. तो मूळ ’जय’ग्रंथ. (परीक्षित हा पांडवांचा नातू अभिमन्यूचा पुत्र. आपला मृत्यु समीप आल्यावर त्याला युधिष्ठिराने हस्तिनापुराच्या राज्यावर स्थापित केले होते.) त्या ’जय’ ग्रंथांतिल कथा सौतीने खूप विस्ताराने सांगितल्या व ’जय’चे महाभारत झाले. असा रुरूचा महाभारताशी दूरचा संबंध आहे. &lt;br /&gt;रुरुला शुनक हा पुत्र प्रमद्वरा या त्याच्या पत्नीपासून झाला. &lt;strong&gt;रुरु आणि प्रमद्वरा &lt;/strong&gt;यांची कथा ही एक प्रेमकहाणीच आहे.&lt;br /&gt;विश्वावसु नावाच्या गंधर्वराजापासून मेनका अप्सरेला प्रमद्वरा ही कन्या झाली. मात्र जन्मत:च मेनकेने तिला स्थूलकेश नावाच्या ऋषीच्या आश्रमाजवळ नदीकाठी ठेवून दिले व ती ’निर्घृण व निर्लज्ज स्त्री’ (महाभारतकारांचे वर्णन) खुशाल चालती झाली. तीच ही मेनका, जिने शकुंतलेला असेच जन्मत:च कण्वमुनींच्या आश्रमापाशी सोडून दिले होते! यावेळींहि तिच्या कन्येला स्थूलकेश ऋषींनी उचलले व तिचा सांभाळ केला व लहानाची मोठी केली. ती रूपवान व गुणवान असल्यामुळे तिचे प्रमद्वरा असे नाव पडले. &lt;br /&gt;रुरु हा एक विद्वान ऋषि होता. एकदा प्रमद्वरा काही कारणाने रुरूच्या नजरेला पडली व त्याचे तिच्यावर प्रेमच जडले. त्याने मित्रांतर्फे ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. त्यांनी स्थूलकेशाकडे प्रमद्वरेसाठी रीतसर मागणी घातली व ती मान्य होऊन रुरु व प्रमद्वरा यांचा विवाह ठरला. मात्र विवाह होण्यापूर्वी काही दिवस आधी, प्रमद्वरा मैत्रिणींसह क्रीडा करत असताना चुकून तिचा पाय एका झोपलेल्या भुजंगावर पडला. त्याने तिला दंश केला व ती कोसळली. अनेक ऋषि व रुरु जमा झाले पण ती गतप्राणच झाली. सर्वजण शोकमग्न झाले. रुरु एकटाच वनात जाऊन आक्रोश करत बसला. तिची आठवण काढून तो स्वत:शी म्हणत राहिला कीं माझ्या हातून जर तपश्चर्या, दान व गुरुसेवा घडली असेल तर माझी प्रिया जिवंत होवो. बराच काळ त्याने असा विलाप केल्यावर एक देवदूत आला व त्याला समजावूं लागला कीं ’हिचे आयुष्यच संपले आहे त्याला काय करणार? तुझे आयुष्य तूं तिला देतोस काय?’ रुरूने म्हटले कीं ’माझ्या उरलेल्या आयुष्यातील अर्धे आयुष्य तिला मिळो व ती जिवंत होवो’ (सर्व आयुष्य देऊन काय उपयोग कारण मग रुरुच मरून जाणार!) मग तो देवदूत व गंधर्वांचा राजा यमधर्माकडे गेले व त्यांनी रुरूसाठी रदबदली केली. यमानेहि ते मान्य केले. रुरूच्या उरलेल्या दीर्घ आयुष्यातील अर्धे प्रमद्वरेला मिळाले व ती जिवंत झाली! मग रुरु आणि प्रमद्वरेचा विवाह झाला.&lt;br /&gt;मात्र रुरूने सर्पांचा दीर्घद्वेष धरला व हातात दंड घेऊन, सापडेल त्या सर्पाला तो मारीत सुटला. एकदां एका निर्विष सर्पालाही तो मारूं पहात असताना त्या सर्पाने त्याला उपदेश केला कीं ’अशा तर्‍हेचे आचरण तुला ब्राह्मणाला शोभत नाही. तूं हे सोड. पूर्वी राजा जनमेजयाने पिता परीक्षित याचा मृत्यु तक्षक नागाच्या दंशामुळे झाला या रागापोटीं सर्पयज्ञ केला व अनेक सर्प यज्ञाग्नीत जळाले. सर्पकुल नष्ट होण्याची वेळ आली होती तेव्हां आस्तीक या ब्राह्मण ऋषीनेच त्याला थांबवले होते व सर्पकुल वांचवले होते. तसे वागणे हेच तुला शोभेल.’ त्याचे म्हणणे मानून रुरूने सर्प मारणे बंद केले. अशी ही रुरु-प्रमद्वरा यांची प्रेमकहाणी.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-3756803238365984657?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/3756803238365984657/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=3756803238365984657' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3756803238365984657'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3756803238365984657'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2009/03/blog-post.html' title='स्फुट प्रकरणे - भाग ६'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-6511077373505540882</id><published>2009-02-22T16:53:00.000+05:30</published><updated>2009-02-23T10:15:42.200+05:30</updated><title type='text'>स्फुट प्रकरणे - भाग ५</title><content type='html'>&lt;strong&gt;परशुराम कथा &lt;/strong&gt;&lt;br /&gt;महाभारतांतील  परशुरामकथा ही देखील आपल्या समजुतीपेक्षा थोडी निराळी आहे. &lt;br /&gt;परशुरामाचा पिता जमदग्नि. हा भृगुचा नातू व ऋचीकाचा पुत्र. तो वेदवेत्ता व सर्व शास्त्रांचा व शस्त्रांचाहि जाणकार होता. मात्र जमदग्नि म्हणजे शीघ्रकोपि अशी आपली समजूत असते तसा तो नव्हता! परशुरामाची माता रेणुका ही राजा प्रसेनजित याची कन्या म्हणजे क्षत्रियकन्या. रेणुका व जमदग्नि यांचे चार पुत्र, त्यांत परशुराम सर्वात लहान. स्नानासाठी नदीवर गेलेली असताना जलक्रीडा करीत असलेल्या राजा चित्ररथावर, ( कार्तवीर्यावर नव्हे!) क्षणभरासाठी कां होईना, रेणुकेचे मन गेले. त्या मानसिक व्यभिचाराने रेणुका निश्चेष्ट होऊन पाण्यात पडली. आश्रमात परत आली तेव्हां तिची अवस्था जमदग्नीने ओळखली व तिचा धि:कार केला. चारही पुत्र क्रमाने आश्रमांत आले तसतसे जमदग्नीने प्रत्येकाला आईला मारून टाकावयास सांगितले. मोठ्या तिघांनीहि नकार दिला. त्यांना पित्याने रागाने शाप दिले. चौथ्या परशुरामाने मात्र आज्ञेप्रमाणे परशूने आईचे मस्तक तोडले. जमदग्नीचा क्रोध एकदम शमला व त्याने परशुरामाला ’वर माग’ असे म्हटले. परशुरामाने मागितलेले वर लक्षणीय आहेत. ’आई जिवंत व्हावी, मी मारल्याची तिला स्मृति राहूं नये, मानसिक पापाचा स्पर्श तिला न व्हावा, भावांचे शाप परत घ्यावे, आणि स्वत: युद्धात अजिंक्य व दीर्घायुषी व्हावे’ असे ते वर होते. व ते सर्व पित्याने त्याला दिले. &lt;br /&gt;जमदग्नीचे सर्व पुत्र आश्रमाबाहेर गेले असताना एकदां राजा कार्तवीर्य सहस्रार्जुन आश्रमांत आला. रेणुकेने त्याचे योग्य ते स्वागत केले तरीहि त्याने आश्रमाचा विध्वंस केला. (जमदग्नीला मारले नाही!) परशुरामाने परत आल्यावर ते पाहून रागावून कार्तवीर्यावर चाल करून त्याचा वध केला. पुढे एकदा परशुराम आश्रमात नसताना पुन्हा कार्तवीर्याच्या पुत्रांनी आश्रमांत येऊन, जमदग्नीवर हल्ला करून त्याला मारून टाकले. परशुराम परत आल्यावर पितृहत्या पाहून त्याने फार विलाप केला व युद्ध करून त्याने सर्व कार्तवीर्य पुत्राना व त्यांच्या मदतनीस सर्व क्षत्रिय राजाना मारले. वारंवार झालेल्या युद्धांमुळे एकवीस वेळां पृथ्वी नि:क्षत्रिय झाली. नंतर यज्ञ करून परशुरामाने सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली. कश्यपाने त्याला आपल्याला दान केलेल्या भूमीवर वसती करण्यास मनाई केली. त्यामुळे परशुराम महेद्रपर्वतावर वसती करूं लागला. परशुरामाने नवीन वसवलेल्या कोकण भूप्रदेशात हा महेंद्रपर्वत असल्याचे मानले जाते. नंतर कधीहि परशुराम रात्री इतर कोठे राहत नसे. याचा इतरत्रहि उल्लेख आहे. रामाने शिवधनुष्य तोडले तेव्हां व भीष्माने अंबेचा स्वीकार करण्याचे नाकारले तेव्हां त्याने त्या दोघांना शिक्षा करण्याचा त्याने प्रयत्न केला पण दोन्ही प्रसंगी तो हरला. त्याचे बळ संपले होते व क्षत्रिय राजे पुन्हा प्रबळ झाले होते. या कथेप्रमाणे जमदग्नीच्या वधाचा दोष कार्तवीर्याला नव्हे तर त्याच्या पुत्रांना दिलेला आहे. तेव्हां ’सहस्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला’ हे दशावतार आरतीतील वर्णन बरोबर नाही!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-6511077373505540882?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/6511077373505540882/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=6511077373505540882' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6511077373505540882'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6511077373505540882'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2009/02/blog-post_22.html' title='स्फुट प्रकरणे - भाग ५'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-6336370205957112822</id><published>2009-02-07T19:52:00.000+05:30</published><updated>2009-02-07T20:11:19.150+05:30</updated><title type='text'>स्फुट प्रकरणे भाग ४</title><content type='html'>&lt;strong&gt;अणिमांडव्यांची कथा &lt;/strong&gt;&lt;br /&gt;मांडव्य नांवाचे एक विद्वान व पुण्यशील ऋषि तपश्चर्येसाठी ध्यानस्थ बसलेले असताना एक चोर त्यांचे आश्रमांत आला. व दडून बसला. पाठलाग करणार्‍या शिपायांनी मांडव्यांकडे चौकशी केली तेव्हा मौनव्रत असल्यामुळे ते काही बोलले नाहीत. चोर आश्रमांतच सांपडल्यावर रागाने शिपायांनी त्याचेबरोबर मांडव्यांनाहि पकडून राजापुढे उभे केले. अविचारी राजाने चोराबरोबर मांडव्यांनाही सुळावर चढवले. सुळावर चढवलेले मांडव्य बराच काळ पर्यंत यातना भोगत जिवंत राहिले. रखवालदारांनी राजाला हे कळवल्यावर त्याने अमात्यांशी चर्चा करून ऋषीना खाली उतरवले व क्षमायाचना केली. सुळावरून उतरवताना त्याचे टोक (अणि), तुटून ते मांडव्यांच्या शरीरात तसेच राहिले. त्यामुळे त्यांचे नाव अणिमांडव्य पडले. ऋषीनी राजाला क्षमा केली पण जेव्हा यमाच्या दरबारात गेले तेव्हा त्यानी यमालाच जाब विचारला कीं माझ्या कोणत्या घोर अपराधामुळे मला सुळावर यातना भोगाव्या लागल्या? यमाने उत्तर दिले कीं तूं लहान असताना एका पाखराला काडीने टोचले होतेस त्याचे फळ तुला भोगावे लागले.! &lt;br /&gt; या विलक्षण कथेचा पुढील भाग महत्वाचा आहे. मांडव्य ऋषीनी हे ऐकून यमधर्माला दोष दिला व शापहि दिला. मूल बारा वर्षांचे होईपर्यंत जें करील त्याला धर्म/अधर्म ठरवता येत नाही. कारण तोंवर त्याच्या बुद्धीला ती ताकद आलेली नसते. तेव्हा &lt;strong&gt;&lt;em&gt;मूल १४ वर्षाचे होईपर्यंत त्याच्या कृत्याची पापात गणना करू नये व त्याला शिक्षाही होऊ नये&lt;/em&gt;&lt;/strong&gt; असा दंडक त्यानी यमधर्माला घालून दिला! गुन्हा व शिक्षा यांचेमध्येहि प्रमाण राखले पाहिजे असाहि विचार त्याचेपुढे मांडला व ’माझ्या क्षुद्र पापाला एवढी कठोर शिक्षा तूं कशी दिलीस?’ असा त्याला जाब विचारला!’या गुन्ह्याबद्दल तुला मनुष्यजन्म घ्यावा लागेल’ अशी शिक्षाही फर्मावली! यमधर्माचा मनुष्यावतार म्हणजे पांडु-धृतराष्ट्रांचा भाऊ विदुर होय. &lt;br /&gt;या कथेमध्ये मांडव्यांनी इतक्या पुरातन काळात मांडलेला, &lt;em&gt;&lt;strong&gt;गुन्हा व शिक्षा यांमध्ये प्रमाण हवे&lt;/strong&gt;&lt;/em&gt; हा विचार व &lt;em&gt;&lt;strong&gt;१४ वर्षांपर्यंत अजाण मानून गुन्ह्याला शिक्षा नसावी &lt;/strong&gt;&lt;/em&gt;हाही विचार आजच्या काळातहि सर्व पुढारलेल्या मानवसमाजांमध्ये न्यायाचे तत्त्व मान्यता पावलेला आहे हें विषेश!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-6336370205957112822?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/6336370205957112822/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=6336370205957112822' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6336370205957112822'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/6336370205957112822'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2009/02/blog-post_07.html' title='स्फुट प्रकरणे भाग ४'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-2382924798281155616</id><published>2009-02-03T19:10:00.000+05:30</published><updated>2009-02-03T19:12:49.687+05:30</updated><title type='text'>स्फुट प्रकरणे - भाग ३</title><content type='html'>&lt;strong&gt;शिष्यांची परीक्षा.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;आदिपर्वामध्ये धौम्य ऋषि व त्यांचे तीन शिष्य यांची एक छोटीशी कथा आहे. विद्या देण्यापूर्वी धॊम्यांनी आपल्या आरुणी, उपमन्यु व वेद या तीन शिष्यांची कठोर परीक्षा घेतली. शेतात शिरणारे पाणी अडवण्यासाठी बांध घालण्याचे काम आरुणीला सांगितले. त्याला ते जमेना तेव्हा बांधातील भगदाड अडवून तो स्वत:च झोपून राहिला. (आपल्या शरीराचाच बांध केला.) तो बराच वेळ दिसेना तेव्हा त्याला शोधत गुरु स्वत: शेतात आले व त्यानी आरुणीला जोरात हांक मारली तेव्हा तो बांधातून उठून आला.त्याने धोका पत्करून केलेलें आज्ञापालन पाहून गुरु प्रसन्न झाले व मग त्याला विद्या दिली. &lt;br /&gt;दुसरा शिष्य उपमन्यु. त्याला गुरे राखायला पाठवीत पण काही खावयास मिळत नसे. तो गायींचे दूध प्यायचा. वासरांच्या वाटचे दूध तूं पिऊं नको असे त्याला गुरु म्हणाले. मग तो फक्त फेस प्यायचा. त्यालाहि गुरूनी बंदी केली. मग उपासमार झाल्यामुळे त्याने एकदां रुईचीं पाने खाल्ली&gt; त्यामुळे तो आंधळा झाला व विहिरीत पडला. गुरूना कळल्यावर ’अश्विनीकुमारांची स्तुति कर’ असे त्याला सांगितले. त्याना प्रसन्न करून त्यांच्याही परीक्षेला उतरल्यावर त्याला पुन्हा दृष्टि मिळाली. मग प्रसन्न होऊन गुरूनेहि सर्व विद्या दिली.&lt;br /&gt;तिसरा शिष्य वेद नांवाचा होता तो बुद्धीला कमी होता. त्याला गुरुशुश्रूषेचे काम मिळाले. इतर कामाबरोबर गुरु त्याला नित्य बैलाप्रमाणे जोखडालाहि जुंफत. बराच काळ असे कष्ट केल्यावर त्याचेवरहि गुरुकृपा झाली!&lt;br /&gt;या कथेतील शेवटचा भाग लक्षणीय आहे. वेद हा शिष्य ज्ञानसंपन्न होऊन गृहस्थाश्रमी झाल्यावर त्यालही तीन शिष्य मिळाले. वेदाने मात्र त्यांना काहीहि काम सांगितले नाही! गुरुगृहीं वास म्हणजे केवढे विलक्षण कष्ट याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव होता. गुरुशिष्यपरंपरेने विद्या मिळवण्यासाठी गुरुगृहीं राहताना आजच्या युगात भीमसेन जोशी यांनी काढलेल्या अपार कष्टांची आठवण अपरिहार्यपणे येते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-2382924798281155616?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/2382924798281155616/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=2382924798281155616' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2382924798281155616'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2382924798281155616'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2009/02/blog-post.html' title='स्फुट प्रकरणे - भाग ३'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-2134847802665426713</id><published>2009-01-22T20:40:00.000+05:30</published><updated>2009-01-22T20:42:36.165+05:30</updated><title type='text'>स्फुट प्रकरणे - भाग २</title><content type='html'>उपरिचर वसूची कथा :&lt;br /&gt;उपरिचर नावाचा एक धर्मशील राजा होऊन गेला. आपल्या उग्र तपश्चर्येने हा एक दिवस इंद्रपदाला योग्य होईल या भीतीने देवांनी त्याला तपश्चर्येपासून परावृत्त केले. इंद्राने त्याला, &lt;strong&gt;’तूं पृथ्वीवर नित्य तत्पर राहून धर्मपालन व धर्माचा प्रतिपाळ कर, चेदि देश जिंकून तूं त्याचा राजा हो’&lt;/strong&gt; असे सांगितले. आपलें स्फटिकाचे गगनविहारी विमान त्याला दिले व वैजयंती माळ दिली. आपली नित्य आठवण रहावी म्हणून सज्जनाम्चा प्रतिपाळ करणारी एक कळकाची काठी त्याला दिली. इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवली व तिची पूजा केली. दुसरे दिवशी या काठीवर शेल्यासारखे एक वस्त्र बांधीत व तिची पूजा करीत. ही काठीची पूजा म्हणजे इंद्राचीच पूजा होय. &lt;br /&gt;या कथेतील रूपके मला उलगडली नाहीत पण यांत गुढीपाडव्याच्या प्रथेचे मूळ स्पष्ट दिसते. मात्र आजकाल गुढीपाडव्याच्या प्रथेच्या या मूळ कथेचे स्मरण फारसे कोणाला नाही! गुढीला आपण शालिवाहनाच्या विजयाचे प्रतीक मानतो. इंद्रपूजा मानत नाही. &lt;br /&gt;व्यासांची माता सत्यवती ही या उपरिचर वसूची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होय. महाभारतात सत्यवती ही धीवरांना मत्स्यीच्या पोटांत मिळाली व त्यांनी तिला राजा उपरिचराकडे नेऊन दिले असे म्हटले आहे. मत्स्यीच्या पोटात एक बालकही मिळाला होता. मात्र राजाने मुलाला ठेवून घेतले व कन्येला धीवरालाच देऊन &lt;strong&gt;’तूंच हिचा सांभाळ कर’ &lt;/strong&gt;असे सांगितले! पुत्र पुढे मत्स्य देशाचा राजा झाला. ती मत्स्यी एक शापित अप्सरा होती असे महाभारत म्हणते व ती उपरिचराच्या वीर्यापासून गर्भवती झाली असेंहि म्हणतें! याचा सरळ अर्थ धीवर स्त्रीला राजापासून हीं दोन अपत्ये झाली असाच घेतला पाहिजे. राजाने कन्येला कां स्वीकारले नाही याबद्दल महाभारत गप्प आहे. राजा जनकाने व द्रुपदाने शेतात व यज्ञात मिळालेल्या (कोणापासून झालेल्या?) कन्या सीता व द्रौपदी यांचा स्वीकार केला व त्याना राजकन्या म्हणूनच वाढवले हे विषेश! ते भाग्य सत्यवतीला मिळाले नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-2134847802665426713?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/2134847802665426713/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=2134847802665426713' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2134847802665426713'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2134847802665426713'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2009/01/blog-post_22.html' title='स्फुट प्रकरणे - भाग २'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-260377828834465720</id><published>2009-01-15T20:24:00.000+05:30</published><updated>2009-01-15T21:04:49.989+05:30</updated><title type='text'>महाभारतातील स्फुट प्रकरणे - भाग १</title><content type='html'>या लेखात आता काही स्फुट प्रकरणांचा परामर्ष घ्यावयाचा आहे. यांत काही नवीन वा आजच्या काळाला सुसंगत अशा गोष्टी नजरेला आल्या त्याबद्दल लिहावयाचे आहे.&lt;br /&gt;अक्षौहिणी :&lt;br /&gt;भारतीय युद्धात अठरा अक्षौहिणी सैन्य दोन्ही पक्ष मिळून लढले. बहुतेक सर्व राजांनी एकेक अक्षौहिणी सैन्य आणले होते. कृष्णाने आपले तीन कोटि गोपालांचे सैन्य दुर्योधनाला दिले होते. मात्र कौरवांच्या अकरा अक्षोहिणी सैन्याच्या मोजदादीत हे कृष्णाचे सैन्य अजिबात मोजलेले दिसत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक अक्षौहिणी म्हणजे काय याचा पूर्ण खुलासा दिलेला आहे. १ रथ, १ हत्ती, ३ घोडे व ५ पायदळ सैनिक मिळून १ पत्ति होते. ३ पत्ति म्हणजे एक सेनामुख व त्यानंतर ३-३ च्या पटीत गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू, अनीकिनि व अक्षौहिणि असे कोष्टक दिलेले आहे. एकूण एका अक्षौहिणीत २१८७० रथ, तितकेच हत्ती, ६५६१० घोडे व १,०९,३५० पायदळ समाविष्ट होत. नवल म्हणजे, आजहि ३ सैनिक म्हणजे एक ग्रूप, ३/४ ग्रूपचा एक सेक्शन, मग त्याच पटीत प्लॅटून, कंपनी, बटालियन, ब्रिगेड, डिविजन, कोअर अशीच व्यवस्था असते! मधल्या काळात, युरोपियन, मुघल, मराठे वा इतरांच्या सैन्याचीहि अशीच व्यवस्था असे काय? &lt;br /&gt;अक्षौहिणीतील रथ व हत्ती यांची तुलना टॅंक, आर्टिलरी (तोफखाना) यांच्याशी होईल. घोडदळाची जागा आता चिलखती वाहनानी घेतली आहे. काही पायदळाच्या डिव्हिजन्स, आर्टिलरी डिविजन्स, आर्मर्ड डिव्हिजन्स एकत्र करून बनणार्‍या आर्मीची अक्षौहिणीशी तुलना करता येईल. अशा कित्येक आर्मी ग्रूप दुसर्‍या महायुद्धात दोन्ही पक्षांतर्फे लढले. एकेका राजाचे एक अक्षौहिणी सैन्य चतुरंग व स्वयंपूर्ण होते. &lt;br /&gt;अठरा अक्षौहिणी सैन्य म्हणजे एकूण २५ लाख माणसे एवढ्याशा कुरुक्षेत्रावर कशीं लढलीं असतील? दुसर्‍या महायुद्धात काही शहरांसाठी झालेल्या युद्धात, उदाहरणार्थ स्टालिनग्राड, मॉस्को वगैरे, दोन्ही पक्षांकडून सात आठ लाख सैन्य लढले पण तीं युद्धक्षेत्रे खूप विस्तृत होतीं. भारतीय इतिहासातील मोठ्या लढायांत, उदा. तालिकोट, पानिपत वगैरेत ४-५ लाखांवर मजल गेली नव्हती. तेव्हां महाभारतांतील आकडेवारी खूप अतिशयोक्त म्हटली पाहिजे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-260377828834465720?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/260377828834465720/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=260377828834465720' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/260377828834465720'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/260377828834465720'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2009/01/blog-post_15.html' title='महाभारतातील स्फुट प्रकरणे - भाग १'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-789128563109651941</id><published>2009-01-03T19:52:00.001+05:30</published><updated>2009-01-03T20:01:49.777+05:30</updated><title type='text'>विराम</title><content type='html'>प्रिय वाचक,&lt;br /&gt;या ब्लॉगवर महाभारतातील काही विषयांवर मी लेखन केले ते आपणास साधारणपणे पसंत पडले असे दिसले. माझ्या मनात असलेले सर्व विषय पुरे झालेले असल्यामुळे या ब्लॉगवरील लेखन मी (सध्यातरी) थांबवत आहे. पुढे कधी काही नवीन सुचले तर पुन्हा लिहीन. आपल्या प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.&lt;br /&gt;अशाच प्रकारचे काही लेखन रामायणावर करण्याचा विचार आहे व त्यासाठी नवीन ब्लॉग लवकरच सुरू करणार आहे. आपण वाचाल अशी आशा आहे. ब्लॉग सुरू झाला की ’मराठी ब्लॉग विश्व’ वर दिसेलच&lt;br /&gt;प्र. के. फडणीस.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-789128563109651941?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/789128563109651941/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=789128563109651941' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/789128563109651941'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/789128563109651941'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2009/01/blog-post.html' title='विराम'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-3359162093777950477</id><published>2008-11-20T20:24:00.000+05:30</published><updated>2008-11-20T20:27:10.513+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग १३</title><content type='html'>कर्णाबद्दलचे हे लेखन फार विस्तारले. या लेखनात कर्ण व अर्जुन यांची तुलना वेळोवेळी करणे आवश्यकच होते. अर्जुन हा महाभारताचा एक नायक तर कर्ण हा प्रतिनायक, भीम नायक तर दुर्योधन प्रतिनायक असे म्हणता येईल. मी खलनायक असा शब्दप्रयोग मुद्दामच केलेला नाही. कर्ण व दुर्योधन या दोघांमध्येहि अनेक उत्तम गुणहि महाभारतकारांनी मुक्तपणे वर्णिले आहेत. कर्णाचे शौर्य व दातृत्वगुण निर्विवाद आहेत. दुर्योधनाबद्दलहि तसेच म्हणावे लागते. मात्र अखेर, महाभारतकारांना कर्ण हे गुणांपेक्षां दोष जास्त असलेले व्यक्तिमत्त्व रंगवावयाचे आहे याबद्दल शंका नाहीं. कर्णातील उणेपणा हा त्याच्या (माझ्या तर्काप्रमाणे ) सूताचा पुत्र म्हणून झालेल्या जन्मामुळे वा सूतपुत्र म्हणून आयुष्य व्यतीत करावे लागल्यामुळे आला असें खरे तर म्हणतां येणार नाहीं. सूत सर्व प्रकारच्या मानसन्मानापासून वंचित होते असे दिसत नाही. सूतांचे स्वत:चे स्वतंत्र राज्य होते. त्या राज्यात गेलेले असताना अधिरथ व राधा यांना कर्ण मिळाला असे म्हटले आहे. विराटाची पत्नी सुदेष्णा ही सूतकुळातील होती व तिचा भाऊ कीचक हा विराटाच्या राज्यात सर्वेसर्वा होता. तेव्हा सूतांचे स्थान क्षत्रियाच्या किंचित खालचे मानले जात असावे. कर्णाचे सुरवातीचे (धनुर्विद्येचे ) शिक्षण कोठे झाले याचा काही उल्लेख नाही पण परशुरामाकडे जाण्यापूर्वी बरीच प्रगति झालीच असणार. &lt;br /&gt;कर्णाला आपण कुंतीपुत्र आहोत हे कळण्याचा काही मार्ग नव्हता. (कृष्ण वा कुंती यांनी सांगेपर्यंत). त्याने कौरवदरबारात आपली धनुर्विद्या प्रगट केली तेव्हा लगेचच दुर्योधनाने त्याला आयुष्यभरासाठी जवळ केले. सर्व मानसन्मान व वैभव त्याला प्राप्त झाले होते. त्यापुढील त्याचे आयुष्य सुखाने जाण्यास काही हरकत नव्हती. पण दुर्योधनाची मैत्री त्याला तशी महागच पडली म्हणावे लागते कारण नंतर आयुष्यभर दुर्योधनाच्या सर्व कुटिल बेतांमध्ये त्याला सामील व्हावे लागले. त्याने ते स्वखुषीनेच केले असे दिसते. घमेंडखोर व उद्धट स्वभावामुळे त्याला बढाया मारण्याची खोड जडली. परशुरामाकडून मिळवलेल्या विद्येवर तो संतुष्ट राहिला. उलट अर्जुनाने द्रोणापासून मिळवलेल्या विद्येवर संतुष्ट न राहातां अधिक कौशल्य मिळवण्यासाठी धडपड केली. अखेरच्या युद्धापूर्वी तो असे साधार म्हणू शकला की &lt;strong&gt;आज माझ्याकडे जी अस्त्रे आहेत त्यांचे ज्ञान द्रोणाला वा भीष्मालाहि नाही!&lt;/strong&gt; सर्व दृष्टीने विचार करतां असे म्हणावे लागते कीं कर्णाच्या दोषांनी अखेर त्याच्यातल्या गुणांवर मात केली. हा विषय मी येथेच संपवीत आहे. या लेखनाला उदंड वाचक लाभले व प्रतिसाद मिळाला. मतभेद हे असणारच. तुमच्या सर्वांच्या मतांचा मी आदर करतो. धन्यवाद.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-3359162093777950477?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/3359162093777950477/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=3359162093777950477' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3359162093777950477'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3359162093777950477'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/11/blog-post_20.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग १३'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-8780827557030708146</id><published>2008-11-13T20:24:00.000+05:30</published><updated>2008-11-13T20:37:01.149+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग १२</title><content type='html'>जयद्रथवधाच्या दिवशी झालेल्या युद्धप्रसंगांचे खुलासेवार वर्णन माझ्या त्या विषयावरील लेखांत पूर्वीच आलेले आहे. त्या दिवशी सहा महारथींना अर्जुनाने वारंवार हरवले, प्रचंड सैन्यसंहार केला व अखेर जयद्रथालाहि मारले. याउलट, अकराव्या दिवसापासूनच्या युद्धांत कर्णाला अभिमन्यु, सात्यकी, भीम, धृष्टद्युम्न, घटोत्कच या सर्वांनी वारंवार हरवले. भीम हा महाधनुर्धर असे त्याचे वर्णन नाही. तो गदायुद्ध व शरीरबळाच्या सर्व प्रकारच्या युद्धात प्रवीण! मात्र जयद्रथवधाच्या दिवशीं रथयुद्धात त्याने सतरा वेळा कर्णाचे धनुष्य तोडून कर्णाला सळो कीं पळो करून सोडले. &lt;strong&gt;भीमाने मला फार मार दिला आहे व केवळ आज युद्धाला उभे राहिलेच पाहिजे म्हणून मी उभा आहे&lt;/strong&gt; असे त्याने स्वत:च दुर्योधनापाशी म्हटले! भीमार्जुनांनी क्वचितच जीव वांचवण्यासाठी युद्धातून पळ काढला असेल. कर्णाने तसे वारंवार केले. अनावर झालेल्या घटोत्कचाला मारण्यासाठी कर्णाला अखेर अर्जुनावर वापरण्यासाठी खास राखून ठेवलेली शक्ति वापरावी लागली. इतर बळाने वा अस्त्रविद्येने भागले नाही. द्रोणाला धृष्टद्युम्नापासून कर्ण वांचवूं शकला नाही. दुर्योधनाचे भाऊ रोज भीमाकडून मारले जात होते. कर्ण त्यांना, दु:शासनालाहि, वांचवू शकला नाही.&lt;br /&gt; कर्ण सेनापति होईपर्यंत खरे तर युद्ध दुर्योधनाच्या हाताबाहेर गेलेले होते. दोन दिवसपर्यंत कर्णाने कडवा प्रतिकार केला. अर्जुनाचे व त्याचे अनेक वेळा संग्राम झाले. अर्जुनासमोर हे मोठे आव्हान होते. पण तो त्या कसोटीला पुरेपूर उतरला. अर्जुन उपस्थित नसताना झालेल्या अभिमन्युवधामध्ये कर्णाचा सहभाग होता म्हणून अर्जुनाने चिडून कर्णाला आव्हान दिले होते कीं &lt;strong&gt;अभिमन्यूला वांचवायला मी नव्हतो. पण तुझ्या पुत्राला मी तुझ्यासमक्षच मारीन.&lt;/strong&gt; कर्णपुत्र वृषसेन हाही अभिमन्यूप्रमाणेच महारथी होता. कर्णाला डांबून ठेवून, तो हजर असतानाच, अर्जुनाने वृषसेनाचा वध केला व आपला शब्द खरा केला. कर्ण आपल्या पुत्रालाहि वांचवूं शकला नाही. सतरा दिवसांच्या अखंड परिश्रमांनंतर कर्णाचे रथचक्र रुतून बसले असताना, त्याला पुन्हापुन्हा निसटून जाण्याची संधि न देतां, अर्जुनाने अखेर कर्णाचा वध केला व वैराची अखेर केली. यांत अर्जुनाच्या पराक्रमाला कोठेतरी उणेपणा आला असे काहीना निव्वळ कर्णप्रेमामुळे वाटते पण माझ्या मते त्यांत काडीचाहि अर्थ नाही. युद्धामध्ये आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही तर संधि पुन्हापुन्हा येत नाही. या दोन दिवसांत कर्णालाहि अर्जुनवधाची संधि आली होती पण ती त्याला साधतां आली नाही. शल्याने त्याचे सारथ्य कौशल्याने केले पण युद्धाला उभे राहाण्यापूर्वी बढाईखोर व उद्धट स्वभावाच्या कर्णाने त्याचेबरोबर वितंडवाद घालून त्याचे संपूर्ण सहकार्य मिळण्याची संधि घालवली. शल्याने &lt;strong&gt;रुतलेले चाक काढण्याचे माझे काम नाही &lt;/strong&gt;असे म्हणून सहकार्य नाकारले पण त्याला प्रसंग न ओळखणारा कर्णच स्वत: जबाबदार नाही काय? कर्णाने पराक्रमाची शर्थ करूनहि अखेर तो उणाच पडला व अपयशी झाला. &lt;br /&gt;अद्यापपर्यंतचे १२ भागांमध्ये मी केलेले सर्व कर्णचित्रण महाभारतावरच आधारित आहे. कर्णाचा जन्म सूर्यापासून नव्हे तर मग कोणापासून याबद्दलचा माझा सप्रमाण तर्क मी वाचकांसमोर ठेवला आहे. सर्व चित्रणाचे समालोचन अखेरच्या भागात वाचा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-8780827557030708146?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/8780827557030708146/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=8780827557030708146' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8780827557030708146'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8780827557030708146'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/11/blog-post_13.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग १२'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-1175260748789218543</id><published>2008-11-08T20:44:00.000+05:30</published><updated>2008-11-08T20:50:15.441+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग ११</title><content type='html'>भारतीय युद्ध अठरा दिवस चालले. युद्धाचे अतिशय विस्तृत व खुलासेवार वर्णन महाभारतात आहे. युद्धाचे पहिले दहा दिवस कर्ण युद्धाबाहेरच होता. भीष्म सेनापति असेपर्यंत त्याच्या आधिपत्याखाली त्याला लढावयाचे नव्हते. आपल्या पराक्रमाचे श्रेय भीष्माला मिळेल असे क्षुद्रपणाचे कारण त्याने दिले होते. वास्तविक, हा दुर्योधनाच्या जीवन-मरणाचा लढा होता, त्यापासून कोणत्याही कारणामुळे वा निमित्तामुळे कर्णाने दूर रहाणे हे उचित म्हणतां येत नाही. त्यापेक्षा स्वाभिमानाला थोडी मुरड घालणे जास्त उचित झाले असते! भीष्माने युद्धापूर्वी दोन्ही पक्षांतील प्रमुख वीरांचे मूल्यमापन दुर्योधनाच्या विचारण्यावरून केले त्यावेळी त्याने कर्णाला अर्धरथी ठरवले याचा कर्णाला राग आला होता. भीष्माने कर्णाच्या मूल्यमापनांत एका गोष्टीवर अचूक बोट ठेवले होते. त्याने &lt;strong&gt;’कर्ण हा युद्धात बेसावध रहाणारा आहे’&lt;/strong&gt; अशी टीका केली होती. तसेच गुरूला फसवून मिळवलेली विद्या त्याच्या कामी येणार नाही असे म्हटले होते. कर्णाच्या अनेकांकडून झालेल्या पराभवांचे हेच कारण असावे. मात्र तो सामान्य योद्धा खासच नव्हता. कर्ण युद्धापासून अलिप्त राहिला यात भीष्माचाच हेतु साध्य झाला. आत्मसन्मान राखण्यापुरते थोडेसे युद्ध होऊन दोन्ही पक्षांमध्ये सन्माननीय तडजोड होऊ शकली तर बहुधा ती भीष्माला हवी होती. आततायी स्वभावाचा व दीर्घद्वेषी कर्ण बाजूला राहिला तरच कदाचित हे शक्य झाले असते. यासाठीच युद्धाची सूत्रे भीष्माने स्वत:च्या हातात ठेवली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे कर्ण वागला!&lt;br /&gt;भीष्मपतनानंतर पांच दिवस द्रोण सेनापति असताना व पुढील दोन दिवस स्वत: सेनापति होऊन कर्ण युद्धात सहभागी झाला. या सात दिवसांच्या युद्धवर्णनात कर्णाचा सहभाग असलेले अनेकानेक युद्धप्रसंग आहेत. अनेकांवर त्याने विजय मिळवला पण अनेकांनी त्याला हरवले व पळवून लाविले असेहि प्रसंग आहेत. अर्जुन व कर्णाची तुलना अटळ आहे. अर्जुन सर्व अठरा दिवस लढला व युद्धाचा प्रमुख भार भीमाच्या बरोबरीने, वा जास्तच,  त्याने वाहिला. कर्णाची परिस्थिति तशी नव्हती. अर्जुनाचा, भीष्म सोडला तर इतर कोणीहि, द्रोणानेहि निर्णायक पराभव केला नाही. भीष्म व द्रोण या दोघांशीहि तो केवळ नाइलाजाने युद्धाला तयार झाला होता. अखेर भीष्म व द्रोण दोघांशीहि त्याची सरशी झालीच. त्रिगर्तांचा त्याने दररोज पराभव केला व सर्वांना मारले. पुढील भागात ही तुलना पुढे चालू ठेवू.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-1175260748789218543?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/1175260748789218543/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=1175260748789218543' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1175260748789218543'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1175260748789218543'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/11/blog-post_08.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग ११'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-5896199920504146871</id><published>2008-11-02T22:37:00.000+05:30</published><updated>2008-11-02T22:43:54.943+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग १०</title><content type='html'>अज्ञातवास संपून पांडवांनी राज्याची मागणी केली. दुर्योधनाने ती नाकारली. अनेक वाटाघाटींनंतर अखेर कृष्णशिष्टाई झाली. भीष्म, द्रोण, विदुर, कृप व इतर अनेकांनी धृतराष्ट्र व दुर्योधन याना अनेकवार समजावले. त्या प्रत्येक प्रसंगी कर्णाने त्यांची कुचेष्टा केली व दुर्योधनाला युद्धाच्या भरीस घातले. त्यानेहि आधींच्या प्रसंगांवरून धडा न घेतां, &lt;strong&gt;माझा भरवसा मी स्वत:, दु:शासन व कर्ण यांच्यावरच आहे&lt;/strong&gt; असे म्हटले. कृष्णशिष्टाईच्या वेळी कर्ण दरबारात उपस्थित होता पण चर्चेत त्याने भाग घेतलेला नाही. दुर्योधनाने कृष्णाचे बोलणे धुडकावून लावले व खुद्द कृष्णालाच पकडण्याचा विचार केला. या बेतांत दु:शासन, शकुनि व कर्ण सामील होते. कृष्ण पूर्ण तयारीने आला असल्यामुळे तो बेत सोडून द्यावा लागला. प्रयत्न झाला असता तर कर्ण तोकडाच पडला असता. शिष्टाई असफल झाली. कृष्णाने कुंतीची भेट घेतली व परतण्यापूर्वी तो कर्णाला एकांतात भेटला. कृष्णाने कर्णाला सांगितले कीं &lt;strong&gt;तूं कुंतीपुत्र आहेस व पांडवांचा मोठा भाऊ आहेस तेव्हा तूं पांडवांचा पक्ष घे. त्यापासून तूं, पांडव, यादव या सर्वांचाच फायदा होईल. तूं पांडवांचा राजा होशील, युधिष्ठिर युवराज होईल, इतर पांडव व यादवही तुझे अनुचर होतील, सर्व पांडवांची पत्नी या नात्याने द्रौपदी तुझीहि पत्नी होईल&lt;/strong&gt; वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. कर्ण हा कुंतीपुत्र आहे हें कृष्णाला कसें माहीत? कुंतीनेच आदल्या दिवशी हे गुपित सांगून, आवश्यक तर ते कर्णालाहि सांगून त्याला वळवण्याचा प्रयत्न कर असे कृष्णाला विनवले असावे. महाभारत अर्थातच तसे स्पष्टपणे म्हणत नाही. पण शक्यता तीच आहे. कुंतीच्या संमतीशिवाय, कृष्णाने स्वत;हून कर्णाला तूं कुंतीपुत्र आहेस असे सांगणे अनुचितच व म्हणून असंभव वाटते. मात्र कर्ण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडला नाही. सर्व आयुष्य सूत म्हणून वावरून व दुर्योधनाचा मित्र म्हणून त्याच्या आश्रयाने राहून सर्व मानसन्मान मिळवून अखेर त्याचा त्याग करण्याचे त्याने स्पष्टपणे नाकारले. कुंतीला अर्थातच त्याने दोष दिला. कर्ण वळत नाही असे पाहून मग कृष्णाने &lt;strong&gt;तुला हवा तसा मृत्यु तुला लवकरच रणांत मिळेल&lt;/strong&gt; असे म्हणून, सात दिवसानी कार्तिक अमावास्येला युद्ध सुरू करूं असा त्याचेबरोबर दुर्योधनाला निरोप दिला व पांडवांकडे कृष्ण परत गेला.&lt;br /&gt; युद्ध अटळ आहे हे कळल्यावर विदुर कुंतीला भेटला. कुंतीने त्यानंतर स्वत:च कर्णाची भेट घेऊन त्याचे मन वळवण्याचा अखेरचा प्रयत्न केला. हें तिला विदुराने सुचवले असावे असा माझा तर्क आहे. कारण कुंतीचे गुपित विदुराला माहीत होते! कुंतीचीहि विनवणी कर्णाने मानली नाही. &lt;strong&gt;सर्व जन्म राधेय म्हणून घालवल्यानंतर व अर्जुनाशी उभा दावा केल्यावर दुर्योधनाचा विश्वासघात करून अखेर मी पांडवांकडे गेलो तर अर्जुनाला मी घाबरलो असेच जग म्हणेल. मी तसे करणे धर्माला धरूनहि नाही &lt;/strong&gt;असे त्याने कुंतीला समजावले. एकच गोष्ट कबूल केली कीं &lt;strong&gt;अर्जुनाकेरीज इतर पांडवांना मी मारणार नाही. मी किंवा अर्जुन कोणीहि मेला तरी तुझे पांच पुत्र जिवंत राहतील.&lt;/strong&gt; कुंतीला एवढ्यावरच समाधान मानावे लागले. &lt;br /&gt;कृष्ण किंवा कुंती यांनी यावेळीहि कर्णाचा खरा पिता कोण हे सांगितले नाहीच. सूर्यापासून जन्म हीच कथा चालू ठेवली! आपला पिता ब्राह्मण वा क्षत्रिय नाही हेंच कर्ण यावरून समजून चुकला असणार. &lt;strong&gt;युधिष्ठिर व इतर पांडव यांनी आपला वडील भाऊ म्हणून स्वीकार केला तरी वर्षानुवर्षे मनात बाळगलेली शल्ये कोणाच्याच मनातून जाणार नाहीत. जग मात्र आपल्याला स्वार्थी, भेकड व विश्वासघातकी म्हणेल व तरीहि क्षत्रिय म्हणणार नाहीच,&lt;/strong&gt; हे जाणूनच त्याने कृष्ण व कुंतीच्या विनंतीचा अव्हेर केला. &lt;br /&gt; या दोन्ही प्रसंगी कर्णाचे वर्तन धीरोदात्त झाले हे निश्चित. त्याच्या आयुष्यातील हे दोन्ही कसोटीचे क्षण होते व त्यातून तो तावून-सुलाखून उजळून निघाला हे नि:संकोचपणे मान्य केले पाहिजे. &lt;br /&gt; यानंतर भारतीय युद्धातील कर्णाच्या कामगिरीचे निरीक्षण पुढील भागात करूं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-5896199920504146871?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/5896199920504146871/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=5896199920504146871' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5896199920504146871'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5896199920504146871'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/11/blog-post.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग १०'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-1557895432604945050</id><published>2008-10-24T20:25:00.000+05:30</published><updated>2008-10-24T20:31:52.455+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग ९</title><content type='html'>यानंतर यथावकाश पांडव अज्ञातवासात गेले. त्यांच्या कथेत यानंतर कर्णाचा उल्लेख कौरवांनी विराटाच्या गायी हरण करण्याच्या प्रसंगात येतो. पांडवांच्या शोधार्थ पाठवलेले सेवक हात हलवीत दरबारात परत आले. तेव्हा कर्णाने पुन्हा जास्त हुशार माणसे शोधार्थ पाठवण्याचा सल्ला दिला. पांडव हुडकले गेले नाहीत तर लवकरच त्यांच्याशी युद्धप्रसंग उद्भवेल तेव्हा सैन्य, संपत्ति या साधनांचा विचार कर असा दुर्योधनाला कृपाने सल्ला दिला. पण तो सर्व विषय बाजूलाच राहून, त्रिगर्त राजा सुशर्मा याने सुचवले कीं कीचक मेल्यामुळे विराट आता दुबळा झाला आहे तेव्हां त्याचे गोधन लुटावे. कर्णाने मत दिले कीं पांडव आता दुबळे झाले आहेत तेव्हा त्यांची काळजी करण्याची जरुरी नाही, म्हणून त्रिगर्ताची सूचना मान्य करावी. त्रिगर्त व कौरव यांनी दोन्हीकडून विराटावर हल्ला केला. दक्षिणेकडून त्रिगर्ताने केलेल्या हल्ल्याचा विराटाने चार पांडवांच्या सहाय्याने यशस्वी प्रतिकार केला. मात्र रात्रीपर्यंत युद्ध चालल्यामुळे राजधानीला परत येतां आले नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी उत्तरेकडून कौरवांनी केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याची पाळी विराटपुत्र उत्तरावर आली. बृहन्नला वेषांतील अर्जुनाने सारथ्य केले. प्रत्यक्ष युद्धक्षेत्रावर उत्तराचा निभाव लागणे शक्यच नसल्यामुळे त्याला सारथी बनवून, शमीवरील शस्त्रे घेऊन अर्जुन स्वत:च युद्धाला सज्ज झाला. हा अर्जुनच हे पाहून द्रोणाने त्याची स्तुति आरंभली. कर्णाने नेहेमीप्रमाणेच, अर्जुनाला आपली वा दुर्योधनाची सर येणार नाही अशी बढाई मारली! हा अर्जुन उघडकीस आला आहे तेव्हा माझे कामच झाले कारण तेरा वर्षे पुरी झालेली नाहीत असे दुर्योधनाने म्हटले. अर्जुन प्रगट झाल्यामुळे भीष्म, द्रोण विचारांत पडले. कर्णाने ’मी एकटाच अर्जुनाचा सामना करतों’ अशी फुशारकी मारली. कृप व अश्वत्थामा यांनी त्याला बजावले कीं &lt;strong&gt;’तूं अर्जुनाप्रमाणे एकट्याने कधीहि पराक्रम गाजवलेला नाहीस. सर्वांनी मिळून एकजुटीने अर्जुनाशीं सामना केला नाही तर निभाव लागणार नाही.’&lt;/strong&gt; कर्णाला क्षमा करा असें त्यांना भीष्माने म्हटले. भीष्माने सौरमानाचे गणित मांडून आज सकाळीच अज्ञातवास पुरा झाला आहे असे म्हटले ते सपशेल नाकारून दुर्योधनाने युद्धाची तयारी केली. दुर्योधन एकटाच गोधन घेऊन ह्स्तिनापुराकडे वळला व सर्व कौरववीर अर्जुनाला अडवून युद्धाला उभे राहिले. अर्जुनाने प्रसंग ओळखून, प्रथम दुर्योधनावरच हल्ला करून व त्याला हरवून गोधन मुक्त केले. नंतर सर्व कौरववीरांशी धैर्याने व कौशल्याने युद्ध करून सर्वांस पराभूत केले. अर्जुनाने कर्णबंधु संग्रामजित याला कर्णाच्या उपस्थितीतच मारल्यावर कर्ण व अर्जुन यांचा सामना झाला. &lt;strong&gt;अत्यंत त्रस्त व भयभीत होऊन कर्णाने पळ काढला.&lt;/strong&gt; सर्वांचा अर्जुनाने पुन्हापुन्हा पराभव केल्यावर, भीष्माने, ’गोधन तर गेलेच आहे, आतां आपण सर्वांनी जीव वांचवून परत फिरावे’ असा सल्ला दिला. कौरव परत जात आहेत हे पाहून अर्जुनानेहि युद्ध आवरते घेतले. या एकूण युद्धप्रसंगांत अर्जुनाच्या अस्त्रबळापुढे कोणाचेहि चालले नाही व कर्णाचा पूर्न तेजोभंग झाला. या प्रसंगानंतर कर्णाने कधीहि बढाया मारल्या कीं अश्वत्थामा, कृप व द्रोण त्याला या प्रसंगाची आठवण देत! कर्णाच्या बळाच्या मर्यादा याही प्रसंगी दुर्योधनाला स्पष्ट दिसून आल्या तरी त्याचा कर्णावर भरवसा कायम राहिला हे नवलच! &lt;br /&gt;यापुढील कर्णचित्रण पुढील भागांत वाचा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-1557895432604945050?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/1557895432604945050/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=1557895432604945050' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1557895432604945050'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1557895432604945050'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/10/blog-post_24.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग ९'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-3540700659269719017</id><published>2008-10-13T19:42:00.000+05:30</published><updated>2008-10-13T19:48:01.820+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग ८</title><content type='html'>पांडव बारा वर्षांच्या वनवासासाठी गेले. या काळात कर्णाची कसोटी लागण्याचा प्रसंग उद्भवला. मात्र कसोटीच्या वेळी तो पूर्णपणे उणाच ठरला. वनात गोधनाच्या पाहणीच्या निमित्ताने जावयाचे व आपले वैभव दाखवून पांडवाना खिजवायचे हा बेत दुर्योधनाला शकुनि व कर्ण यानीच सुचवला. दुर्दैवाने द्वैतवनात दुर्योधनाची गाठ चित्रसेन गंधर्वाशी पडली व युद्धप्रसंग उभा राहिला. कर्णाच्या नेतृत्वाखाली कौरवांनी गंधर्वाचा सामना केला. मात्र गंधर्वांपुढे मात्रा न चालून, कर्णाला जीव वांचवण्यासाठी विकर्णाच्या रथावर बसून पळून जावे लागले. गंधर्वांनी दुर्योधनावर मात करून त्याला बंदी बनवले. सैनिकांनी पळून जाऊन पांडवांना हकीगत कळवली तेव्हां कुरुकुळाचा अभिमान धरून, वयं पंचाधिकं शतं असे भीमार्जुनाना समजावून त्याना गंधर्वांशी सामना करावयास पाठवले. त्यांनी दारुण युद्ध करून गंधर्वांचा पराभव करून दुर्योधनाला सोडवले. युधिष्ठिराने दुर्योधनाची समजून घालून, ’पुन्हा असे साहस करू नको’ असे सांगून हस्तिनापुरास परत जाण्यास सांगितले. अपमानाने व अपरिमित लाजेने दुर्योधन विमनस्क होऊन, परतीच्या वाटेवर बसूनच राहिला. पराजित होऊन पळून गेलेला कर्ण खूप दूर गेलेला असावा. कारण येवढा वेळ गेल्यावर मग सावकाश तो दुर्योधनापाशी परत आला व त्याला बांधवांसह सुखरूप पाहून, दुर्योधनानेच गंधर्वांवर विजय मिळवला असे वाटून, त्याने दुर्योधनाचे अभिनंदन केले! दुर्योधनाने कर्णावर राग न धरता, त्याला सत्य परिस्थिति सांगितली. कर्ण हतबुद्धच झाला! दुर्योधनाने हाय खाऊन ’आपण हे अपेशी मुख घेऊन हस्तिनापुराला येणार नाही व भीष्मद्रोणविदुरांना भेटू शकत नाही’ असे म्हणून बैठक मारली. दु:शासन शोकाकुल झाला. कर्णाने व शकुनीने कशीबशी दुर्योधनाची समजूत घातली. पांडवांच्या पराक्रमाची, &lt;strong&gt;’ते कुरुराज्याचे नागरिक, तेव्हा तुझे रक्षण करणे त्यांचे कर्तव्यच होते, ते त्यानी केले, त्याचे काय येवढे मोठेसे?’&lt;/strong&gt; अशी वासलात लावली! त्यानंतर नेहेमीप्रमाणेच कर्णाने ’तेरा वर्षांनंतर युद्धात मी अर्जुनाला मारीन’ अशी प्रतिज्ञा केली. कर्णावरच्या दुर्योधनाच्या भरंवशाला अजूनहि तडा गेला नव्हता हे नवलच! सर्वजण तोंडे लपवीत हस्तिनापुराला परत गेले. सर्व हकिगत कळल्यावर भीष्माने, ’धनुर्वेद, शौर्य व धर्माचरण यांत कर्ण हा पांडवांच्या चतुर्थांशहि योग्यतेचा नाही’ असे दुर्योधनाला स्पष्ट सांगितले. या निंदेने राग येऊन कर्णाने दुर्योधनाच्या वतीने दिग्विजय केला व दुर्योधनाला एक खास यज्ञ करण्याचा अधिकार मिळवून दिला. कर्णाच्या पराक्रमाचे हे एकुलते एक उदाहरण म्हणावे लागेल. कर्णाच्या खालावलेल्या प्रतिमेला उजाळा देण्यासाठी हे प्रकरण मागाहून घुसडलेले असावे असे माझे मत आहे. अध्याय २५४ मध्ये ३१ श्लोकांमध्ये हे प्रकरण उरकले आहे! सर्व राजेलोकाना भेटून त्याना दुर्योधनाच्या पक्षाला वळवण्यासाठी या सदिच्छाभेटी असाव्या असे वाटते.&lt;br /&gt;यानंतर अज्ञातवासाच्या अखेरीला पुन्हा कर्णाची कसोटी लागली त्याबद्दल पुढील भागात वाचा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-3540700659269719017?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/3540700659269719017/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=3540700659269719017' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3540700659269719017'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3540700659269719017'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/10/blog-post_13.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग ८'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-7537303532950296770</id><published>2008-10-05T19:25:00.000+05:30</published><updated>2008-10-08T20:25:36.945+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग ७</title><content type='html'>राजसूय यज्ञ आटपल्यावर काही काळ कॊरव इंद्रप्रस्थात राहून मग हस्तिनापुराला परत आले. पांडवांचा उत्कर्ष व वैभव सहन न होऊन, त्यांचा नाश करण्यासाठी दुर्योधनाने शकुनीच्या सल्ल्याने द्यूताचा बेत ठरवला व बर्‍याच प्रयत्नांनी व युक्तिवादाने तो धृतराष्ट्राच्या गळी उतरवला. हा बेत ठरवण्यात कर्णाचा काही सहभाग नव्हता. युधिष्ठिर पांडवांसह द्यूतासाठी हस्तिनापुराला आल्यावर ज्यांना भेटला त्यांच्या नामावळीत कर्णाचे नाव येते. द्यूतसभेत अर्थातच तो उपस्थित होताच. द्यूतामध्ये युधिष्ठिर सर्वस्व हरून भावांना व नंतर स्वत:लाही पणाला लावून हरला. नंतर शकुनीच्या चिथावणीने त्याने द्रौपदीला पणाला लावली. त्यावेळी &lt;strong&gt;दु:शासनाला व कर्णाला अपार आनंद झाला &lt;/strong&gt;असा त्याचा प्रथम उल्लेख द्यूतप्रकरणात येतो. हाही पण युधिष्ठिर हरला. दुर्योधनाने प्रथम दूत प्रातिकामीला द्रौपदीला दरबारात घेऊन येण्यास पाठवले. तिने प्रश्न उभा केला कीं युधिष्ठिर प्रथम स्वत:ला पणाला लावून हरला व मग मला पणाला लावले काय? तिने प्रातिकामीला दाद दिली नाही तेव्हा दु:शासन स्वत:च गेला व त्याने तिला बळाने ओढून आणले. दरबारातहि तिने तोच प्रश्न पुन्हा विचारला. पांडव काहीच बोलूं वा करूं शकत नव्हते. दु:शासनाने तिला जोरात हिसडले व ’दासी’ असे संबोधिलें. तें ऐकून कर्ण &lt;strong&gt;आनंदाने बेहोष झाला!&lt;/strong&gt; (शब्दयोजना माझी नव्हे, महाभारताची!) त्याने दु:शासनाला शाबासकी दिली. या प्रसंगी, येथपासून, कर्णाचे सर्व वर्तन अति अनुचित व बेतालपणाचे झाले. &lt;br /&gt;द्रौपदीच्या प्रश्नावर भीष्मही काही उत्तर देऊ शकले नाहीत. ’शकुनीने आपली वंचना केली असे युधिष्ठिर म्हणत नाही’ एवढेच त्यानी दाखवून दिले. भीमाने युधिष्ठिराची कठोर निंदा केली व त्याचे हातच जाळून टाकण्याची इच्छा व्यक्त केली. अर्जुनाने त्याला आवरून धरले. द्रौपदीने पुन्हापुन्हा आपला प्रश्न विचारला. कोणीहि उत्तर देईना. अखेर विकर्णाने तिच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला, सर्व उपस्थितांची निंदा केली व युधिष्ठिर प्रथम स्वत:ला पणाला लावून हरला व नंतर शकुनीच्या चिथावणीने त्याने द्रौपदीला पणाला लावली. ती पांचांची पत्नी, तिला पणाला लावण्याचा युधिष्ठिराला काय अधिकार होता? त्यामुळे ती जिंकली गेलेली नाहीच असे स्पष्ट मत दिले. यावर इतर कोणी काही बोलण्याआधीच, कर्णाने क्रोधाने खवळून जाऊन, त्याचा प्रतिवाद केला. ’द्रौपदीने पुन्हापुन्हा डिंवचूनहि पांडव काहीच बोलत नाहीत. द्रौपदीला आम्ही धर्मानेच जिंकिले आहे. तूं लहान आहेस, तुला कळत नाही, युधिष्ठिर सर्वस्व हरला त्यात द्रौपदीचा समावेश नाही काय? द्रौपदी आम्ही जिंकली असे शकुनि ओरडून म्हणाला त्यालाहि पांडवांनी कसलाहि विरोध केला नाही मग ती जिंकली गेली नाही असे तुला कसे काय वाटते?’ अशी त्याची कर्णाने हेटाळणी केली. द्रौपदीला एकवस्त्रा असताना सभेत ओढून आणली याचेहि त्याने, निर्लज्जपणे समर्थन केले व ते करताना त्याच्या मनातील सर्व विखार बाहेर पडला. &lt;strong&gt;’द्रौपदी ही पांचाची पत्नी तेव्हां ती वेश्येसमानच आहे व आतां तिला आम्ही जिंकले आहे तेव्हां ती एकवस्त्रा असली काय वा विवस्त्रा असली काय सारखेच&lt;/strong&gt;,’ असे म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. ’हा विकर्ण पोरकट आहे, त्याच्याकडे लक्ष देऊं नको, दु:शासना, तूं खुशाल पांडवांची व द्रौपदीची वस्त्रे हिसकावून घे’ अशी त्याने दु:शासनाला चिथावणी दिली. कर्णाबद्दल प्रेम वा आदर वाटणार्‍या लेखकांनाही त्याच्या या प्रसंगीच्या सर्वस्वी असभ्य व अनुचित वर्तनाचे समर्थन करणे शक्य नाही. वास्तविक हा कुरुकुळाचा अंतर्गत प्रश्न होता व पांचालांच्या कन्येच्या प्रतिष्ठेचाहि होता. याचे परिणाम फार दूरवर पोचू शकणार होते. दुर्योधनाचा मित्र व हितकर्ता या नात्यानेहि त्याला संयम बाळगण्यास सांगणे हे कर्णाला शोभून दिसले असते. पण त्याचा तोल पूर्णपणे सुटला. द्रौपदीचा प्रश्न भीष्माने व खुद्द दुर्योधनानेहि पांडवांवरच सोपवला व पांडव म्हणतील ते मी मान्य करीन असे त्याने म्हटले. दुर्योधन थोडातरी ताळ्यावर होता! कर्णाने पुन्हा, पांडवांच्या उत्तरासाठी न थांबतां, खुद्द द्रौपदीलाच ऐकवले की ’तूं दासी झालीस, आतां दुर्योधनाच्या अंत:पुरात जा व त्याच्या परिवाराची सेवा कर!’ &lt;br /&gt;अर्जुनाने बोलावयास सुरवात केली कीं युधिष्ठिर स्वत:ला पणाला लावून हरल्यावर तो कोणाचा स्वामी उरला? &lt;br /&gt;आता द्रौपदी जिंकली गेलेली नाही असे दुर्योधनाला मान्य करावे लागणार होते. पण एव्हाना धृतराष्ट्राला बहुधा, द्रौपदीच्या झालेल्या घोर अपमानाचे दुरगामी परिणाम ’दिसू’ लागले असावे. त्याने अधिक वाट न पाहतां द्रौपदीला वर माग म्हटले, तिने फक्त, सर्व पांडवाना त्यांच्या शस्त्रास्त्रांसह मुक्त करून घेतले पण स्वत:ला मुक्त करण्याची मागणी केलीच नाही! ती दासी झाली कीं नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहिला व कर्णासकट कोणीच तो पुन्हा उपस्थित केला नाही! कर्णाने अखेर द्रौपदीची स्तुति केली कीं पांडवांना संकटसागरातून तारून नेणारी ती नौकाच ठरली! &lt;br /&gt;युधिष्ठिराने इंद्रप्रस्थाला परत जाण्याची परवानगी मागितली तेव्हा मात्र धृतराष्ट्राने द्यूताचा सर्व व्यावहारिक परिणाम पुसून टाकून त्याला सर्व वैभवासह परत जाण्यास सांगितले. पांडव व द्रौपदी निघून गेल्यावर दुर्योधन, दु:शासन व कर्ण यांचे डोळे उघडले. पांडव आपला सूड उगवतील या भीतीने त्यांची गाळण उडाली! त्यांनी पुन्हा नवीन बेत ठरवून धृतराष्ट्राच्या तो गळीं उतरवला व वाटेतूनच पांडवाना परत बोलावले व पुन्हा एकच पण लावून द्यूत खेळण्यास बसवले. &lt;br /&gt;वनवास-अद्न्यातवासाचा पण उच्चारताना आम्ही हरलो तर आम्ही वनात जाऊ असे शकुनि म्हणाला. कौरव हरते तर शकुनि व कर्ण दुर्योधनाबरोबर वनात जाणार होते काय? हरण्याची त्याना शंकाच नव्हती! जर हरले असते तर कर्ण वनात गेला असता काय याबद्दल मला मात्र शंका आहे. ’मी काही कौरव नाही, मी फक्त प्रेक्षक आहे.’ असेच तो बहुधा म्हणाला असता! &lt;br /&gt;युधिष्ठिर हरलाच, त्यामुळे प्रश्नच सरला. &lt;br /&gt;पांडव वनात जाताना त्यानी व्यक्त केलेला त्वेष, केलेल्या सूड उगवण्याच्या प्रतिद्न्या यामुळे कौरवांबरोबरच कर्णाचीहि घाबरगुंडी उडाली. कोणतेहि धैर्य वा स्वाभिमान न दाखवता वा दुर्योधनाला धीर न देता, तो, दुर्योधन व दु:शासनाबरोबर, ज्याची तो नित्य हेटाळणी वा कुचेष्टा करी, त्या द्रोणाला शरण गेला! द्रोणाने मी पूर्णत: तुमच्या पक्षाला राहीन असे आश्वासन दिले. &lt;br /&gt;या सर्व प्रसंगात कर्णाचे वर्णन महाभारतकारानी &lt;strong&gt;खलपुरुष&lt;/strong&gt; असेच केले आहे व ते नजरेआड करणे वा पुसून टाकणे वा त्याच्या वर्तनाचे समर्थन करणे अशक्य आहे. &lt;br /&gt;यापुढील कर्णकथा पुढील भागात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-7537303532950296770?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/7537303532950296770/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=7537303532950296770' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7537303532950296770'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7537303532950296770'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/10/blog-post.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग ७'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-1633908695696831894</id><published>2008-09-29T19:16:00.000+05:30</published><updated>2008-09-29T19:23:37.699+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग ६</title><content type='html'>स्वयंवर होऊन पांडवाना द्रुपदाचा पाठिंबा मिळाला आहे हे लक्षात आल्यावर आता काय करावयाचे याबद्दल दुर्योधन, धृतराष्ट्र व कर्ण यांची चर्चा झाली. दुर्योधनाने अनेक कुटिल डावपेच धृतराष्ट्राला सुचवले. कर्णाने या प्रसंगीं मात्र या सर्व डावपेचांची निंदा केली. पांडव येथे तुमच्यापाशी असताना व त्याना कोणाचे सहाय्य नसताना तुम्ही त्यांचे काही वाकडे करू शकला नाही. आता त्याना पांचालांचे सहाय्य आहे. तेव्हां पोरकट उपायांचा विचारही करूं नका. उलट, त्यांनी पक्का पाय रोवण्यापूर्वीच आपण त्यांचेवर हल्ला करून त्याना पकडून आणू असा वीरोचित सल्ला त्याने दुर्योधनाला दिला. धृतराष्ट्राने त्याची वीरवृत्तीबद्दल पाठ थोपटली पण त्याच्यावर भरवसा ठेवला नाही! भीष्म, द्रोण व विदुरा बरोबर सल्लामसलत करण्यास सांगितले! त्या तिघांनी पांडवांना त्यांचा वाटा देण्याचा सल्ला दिला. कर्णाने त्या तिघांबद्दल संपूर्ण अनादर दाखवून त्यांची कुत्सित्पणे निंदा केली. त्यांना धृतराष्ट्राचे आश्रित ठरवले. विदुर व भीष्माने पुन्हा निक्षून सागितल्यावर धृतराष्ट्राला पांडवाना राज्याचा हिस्सा देणे भाग पडले. कर्णाचा युद्धबेत कोणीच स्वीकारला नाही. या प्रसंगी कर्णाचे वर्तन व बोलणे अतिशय अनुचित व माजोरीपणाचे झाले. वास्तविक, कुरुराज्याच्या अंतर्गत वादाशी त्याचा काही संबंध नव्हता. येथून पुढे, वेळोवेळी, कर्ण स्वत:ला भीष्मद्रोणांच्या बरोबरीचा मानून नेहेमीच त्यांचा अनादर करताना दिसतो. भीष्म स्वत: परशुरामशिष्य व कर्णहि, फसवणुकीने, पण परशुरामाचाच शिष्य. इतर कोणीहि समकालीन वीर परशुरामाचा शिष्य नव्हता. कदाचित या जोरावर कर्ण स्वत:ला भीष्माच्या बरोबरीचा मानताना दिसतो. परिणामी, भीष्माने कर्णाला नेहेमीच तुच्छतेने वागवले. त्याचे कारण तो सूतपुत्र हे नाही. तो खलप्रवृत्तीचा, पांडवांचा अकारण वैरी व दुर्योधनाला खलकृत्यात नेहेमी सहाय्यक म्हणून त्याचेवर भीष्माचा राग होता. कर्णाचे गुणदोष तो उत्तमपणे जाणत होता. कर्णाचा त्याने वेळोवेळी अपमान व तेजोभंग केला. &lt;br /&gt;पांडवानी इंद्रप्रस्थ वसवले व राज्यविस्तार केला. अर्जुन राज्य सोडून, उलुपी, चित्रांगदा याचेबरोबर राहून अखेर द्वारकेहून सुभद्रेशी विवाह करून परतला. नंतर अभिमन्यु व इतर पांडवपुत्रांचा जन्म झाला, पांडवानी मयसभेची निर्मिति केली व राजसूय यज्ञ ठरवला. त्या निमित्ताने जरासंधवध झाला व मग पांडवांनी दिग्विजय केला. त्यावेळी भीमाचे व कर्णाचे युद्ध होऊन भीम जिंकला. मात्र हे युद्ध फारसे गांभीर्याने लढले गेले असे म्हणता येणार नाही. बहुतेक राजांनी नाममात्र युद्ध करून पांडवांच्या यज्ञाचे स्वागत केले तसेच कर्णानेहि केले असणार. &lt;br /&gt;राजसूय यज्ञ पार पडला. अग्रपूजेच्या वेळी शिशुपालाने बेताल वर्तन केले, कृष्णाने त्याचा वध केला. या प्रसंगात कर्णाची उपस्थिति विशेष जाणवत नाही. मात्र, उपस्थित राजांच्या नामावळीत त्याचे नाव आहे. शिशुपालाने कृष्णाच्या अग्रपूजेला विरोध करताना अनेकांबरोबर कृष्णाची तुलना करून त्याला अग्रपूजेला अपात्र ठरवले. त्यात कर्णाबरोबरहि त्याची तुलना केलेली होती व कर्णाला वरचढ ठरवले होते.  मात्र, यांत शिशुपालाचा कॄष्णद्वेषच दिसून येतो. खुद्द कर्णानेहि कधी आपण कृष्णापेक्षा वरचढ असल्याचा दावा केलेला नाही. शिशुपालाच्या कृष्णाने केलेया अचानक वधाने अनेक राजे चवताळले व युद्धाचा बेत करू लागले. यात कर्णाचे वा दुर्योधनाचे नाव नाही. भीष्माचा शिशुपालाने फार अपमान केल्यावर मग त्याचा वध झाला त्यामुळे दुर्योधनाला गप्प बसणे भागच होते. परिणामी कर्णहि स्वस्थ बसला!&lt;br /&gt;यापुढील द्यूतप्रसंगातील कर्णाचा सहभाग पुढील भागात पाहूया.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-1633908695696831894?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/1633908695696831894/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=1633908695696831894' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1633908695696831894'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/1633908695696831894'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/09/blog-post_29.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग ६'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-4097446392599829118</id><published>2008-09-23T20:38:00.000+05:30</published><updated>2008-09-23T20:44:04.596+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग ५</title><content type='html'>पांडवांचा उत्कर्ष सहन न होऊन व युधिष्ठिराला युवराजपद व कालांतराने राजपद मिळणार हे पाहून दुर्योधनाने धृतराष्ट्राला अनुकूल करून घेऊन त्याचे करवीं पाडवांना वारणावतास पाठवले व त्यांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा कट रचला. पांडव हस्तिनापुरांतून द्ज़ुर जाणे धृतराष्ट्राला नक्कीच हवे होते. पुढचा बेत त्याला कदाचित माहीत नसेल. या बेतांत कर्ण सामील होता काय? त्याचा या दुष्ट बेतात सहभाग नव्हता. त्याला बेत बहुधा माहीत नव्हता. असा बेत त्याला पसंत पडला असता असे वाटत नाही. &lt;br /&gt;यानंतर महाभारतात कर्णाचा उल्लेख द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी येतो. पांडव लाक्षागृहातून वांचून, पुष्कळ हाल अपेष्टा सोसून, ब्राह्मणवेषात स्वयंवराला आले होते. स्वयंवराच्या सुरवातीलाच धृष्टद्युम्नाने फक्त मत्स्यवेधाचा पण जिंकणे पुरेसे नसून, उच्चकुल, आकर्षक व्यक्तिमत्त्व हींहि आवश्यक असल्याचे स्पष्ट्पणे सांगितले होते. स्वयंवराला अनेक राजे आले होते. पण जिंकण्याचा प्रयत्न करणारांच्यात कृष्ण, सात्यकी वा इतर यादव धनुर्धराचा समावेश नाही. इतर क्षत्रिय राजे पण जिंकू शकत नाहीत असे दिसून आल्यावर मगच, कर्ण पुढे झाला. द्रौपदीने ताबडतोब, &lt;strong&gt;’मी सूतपुत्राला वरणार नाही’ &lt;/strong&gt;असें म्हटले. यांत कर्णाचा अपमान झाला असे आजच्या दृष्टिकोनातून विचार करणार्‍या काहींना वाटले तरी ते खरे नाही. क्षत्रिय राजकन्या द्रौपदी आपणाला वरील काय याचा कर्णानेच प्रथम विचार करावयास हवा होता. एक प्रकारे त्याने हात दाखवून अवलक्षण करून घेतले असेच म्हणावे लागते. या प्रसंगी कोणीहि द्रौपदीला वा द्रुपदाला दोष दिलेला नाही. कर्ण हा कुंतीपुत्र आहे हे कोणाला माहीत नव्हते पण ते माहीत असते तरीहि त्याचा पिता ब्राह्मण वा क्षत्रिय असल्याशिवाय त्याला क्षत्रियांत स्थान मिळणे शक्य नव्हते. कर्ण ही एक वर्णसंकरातून निघालेली जात असा स्पष्ट उल्लेख अ. ११५, श्लोक ४०-४४ मध्ये आहे. (धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांच्या यादीत दुष्कर्ण, कर्ण व विकर्ण अशी तीन नावे आहेत. हे अर्थातच गांधारीचे पुत्र नव्हेत! बहुधा, दुर्योधन व दु:शासन हे दोघेच गांधारीचे पुत्र असावे. धृतराष्ट्राने &lt;strong&gt;’तूं माझ्या सर्वात ज्येष्ठ राणीचा सर्वात ज्येष्ठ पुत्र आहेस’ &lt;/strong&gt;असे दुर्योधनाला संबोधिलेले आढळते. धृतराष्ट्राच्या इतर स्त्रियांचा उल्लेख आहेच. युयुत्सु यालातर स्पष्टपणे दासीपुत्र म्हटलेले आहे. दु:शासन सोडून इतर कोणीहि भाऊ दुर्योधनाच्या फारसे खिसगणतीत नव्हते. यावरूनहि ते त्याचे सख्खे भाऊ नसावे असा तर्क निघतो.)&lt;br /&gt;कर्णाला पण जिंकण्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला. त्याला पण जिंकता आला असता काय? या प्रष्नाचे उत्तर अर्थातच देता येणार नाही! इतर अनेकांना यश आले नव्हते. ब्राह्मणवेषांतील अर्जुनाने पण जिंकला याचा इतर क्षत्रिय राजांना अपमान वाटला व त्यानी अर्जुनाला घेरले. याप्रसंगी इतर क्षत्रिय राजांबरोबर कर्णहि अर्जुनाविरुद्ध युद्धाला उभा राहिला. खरे तर क्षत्रिय राजांच्या मान-अपमानाशी कर्णाचा काय संबंध? त्याला आपले शौर्य दाखवण्याची खुमखुमी आली! पण जिंकणारा ब्राह्मण म्हणजे अर्जुन हेहि अजून उघड झाले नव्हते. अर्जुनाने भीमाच्या मदतीने सर्वांना भरपूर झोडपले. हें कर्णाचे व अर्जुनाचे प्रथमच प्रत्यक्ष युद्ध होते. कर्णाचे अर्जुनापुढे काही चालले नाही. हा आपल्या तोडीस तोड आहे अशी अ. १९०, श्लोक १६-१९ मध्ये कर्णाची स्पष्ट कबुली आहे! ब्रह्मतेजापुढे काही चालत नाही अशी लटकी सबब सांगून कर्ण स्वस्थ बसला! कर्णाला पूर्वीपासूनच पाडवांबद्दल अकारण असूया व द्वेष वाटत होता त्यात आतां द्रौपदीच्याहि द्वेषाची भर पडली. &lt;br /&gt;आपण कुंतीपुत्र आहोत हें कर्णाला हा वेळ्पर्यन्त माहीत झाले होते असे महाभारत म्हणत नाही. मात्र खुद्द अधिरथ वा त्याचा कोणी जवळचा आप्तच माझ्या तर्काप्रमाणे कर्णाचा पिता असेल तर, केव्हांतरी, आपली माता कुंती हे त्याला कळणे शक्य आहे. अशा गोष्टी कोठून तरी फुटतातच! भारतीय युद्धापूर्वी प्रथम कृष्णाने व नंतर कुंतीने स्वत:च, तो कुंतीपुत्र असल्याचे त्याला सांगितले तेव्हा त्याने आश्चर्य व्यक्त केलेले नाही! मात्र पिता कोण हे रहस्य कुंतीने तेव्हाही उघड केलेले नाही. सूर्यापासून जन्म हीच कथा कायम ठेवली. देवापासून माणसाचा जन्म हे अमान्य केले तर तर्क करण्यावाचून पर्याय नाही. म्हणून कर्ण हा खरा सूतपुत्रच असा तर्क मी केलेला आहे. &lt;br /&gt;या स्वयंवरप्रसंगात कर्णाचे व्यक्तिमत्त्व उजळून निघालेले म्हणता येत नाही. महाभारतकारानी अर्जुनापुढे त्याला डावाच ठरवला आहे.&lt;br /&gt;यापुढील कर्णचित्रण पुढील भागात वाचा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-4097446392599829118?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/4097446392599829118/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=4097446392599829118' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4097446392599829118'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4097446392599829118'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/09/blog-post_23.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग ५'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-7177417965170258630</id><published>2008-09-17T18:51:00.000+05:30</published><updated>2008-09-17T18:52:52.271+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग ४</title><content type='html'>मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, कर्णाचा खरा पिता कोण हे रहस्य कुंतीने अखेरपर्यंत जपले. पांडूशी विवाह होऊन पुष्कळ काळ विवाहसौख्य भोगूनहि तिला वा माद्रीला अपत्य झाले नाही. पुत्राशिवाय मोक्ष नाही या भावनेने पांडूने अखेर नियोग पत्करला व कुंतीला तसे सुचवले तेव्हाही कुंतीने आपल्या कानीन पुत्राच्या (कर्णाच्या) अस्तित्वाचा उल्लेख केला नाही. तो कोठे आहे हे तिला माहीत नसावें हे एक कारण असेल. त्याचा जन्म ब्राह्मण वा क्षत्रिय पित्यापासून झालेला नसल्यामुळे तो पांडूला मान्य होणार नाही हे कुंती जाणून होती हे जास्त सयुक्तिक कारण दिसतें. विचित्रवीर्याच्या मृत्यूच्या वेळी ही अडचण आली नव्हती. सत्यवतीचा कानीन पुत्र व्यास हा पराशर पुत्र होता. तो ऋषि असल्यामुळे स्वत: कुरुंचा राजा होणार नव्हता पण अंबिका-अंबालिका यांना पुत्रवती करण्य़ासाठी त्याला बोलावण्याचा सल्ला खुद्द भीष्मानेच सत्यवतीला दिला व तिलाही तो वावगा वाटला नाही. &lt;br /&gt;नियोगांतून पांडव जन्मले. पांडू व माद्री यांचा मृत्यु झाला व कुंती पुत्रांसह हस्तिनापुराला आली. तोवर दुर्योधनादि कौरवांचाहि जन्म झालेला होता. दुर्योधन व भीम एका वयाचे होते. कौरव-पांडव मोठे झाले. प्रथम कृपाचार्य व मग द्रोणाचार्य यांनी त्यांचे युद्धकलेचें शिक्षण केले. या सर्व काळात एकदांहि कर्णाचा उल्लेख येत नाही. त्याचे बालपण व शिक्षण कोठे झाले याबद्दल काही उल्लेख नाही. कुंती पांडुपत्नी बनून हस्तिनापुराला येण्यापूर्वी कर्णाला अधिरथाने दूर पाठवले असले पाहिजे. त्या काळात त्याचे शिक्षण दुसर्‍या कोणा गुरूपाशी झाले व मग त्याने धनुर्वेदाचे उच्च शिक्षण परशुरामापाशी झाले. आपण ब्राह्मण असल्याचे त्याने म्हटले होते ते खरे नाही असे उघडकीस आल्यामुळे ’मी दिलेली विद्या तुला ऐनवेळी कामास येणार नाही’ असा शाप परशुरामाने त्याला दिला अशी कथा आहे. यांतहि कर्णावर अन्याय झाला असे काहीना वाटते. माझ्या मते कर्ण अनेक वेळा कसोटीच्या वेळी उणा पडलेला दिसतो त्याचे हे स्पष्टीकरण दिलेले असावे.  &lt;br /&gt;गुरु द्रोण, त्याचे कौरव, पांडव व इतर शिष्य, विशेषेकरून अर्जुन, यांची कीर्ति कर्णाच्या कानावर गेली असावी. कौरवपांडवांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांच्या कौशल्यप्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे हेहि त्याच्या कानावर गेले असणार. या कार्यक्रमाच्या वेळी, जन्मकथेनंतर प्रथमच महाभारतात कर्णाचा उल्लेख येतो. सर्व शिष्य व शेवटी अर्जुन याचे कौशल्यप्रदर्शन पार पडल्यानंतर अचानक कर्ण आपल्या कौशल्याचे प्रदर्शन दाखवण्यासाठी पुढे सरसावला. त्याला अर्जुनाचा वाटणारा मत्सर त्याच्या आव्हानात्मक भाषणातून स्पष्ट झाला. आव्हान दिल्याप्रमाणे त्याने अर्जुनाच्या बरोबरीने सर्व कौशल्याचे प्रदर्शन केले. अधिरथाला कर्ण असा अचानक रंगमंचावर येणार आहे याची बिलकुल कल्पना नव्हती, नाहीतर त्याने खचितच त्याचे अचानक कुंतीसमोर येणे टाळले असते! कर्णाच्या कौशल्याने भीष्म-द्रोण चकित झाले. हा परशुरामशिष्य आहे हे कोणाला माहीत नसावे. या प्रसंगाच्या वर्णनात तसा उल्लेख अजिबात नाही. कर्ण हा द्रोणाचा शिष्य होता अशी काहींची समजूत असते पण ते मुळीच खरे नाही. सूतपुत कर्णाचा द्रोणाने शिष्य म्हणून स्वीकार केला नसता. निषादराजपुत्र एकलव्य याचाही त्याने स्वीकार केला नव्हता! कर्णजन्मानंतर काही काळाने कुंतीचा विवाह, मग हस्तिनापुरात दीर्घकाळ वास्तव्य व संसारसुख भोगल्यावर वनात काही काळ संचार, अपत्यप्राप्तीबद्दल पांडूची पूर्ण निराशा झाल्यावर मग नियोगाचा स्वीकार, नंतर युधिष्ठिर, भीम व नंतर अर्जुन यांचा जन्म हा कालक्रम विचारांत घेतला तर, कर्ण हा अर्जुनापेक्षा १२-१४ वर्षांनी वडील असला पाहिजे! अर्जुन या प्रसंगी १६ वर्षांचा कोवळा तरुण असणार तर कर्ण २८-३० वर्षांचा होता! त्याने नवतरुण अर्जुनाबरोबर स्पर्धा करणे हास्यास्पदच म्हणावे लागेल! त्याने अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिल्यावर साहजिकच त्याच्या कुळशीलाची चौकशी झाली. याचवेळी अधिरथाने पुढे येऊन त्याला पुत्र म्हणून संबोधिल्यामुळे तो सूतपुत्र आहे हे उघड झाले. पूर्वी कधीहि न पाहिलेला कर्ण समोर आल्यावर कुंतीने त्याला ताबडतोब ओळ्खले व तिला भोवळ आली! विदुराच्या ते लगेच लक्षात आले व त्याने तिच्यावर उपचार करविले. कुंतीचे रहस्य उघड होऊ दिले नाही. कुंतीने जन्मजात कवचकुंडलांमुळे कर्णाला ओळखले असे महाभारत म्हणते. कवचकुंडले ही एक अद्भुत कथा आहे. ती दूर ठेवावयाची तर कवचकुंडले म्हणजे दागदागिने, सोनेनाणे असे मानले पाहिजे. तेव्हा कुंतीने कर्णाला ओळखण्याचे कारण, ओळखीचे दागिने किंवा, बहुधा, खर्‍या पित्याशी कर्णाचे असलेले साम्य हे असावे. कुंतीने अर्थातच कर्णाची ओळख दाखवली नाही. ते शक्यच नव्हते. ती अगतिक होती. &lt;br /&gt;कर्ण सूतपुत्र ठरल्यामुळे द्वंद्वाचा विषय संपला. दुर्योधनाने कर्णाला लगेच जवळ केले, अंगदेशाचे राज्य दिले. हे कसे काय? वास्तविक दुर्योधन स्वत: राजा वा युवराजहि नव्हता. वयानेहि दुर्योधन अर्जुनापेक्षा किंचित मोठा, तरीहि विशीतलाच होता. अंगदेश कुरूंच्या राज्यात समाविष्ट होता काय? त्याची राजधानी कोठे होती? महाभारत म्हणते  तेव्हा राज्य दिले हे खरे मानले पाहिजे. कर्णाने तेथे जाऊन राज्य चालवले असे दिसत नाही. तो कायम दुर्योधनापाशीच दिसतो. अंगदेशाचे राज्य या वेळेपर्यंत ज्या कोणाकडे होते त्यांनी कर्णाचे स्वामित्व मान्य केले काय व कां? महाभारतांत खुलासा नाही. अंगदेशाचे राज्य हा जणू एक नाममात्र सन्मान होता! किंवा अंगराज्याकडून कौरवांना मिळणारी खंडणी यापुढे कर्णाला मिळणार होती. अर्थात राज्य दिले तरी दुर्योधन कर्णाला क्षत्रिय करू शकत नव्हता. अखेरपर्यंत कर्णाला सूत म्हणूनच जन्म घालवावा लागला. मात्र कर्णाने या प्रसंगी दुर्योधनाची बाजू घेतली ती अखेरपर्यंत कधीहि सोडली नाही. दुर्योधनानेहि दु:शासनाएवढेच प्रेम व सन्मान कर्णाला नेहेमीच दिला. मैत्रीचे असे उज्वल उदाहरण क्वचितच सापडेल. अर्जुनाबद्दल असूया व स्पर्धेची भावनाहि कर्णाने कायमच बाळगली. वयाचा फरक लक्षात घेतला तर या प्रसंगात कर्ण अर्जुनापेक्षा उजवा ठरला असे म्हणता येत नाही. &lt;br /&gt;यानंतर लगेचच, पूर्वीच्या अपमानाची भरपाई करून घेण्यासाठी द्रोणाच्या मागणीप्रमाणे प्रथम कौरवांनी व नंतर पांडवांनी द्रुपदावर हल्ला केला. यावेळी कर्ण दुर्योधनाबरोबर होता. मात्र कर्णाच्या धनुर्विद्येचा द्रुपदावर काहीहि प्रभाव पडला नाही! कर्णाचा पराभव झाला याचे दुर्योधनाला फारसे वैषम्य वाटलेले दिसत  नाही. द्रोण हा काही कर्णाचा गुरु नसल्यामुळे त्याच्या अपमानाशी त्याला काही देणेघेणे नव्हते त्यामुळे तो पूर्ण बळाने लढला नाही असे फार तर त्याच्या समर्थनासाठी म्हणता येईल. कौरव व द्रोण हरल्यावर मात्र, पांडवांनी द्रुपदाचा पूर्ण पराभव करून द्रोणाच्या अपमानाची भरपाई केली. यात मुख्य पराक्रम अर्थातच अर्जुनाचा होता. या प्रसंगात त्यामुळे अर्जुन कर्णापेक्षा निश्चितच उजवा ठरला.&lt;br /&gt;यापुढील कर्णकथेचा मागोवा पुढील भागात वाचा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-7177417965170258630?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/7177417965170258630/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=7177417965170258630' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7177417965170258630'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7177417965170258630'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/09/blog-post_17.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग ४'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-285495153911119749</id><published>2008-09-10T19:37:00.000+05:30</published><updated>2008-09-10T19:52:07.019+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग ३</title><content type='html'>कर्णजन्माबद्दल माझा तर्क असा आहे. कुंती माता होणार हे दिसून आल्यावर तिच्या दत्तक मातापित्यानी म्हणजे कुंतिभोज व पत्नी यानी, तिचे पुढील जीवन नासून जाऊं नये यासाठी तिच्या बालकाला जन्मानंतर लगेचच दूर पाठवून देण्याची व्यवस्था केली व तिच्या चुकीवर पांघरूण घातले असावे असा तर्क सहजच सुचतो. आईबापाना काहीहि कळू न देतां एकट्या अल्पवयीन कुंतीने स्वत:च्या विचाराने व सेविकेच्या मदतीने, स्वत:चे पूर्ण गर्भारपण व बाळंतपण पार पाडले व कर्णाला पेटीत घालून नदीत सोडून दिले असे महाभारतात म्हटले आहे खरे पण ते कसे शक्य आहे? ती व्यवस्था आईवडिलानी केली असे मानणे जास्त सयुक्तिक आहे. काही काळ गेल्यावर हिचे स्वयंवर करावे असा त्यांनी विचार केला असेल. पण कुंतीच्या आईनेहि मूल पेटीत घालून नदीत सोडले हे खरे वाटत नाही. पण मग काय केले असेल? कर्ण अधिरथापर्यंत कसा पोचला?&lt;br /&gt;अधिरथ हा हस्तिनापुरातील सूत म्हणजे सारथी पण तो खुद्द पांडू, भीष्म, धृतराष्ट्र वा दुर्योधनाचा वा इतर कुणा नामवंताचा सारथी असल्याचा उल्लेख नाही. तसा तो नगण्यच आहे. खुद्द त्याचा वा त्याच्या कुणा आप्ताचा कुंतिभोजाशी काही सेवा-संबंध असणे शक्य आहे. अधिरथ स्वत: वा त्याचा कोणी आप्त कर्णाचा खरा पिता होता काय? असा काही संबंध असेल तर कदाचित बालकाच्या जन्मानंतर लगेच, सोनेनाणे, दागदागिने (जन्मजात कवचकुंडले!) बरोबर देऊन त्याला अधिरथाकडे गुपचुप पाठवून दिले असणे नैसर्गिक वाटते. अधिरथ व राधा याना अपत्य नसल्यामुळे त्यांनी ही व्यवस्था मान्य केली व कर्णाला लहानाचा मोठा केला. अधिरथाचा वा त्याच्या कुणा आप्ताचा कर्णजन्माशी संबंध असल्यामुळे त्यानी ही जबाबदारी पत्करली असेल हा माझा तर्क आहे. मात्र याला महाभारतात काहीहि आधार नाही. &lt;br /&gt;सूत हे क्षत्रियांच्या बरॊबरीचे नव्हे पण फारसे खालच्या दर्जाचे मानले जात नव्हते. सारथ्यकर्म हे त्यांचे मुख्य काम. मात्र सारथ्यकौशल्याची महति क्षत्रिय जाणून होते. स्वत:च्या सारथ्यकौशल्याचा त्यांना अभिमानहि असे. खुद्द श्रीकृष्ण, शल्य, अर्जुन, सुभद्रा, विराटपुत्र उत्तर, नलराजा, ऋतुपर्ण राजा, रामायणकाळात कैकेयी, या क्षत्रियांची सारथ्यकौशल्याबद्दल ख्याति होती. धृतराष्ट्राला युद्धवर्णन ऐकवणारा संजय आणि विराटाचा मेहुणा कीचक हे सूत होते. (क्षत्रियकन्येने सूताला वरल्याचे मात्र उदाहरण नाही!). यावरून सूतांचे सामाजिक स्थान क्षत्रियांच्या खालोखाल होते असे दिसते. कर्ण हा माझ्या तर्काप्रमाणे अधिरथ वा त्याचा आप्त, कुंतिभोजाचा सारथी, याचा पुत्र असेल तर जन्मानंतर त्याला अधिरथाकडे पाठवून देण्यात आपण त्याच्यावर काही अन्याय करतो आहोत असें कुंतिभोजाला व त्याच्या पत्नीला वाटण्याचे काही कारण नव्हते. मातापित्यानी कर्णाची काय व्यवस्था केली वा त्याला कोठे पाठवले हे कदाचित कुंतीला माहीतहि नसेल! कुंतिभोजाने कुंतीचे स्वयंवर थोड्या काळाने योजिले तेव्हां तिने पांडूला वरले. कर्ण हस्तिनापुरातच वाढतो आहे हें तिला माहीत असतें तर पांडूला वरण्याचा धोका तिने कदाचित टाळला असता. मात्र कुंती हस्तिनापुराची राणी होणार म्हटल्यावर कुंतिभोजाने वेळीच अधिरथाला कळवून कर्णाला हस्तिनापुरापासून दूर केले असावें. त्यामुळे विवाहानंतरच्या हस्तिनापुरातील सुरवातीच्या वास्तव्यात कर्ण तिच्या नजरेला येऊन तिने त्याला ओळखण्याची वेळ आली नाही. विदुर हा अतिशय दक्ष असा मंत्री असल्यामुळे व त्याचे हेरखाते कार्यक्षम असल्यामुळे कुंतीचा पुत्र हस्तिनापुरात अधिरथाकडे वाढतो आहे हे माहीत होते. कर्णाला हस्तिनापुरातून दूर पाठवण्याचे काम कदाचित त्यानेच केले असेल!&lt;br /&gt;कर्णजन्माची कथा आदिपर्वात प्रथम आली आहे. तिचे स्वरूप वर वर्णिल्याप्रमाणे आहे. महाभारतात पुढे प्रत्यक्ष युद्धापूर्वी सूर्य कर्णाला भेटला व इंद्र तुझ्याकडे येऊन तुझी कवचकुंडले मागेल ती तूं देऊ नको असे त्याने कर्णाला सांगितले असा एक प्रसंग आहे. याठिकाणी कर्णजन्माची कथा जास्त विस्ताराने सांगितली आहे व ती आदिपर्वांतील कथेपेक्षा काहीशी वेगळी आहे. येथे कुंतीला वर देणारा ब्राह्मण दुर्वास असे म्हटलेले नाही. अधिरथाचा उल्लेख धृतराष्ट्राचा मित्र असा केलेला आहे. अधिरथ व राधा अंगदेश या सूतांच्या राज्यात गेलेली असताना गंगाकिनारी राधेला कर्णाची पेटी मिळाली असे वर्णन आहे. (कुंतिभोजाचे राज्य कोठे होते, गंगाकिनारी वा तिच्या एखाद्या उपनदीच्या किनारी? अंगदेश हा त्या राज्याच्या शेजारी होता काय?) येथील कथेप्रमाणे वर मिळाले तेव्हा कुंती अजाण कुमारी होती. वयात आल्यावर उत्सुकतेपोटी तिने मंत्राचा वापर करून सूर्याला बोलावले. प्रथम घाबरून तिने सूर्याला नकार दिला पण नंतर तो आपल्या कुळाला शाप देईल या भीतीने त्याची मागणी मान्य केली असे म्हटले आहे. बालक पेटीत ठेवून नदीत सोडण्याचे काम तिनेच स्वत: दासीच्या मदतीने केले असे वर्णन आहे. त्यानंतर अर्ध्या रात्रीपर्यंत नदीकाठी शोक करून मग पित्याला कळेल या भीतीने ती राजवाड्यात परत आली. पुढे स्वत:चे दूत पाठवून आपला पुत्र हस्तिनापुरात कसाकाय वाढतो आहे याचीहि बातमी तिने काढली होती असे वर्णन आहे. हें सर्व वर्णन असंभव वाटते. त्यापेक्षा वर वर्णिलेला माझा तर्क जास्त सयुक्तिक वाटतो. मात्र या प्रसंगीहि सूर्याने कर्णाला तू माझा पुत्र आहेस असे म्हटलेले नाहीच! कर्णाचा खरा पिता कोण हे रहस्य कुंतीने अखेरपर्यंत जपले. कर्णाच्या जन्माबद्दल व पितृत्वाबद्दल याहून जास्त काही सांगण्यासारखे नाही. त्याच्या पुढील आयुष्याचा आढावा पुढील लेखात घेऊंया. वाचत रहा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-285495153911119749?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/285495153911119749/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=285495153911119749' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/285495153911119749'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/285495153911119749'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/09/blog-post_10.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग ३'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-8527973663205208152</id><published>2008-09-08T20:12:00.000+05:30</published><updated>2008-09-08T20:26:34.459+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग २</title><content type='html'>कर्णाची माता कुंती याबद्दल कोणताही संदेह नाही. कुंती ही वसुदेवाचा पिता शूर याची कन्या. वसुदेवाची सख्खी भगिनी कीं सावत्र हें स्पष्ट नाही. शूराचा मित्र कुंतिभोज याला अपत्य नव्हते म्हणून शूराने आपली कन्या त्याला देऊन टाकली. कन्या दत्तक देण्याचे हे एक अपवादात्मक उदाहरण म्हणावे लागेल! शिशुपालाची माता ही पण कृष्णाची आत्या म्हणजे वसुदेवाची बहीणच पण सख्खी नव्हे. कुंती व शिशुपालाची माता वा कुंती व वसुदेव यांच्या भेटीगाठी वर्णन करणारा एकही प्रसंग महाभारतात नाही. जणू कुंतीला कुंतिभोजाकडे देऊन टाकल्यावर तिचे आईबाप व भावंडे तिला विसरलीच! दत्तक दिली तेव्हा तिचे वय काय होते, तिचा प्रतिपाळ कुंतिभोज व त्याच्या पत्नीने कसाकाय केला हे अज्ञात आहे. कुमारी वयात असताना तिला दुर्वासाच्या सेवेला ठेवले गेले हे एक नवलच. त्याने तिला खुशाल वशीकरण मंत्र शिकविले हे आणखी एक नवल! कुंतीच्या (गैर)वर्तनाचे समर्थन करण्यासाठी ही कथा मागाहून घुसडली कीं काय असा मला संशय येतो. कुंतिभोजाला मागाहून इतर कोणी अपत्ये झाली होती काय हे माहीत नाही. भारतीय युद्धात पांडवांकडून लढलेल्या वीरांमध्ये ’पुरुजित कुंतिभोज’ असा उल्लेख येतो. हा खुद्द कुंतिभोजच कीं त्याचा पुत्र हे उलगडलेले नाही. त्याच्या कुळातील इतर कोणा वीराचा उल्लेख नाही. &lt;br /&gt;कुंतिभोजपत्नीचे कुंतीकडे पुरेसे लक्ष नव्हते असे म्हणावे लागते. कुंतीला कौमार्यावस्थेत पुत्र कर्ण झाला. सूर्यापासून नव्हे तर मग कोणापासून? येथे प्रत्यक्ष माहितीच्या अभावी तर्काचा आश्रय घेणे आवश्यक आहे. कुंतीला कोणा उच्च कुळातील राजपुत्राचा वा राजपुरुषाचा सहवास घडलेला असता तर त्यांच्या विवाहाला कोणतीहि अडचण आली नसती. क्षत्रियांसाठी गांधर्व वा राक्षसविवाहहि(कन्येला पळवून नेणे) सर्वमान्य होता. ज्या अर्थीं कुंतीला पुत्राचा त्याग करावा लागला त्या अर्थी कर्णाचा पिता उच्च कुळातील असण्याची शक्यता वाटत नाही. ऋषींपासून क्षत्रियकन्यांना पुत्र होणे व पित्याने अल्पकालीन मोह सोडून देऊन, संसाराच्या पाशात न अडकतां, अपत्याची जबाबदारी मातेवर सोडून देऊन, स्वत: निघून जाणे, असा प्रकार अनेक उपकथानकांतून दिसून येतो. तेव्हा तर्कच करावयाचा तर खुद्द दुर्वासच कर्णाचा पिता होता काय? पण दुर्वास ब्राह्मण व कुंती क्षत्रियकन्या तेव्हा त्यांचे मीलन अनुचित मानले गेले नसते व पुत्राचा त्याग करण्याची कुंतीवर पाळी आली नसती. यावरून कर्णाचे पितृत्व इतर कोणाचे तरी म्हणावे लागते. बालक पेटीत घालून नदीत सोडून दिले ही अद्भुत कथा बाजूला ठेवली तर प्रत्यक्षात काय घडले असावे याचा तर्क केला पाहिजे. त्याबद्दल पुढील भागात वाचा. धन्यवाद.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-8527973663205208152?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/8527973663205208152/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=8527973663205208152' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8527973663205208152'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/8527973663205208152'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/09/blog-post_08.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग २'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-3412373201110990865</id><published>2008-09-06T18:22:00.000+05:30</published><updated>2008-09-06T18:47:33.399+05:30</updated><title type='text'>महाभारतातील कर्णकथा - भाग १</title><content type='html'>महारथी म्हणून गाजलेला कर्ण ही व्यक्तिरेखा अनेक लेखकांची आवडती आहे. मराठीत त्याचेवर विपुल लेखन झाले आहे. कर्ण हा प्रत्यक्षात कुंतीपुत्र असूनहि त्याला राधेय, सूतपुत्र म्हणून सर्व जन्म घालवावा लागला हा त्याचेवर फार मोठा अन्याय झाला या दृष्टिकोनातून या बहुतेक लेखनामध्ये एक सहानुभूतीचा सूर सर्वत्र ऐकू येतो. जातिभेद, अनौरस संतति, या विषयांवर आजच्या काळातील विचारांच्या पार्श्वभूमीवर योग्यच असले तरी ज्या काळातील ही कथा आहे त्या वेळच्या समाजधारणांशी हे फारसे सुसंगत नाही. महाभारतकथेमध्ये कर्ण हे एक महत्वाचे पात्र आहे. काही प्रसंगात त्याची प्रमुख भूमिकाहि आहे. महाभारतातील या प्रसंगांतील कर्णाच्या चित्रणाचा विचार करून खुद्द महाभारतकारांना कर्ण कसा दिसत होता, इतर समकालीनांना कसा वाटत होता हे पाहाणे उद्बोधक होईल. यासाठी कर्णजन्माच्या कथेपासून सुरवात करून पूर्ण मागोवा घेण्याचा विचार आहे. अद्भुतता बाजूला ठेवून, ही सर्व माणसांची कथा आहे या भूमिकेतून मी माझे विचार मांडणार आहे. पांडवांचे काय किंवा कर्णाचा काय, जन्म देवांपासून झाले ही कल्पना वा श्रद्धा दूर सारून, विचार करावयाचा व काही ठिकाणी तर्क चालवावयाचा आहे. पुढील लेखापासून माझ्या प्रतिपादनाला सुरवात होईल. आपण वाचत रहालच असे वाटते. धन्यवाद.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-3412373201110990865?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/3412373201110990865/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=3412373201110990865' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3412373201110990865'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3412373201110990865'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/09/blog-post.html' title='महाभारतातील कर्णकथा - भाग १'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-3549361298369430244</id><published>2008-08-31T18:02:00.000+05:30</published><updated>2008-08-31T18:17:12.304+05:30</updated><title type='text'>जयद्रथवध - भाग ६</title><content type='html'>सर्व संरक्षकाना वारंवार हरवून व सैन्यसंहार करून अखेर अर्जुनाने जयद्रथाला गाठलेच. त्याने जयद्रथाचा सारथी मारला व ध्वज तोडला. तोंवर पुन्हा संरक्षकानी त्याला मध्ये घेऊन अर्जुनाला अडवले. अर्जुनाने कृप, कर्ण, शल्य, दुर्योधन या सर्वांवर बाणवृष्टि करून व जखमी करून पुन्हा जयद्रथाला गाठले. अखेर सर्व संरक्षकाना दाद न देतां त्याने जयद्रथाला ठार केले. हा वेळ पर्यंत संध्याकाळ झाली होती व सूर्य आहे कीं अस्ताला गेला हे कळत नव्हते. मात्र कृष्णाने अर्जुनाला बजावून सांगितले होते की तूं सूर्याकडे न पाहातां जयद्रथ तावडीत सापडला कीं त्याला मार. त्याप्रमाणे अर्जुनाने जयद्रथवध केल्यावर नंतर पुन्हा सूर्य स्पष्ट दिसूं लागला. त्यामुळे अर्जुनाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली याबद्दल शंकेला जागाच उरली नाही. त्यानंतरही प्रत्यक्ष सूर्यास्त होईपर्यंत अर्जुन विरुद्ध कृप/अश्व्त्थामा व सात्यकी विरुद्ध कर्ण अशी युद्धे काही काळ चालूच राहिलीं. &lt;br /&gt;सूर्य काही काळ स्पष्ट न दिसणे व नंतर पुन्हा दिसू लागणे या नैसर्गिक घटना आहेत व त्याचे कर्तृत्व कृष्णाला देण्याचे काहीच कारण नाही. कृष्णाने योगमायेने सूर्य काही काळ अदृश्य केला अशी समजूत आहे त्याला काहीहि आधार नाही. महाभारतात तसे म्हटले आहे हे खरे पण तो मजकूर, कृष्णाला देवाचा अवतार मानू लागल्यानंतर, त्याचे महत्व वाढविण्यासाठी, मागाहून घुसडलेला स्प्ष्ट दिसून येतो. ते विशिष्ट श्लोक गाळले तर कोठेहि तुट्कपणा जाणवत नाही. सूर्य दिसत नव्हता असे अर्जुनाने वा कौरवपक्षाच्या कोणीहि म्हटलेले नाही. खुद्द जयद्रथही अखेरपर्यंत शर्थीने लढतच होता पण त्याचा अर्जुनापुढे टिकाव लागला नाही. ’हा सूर्य व हा जयद्रथ’ असे कृष्णाने म्हटले व मग अर्जुनाने समोर असलेल्या बेसावध जयद्रथाला मारले हे मुळीच खरे नाही. ती हरदासी कथाच! सूर्यास्ताला अजून काही काळ बाकी आहे याचा हिशेब कृष्णाने मनाशी बरोबर ठेवला होता व अर्जुनाचे चित्त त्याने विचलित होऊं दिले नाही हे खरे. ’सूर्य अस्ताला जाण्याची वेळ आली आहे तेव्हा आता वेळ न घालवता जयद्रथाला मार’ असे त्याने अखेरच्या क्षणी अर्जुनाला म्हटले व अर्जुनाने लगेच जयद्रथवध केला. &lt;br /&gt;सूर्यास्त झाला व अर्जुनाची प्रतिज्ञा फोल झाली अशा समजुतीने कौरवांकडून जयद्रथाच्या रक्षणाच्या प्रयत्नात शिथिलता आली असे बिलकुल झाले नाही वा तसा दावा वा कांगावाही कौरवांकडील कोणी केला नाही. अखेरपर्यंत अर्जुनाला जोराचा प्रतिकार होतच होता व तो मोडूनच त्याला यश मिळाले. दिवसभर शर्थीचे प्रयत्न करूनहि सगळे संरक्षक अर्जुनापुढे टिकले नाहीत हेंच खरे. अर्जुनाचा स्वबळावरचा विश्वास सार्थ ठरला व कृष्णावर स्वत:ची प्रतिज्ञा मोडून युद्धात उतरण्याची वेळ आली नाही. अर्जुनाने दिवसभर केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाचे यश कृष्णाच्या पदरात घालण्याचे काहीच कारण नाही. त्याने दिवसभर उत्तम सारथ्य करून अर्जुनाला जयद्रथापर्यंत नेले हे त्याचे कार्य थोडे नव्हे! कृष्णाची खरी थोरवी, त्याने डोळसपणे जो, वेळ आली तर, युद्धात स्वत: उतरण्याचा निर्णय घेतला होता व सारथी दारुकाला दिवसभर आपल्या मागे रहावयास सांगितले होते, त्यात आहे. रथ तयारच होता व अखेरच्या पर्वात त्याचा उपयोग रथहीन झालेल्या सात्यकीला झाला. &lt;br /&gt;जयद्रथवधामुळे दुर्योधन फार नाउमेद झाला. या एका दिवसात, अर्जुन, सात्यकी व भीम यानी सात अक्षौहिणी सैन्य मारले. (अ. १५०, श्लोक १४-१६) यातील अतिशयोक्ति सोडली तरी कौरवांचे सैन्यबळ हटले हे खरे. दुर्योधनाची खात्री पटली कीं आपल्या पक्षातील कोणीहि वीर अर्जुनाच्या तोडीचा नाही. दिवसभरात भीमाने व सात्यकीनेहि वारंवार कर्णाला हारविले त्यामुळे दुर्योधनाचा त्याच्यावरील विश्वासहि डळमळू लागला. यापुढील युद्धात द्रोण व कर्ण यानीहि पांडवसैन्य मोठ्या प्रमाणावर मारले पण सुरवातील ११ विरुद्ध ७ असे असलेले विषम प्रमाण या दिवशी जे उलट झाले व ते पुढे कायमच कौरवाना प्रतिकूल राहिले. &lt;br /&gt;युधिष्ठिराने जिवाची पर्वा न करतां सात्यकी व भीम यांना अर्जुनाच्या मदतीला पाठवले तेहि निर्णायक क्षण होते. द्रोणानेहि कबुली दिली कीं दिवसभर अर्जुन आणि बराच काळ सात्यकी व भीम नसूनहि त्याला धृष्टद्युम्न व इतर पांचालांचा निर्णायक पराभव करता आला नाही व युधिष्ठिराला पकडता आले नाही. ’आता आपली धृष्टद्युम्नापासून सुटका नाही’ असे द्रोणाने म्हटले. (अ. १५१ श्लोक २४-२६). जयद्रथाला वाचवणे व युधिष्ठिराला पकडणे हे या दिवसाचे दोनही युद्धहेतु विफल झाले. &lt;br /&gt;अशा प्रकारे कौरवांनी केलेला अभिमन्यूचा वध त्याना फार महागात पडला. एक दिवस अर्जुनाला अडवून धरले व जयद्रथाला वाचवले तर विजय आपलाच आहे अशी त्याना वाटलेली आशा फोल ठरली व येथून पुढे हे युद्ध पूर्णपणे त्यांचेविरुद्ध गेले.&lt;br /&gt;एक काल्पनिक प्रश्न असा की दुर्दैवाने सूर्य अस्ताला जाईपर्यंत जयद्रथवध झाला नसता तर काय झाले असते? माझ्या मते, कृष्णाने अर्जुनाला ताबडतोब अग्निकाष्ठे भक्षण करू दिली नसतीं. ’तुझे युद्ध तू पूर्ण कर, सर्व कौरवांचा संहार तूं व भीम पुरा करा व मग पाहूं’ असा निर्वाणीचा सल्ला दिला असता व अर्जुनाने ऐकलेच नसते तर मात्र त्याची जागा स्वत: नक्कीच घेतली असती पण कौरवांना विजयी होऊ दिले नसते! त्याच्या प्रतिमेशी हे सुसंगत आहे.&lt;br /&gt;हा विषय आता संपला. नवीन विषय पुढील लेखापासून सुरू होईल. वाचत रहा. धन्यवाद.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-3549361298369430244?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/3549361298369430244/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=3549361298369430244' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3549361298369430244'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/3549361298369430244'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post_31.html' title='जयद्रथवध - भाग ६'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-2506793087057708008</id><published>2008-08-28T21:07:00.000+05:30</published><updated>2008-08-28T21:51:37.913+05:30</updated><title type='text'>जयद्रथवध - भाग ५</title><content type='html'>अर्जुनाचे व दुर्योधनाचे युद्ध सुरू झाले. अर्जुनाचे बाण लागूनहि दुर्योधनाला इजा होत नाही हे पाहून कृष्ण चकित झाला. तुझ्या हातातील बळ संपले की काय असे त्याने अर्जुनाला खिजविले! द्रोणाने दुर्योधनाला बांधलेले मंत्रकवच ओळखून अर्जुन कृष्णाला म्हणाला की ही विद्या द्रोणाने मला एकट्यालाच शिकवली आहे व कवचाचा भंग करणेहि शिकवले आहे! त्याप्रमाणे कवचभंगासाठी त्याने केलेला अस्त्रप्रयोग मात्र अश्वत्थाम्याने दुरूनच दुसरे अस्त्र सोडून निष्फळ केला. आतां त्याच अस्त्राचा पुन्हा प्रयोगहि करता येणार नव्हता! त्यामुळे निर्भय झालेल्या दुर्योधनाने जोरदार शरवृष्टि सुरू केली तेव्हा राग येऊन अर्जुनाने त्याचा रथ, सारथी, घोडे यांचा नाश केला व त्याच्या तळहातांवर व नखांवर बाण मारले. हे भाग कवचाने संरक्षित नसल्याने भयंकर इजा होऊन दुर्योधनाने पळ काढला! आकस्मिक आलेल्या अडचणीला अर्जुनाने कौशल्याने तोंड दिले. यानंतर अर्जुनाचीं सहा संरक्षक वीरांशी वारंवार युद्धे झाली. &lt;br /&gt; द्रोणाशी सामना करताना युधिष्ठिराला कृष्णाच्या पांचजन्याचा सारखा आवाज येत होता पण अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा येईना त्यामुळे अर्जुनाच्या सुरक्षिततेची चिंता वाटून त्याने अखेर सात्यकीला &lt;strong&gt;’माझे रक्षण मी कसेही करीन पण तू जा’&lt;/strong&gt; असे निक्षून सांगून त्याला अर्जुनाच्या मदतीला पाठवले. युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी भीमावर सोपवून सात्यकी निघाला. द्रोण व कृतवर्मा यांचा जोरदार विरोध मोडून काढून सात्यकी सैन्यात घुसला. अनेक वीरांचा व सैन्याचा पुन्हापुन्हा संहार करून शेवटी तो अर्जुनाजवळ पोचला. सात्यकी जाऊनहि बराच वेळ झाला तरीहि अर्जुनाची खुशाली कळेना तेव्हा मोठा धोका पत्करून युधिष्ठिराने भीमालाहि अर्जुनाच्या मदतीला पाठवले. नाइलाजाने, युधिष्ठिराच्या संरक्षणाचा भार धृष्टद्युम्नावर सोपवून भीम निघाला. त्यालाहि द्रोणाशी जोरदार सामना करावा लागला. द्रोणाची पर्वा न करता, अनेक वीरांचा व सैन्याचा संहार करीत तोहि अर्जुनापर्यंत पोचला व त्याला खुशाल पाहून भीमाने मोठमोठ्याने गर्जना केल्या. त्या ऐकून अर्जुन व कृष्ण यांनीहि केल्या. त्या ऐकून युधिष्ठिराची खात्री पटली की अर्जुन, सात्यकी व भीम एकत्र व सुखरूप आहेत. &lt;strong&gt;’सात्यकी व भीम सैन्यात घुसले कसे व आता जयद्रथाचे काय होणार’ &lt;/strong&gt;अशी तक्रार घेऊन दुर्योधन पुन्हा द्रोणापाशी गेला. तेव्हा, &lt;strong&gt;’सात्यकी व भीम आता येथे नाहीत तेव्हा मी आता युधिष्ठिराला पकडण्याचा निकराचा प्रयत्न करतो, तुम्ही सर्वानी अर्जुनाचा प्रतिकार करा’&lt;/strong&gt; असे सांगून द्रोणाने त्याला परत पाठवले. आता पुन्हा सैन्यात शिरलेल्या युधामन्यु व उत्तमौजा यांची दुर्योधनाशी गाठ पडली. दुर्योधनाने त्याना हारवले पण त्यानीहि दुर्योधनाला रथहीन केले. भीम व कर्ण यांच्या वारंवार चकमकी झाल्या. भीमाने दरवेळी कर्णाला मार देऊन पळवून लावले. सतरा वेळा त्याचे धनुष्य तोडले. त्याच्या व दुर्योधनाच्या देखतच, त्याच्यावर चालून येणार्‍या अनेक कौरवांचा वध केला. अनेक चकमकींनंतर अखेर कर्णाने भीमाचा पराभव केला व त्याला दुरुत्तरे केली. अखेरपर्यंत भीमाने हार मानली नाहीच वा पळूनहि गेला नाही. त्याने कर्णाला द्वंद्वयुद्धाचे  आव्हान दिले. कर्णाचेहि धनुष्य तुटले होतेच. अर्जुन भीमाच्या मदतीला आल्यावर अखेर कर्ण व भीम इतरांच्या रथांवर बसून दूर झाले. अर्जुनाने यावेळी कर्णावर सोडलेला घातक बाण मात्र अश्वत्थाम्याने दुरूनच तोडून टाकला व आपण पळून गेला! कर्ण वांचला. इकडे सात्यकी व भूरिश्रवा यांचे तुंबळ युद्ध होऊन भूरिश्रवा सात्यकीचे केस पकडून त्याचे डोके उडवण्याच्या प्रयत्नात आहे असे कृष्णाने अर्जुनाच्या नजरेला आणले तेव्हा अर्जुनाने दुरूनच बाण सोडून भूरिश्रव्याचा हातच तोडला! नंतर सात्यकीने भूरिश्रव्याला मारले. जयद्रथाच्या रक्षणासाठी नेमलेल्या सहा वीरांपैकी भूरिश्रवा मेला व भीमाने कर्णाला वारंवार हरवून जखमी व नामोहरम केले त्यामुळे अर्जुनाला फार मदत झाली. कर्णाने दुर्योधनाशी कबुली दिली कीं &lt;strong&gt;’भीमाकडून मी आज एवढा मार खाल्ला आहे की युद्धात उभे राहिलेच पाहिजे म्हणून मी नाइलाजाने उभा आहें.’&lt;/strong&gt; यानंतर जयद्रथाच्या प्रत्यक्ष वधाचे वर्णन पुढील भागात वाचा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-2506793087057708008?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/2506793087057708008/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=2506793087057708008' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2506793087057708008'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2506793087057708008'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post_28.html' title='जयद्रथवध - भाग ५'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-5509689313016254526</id><published>2008-08-24T23:17:00.000+05:30</published><updated>2008-08-24T23:22:49.812+05:30</updated><title type='text'>जयद्रथवध - भाग ४</title><content type='html'>युद्ध सुरू झाल्यावर दोन स्पष्ट भाग पडले. कित्येक वीर व प्रचंड सैन्य अर्जुनाचा प्रतिकार करत होते तर दुसरीकडे द्रोणाचा प्रतिकार युधिष्ठिर, सात्यकी, धृष्टद्युम्न व इतर पांचाल वीर करत होते. अर्जुनाने सबंध दिवसभर कित्येक प्रमुख वीरांशी, काहींशी पुन्हापुन्हा, सामना करत व प्रचंड सैन्यसंहार करत जयद्रथाच्या दिशेने प्रगति चालू ठेवली. युधामन्यु व उत्तमौजा या दोन पांचाल राजपुत्रांकडे अर्जुनाचा रथ रक्षण्याचे काम होते. मात्र सुरवातीलाच, कृतवर्म्याने त्यांना अडवून धरले. अर्जुन पुढे निघून गेला. त्यानंतर दिवसभर त्याना अर्जुनाला गाठता आले नाही. सगळ्या कौरवसैन्याला वळसा घालून दिवस अखेरीला ते पाठीकडून अर्जुनापाशी पोचले. &lt;br /&gt;द्रोणाला बाणांनीच वंदन करून व कृतवर्म्याला हारवून अर्जुन एकटाच सैन्यात घुसल्यावर, दिवसभर अनेकानी त्याला अडवले. अनेकाना त्याने मारले. सर्वांची यादी देत बसण्यात अर्थ नाही. दुर्योधन द्रोणापाशी जाऊन तक्रार करू लागला की तुम्हाला ओलांडून अर्जुन पुढे कसा गेला? तुम्ही वचन दिले नसते तर मी जयद्र्थाला परत जाऊं दिले असते. आता त्याचे रक्षण कसे करावे याची सर्वाना चिंता वाटते आहे. द्रोणाने उत्तर दिले की कृष्णाने रथ एवढ्या वेगाने नेला की माझे बाण त्याच्यापर्यंत पोचेनात. आता तो गेलाच आहे व समोर युधिष्ठिर आहे तर त्याला पकडण्याचा मी यत्न करतो. तुला मी मंत्र कवच बांधतो. म्हणजे तुला अर्जुनाचे बाण लागणार नाहीत. तूंहि शूरवीर आहेस तेव्हा तू अर्जुनाशी सामना कर. कवच बांधून दुर्योधन अर्जुनाला गाठण्यासाठी गेला. इकडे दिवसभर, अर्जुनाशी सामना करण्यासाठी मोकळे ठेवलेले सहा महावीर सोडून इतर अनेक वीरांनी द्रोणाला युधिष्ठिराला पकडण्यासाठी साह्य केले. युधिष्ठिर, सात्यकी, भीम, धृष्टद्युम्न व इतर पांडव व पांचालवीर यांनी या हल्ल्यांचा भार वाहिला.&lt;br /&gt;अर्जुन  हळूहळू जयद्रथाच्या दिशेने प्रगति करीत होता. अवंतीचे महारथी राजे विंद व अनुविंद यानी त्याला अडवले. त्याना अर्जुनाने मारले व त्यांचे सैन्य उधळून लावले. यानंतरची एक अद्भुत घटना म्हणजे, आपल्या घोड्याना विश्रांति व सेवा हवी आहे असे पाहून अर्जुन रथातून खाली उतरून फक्त एका धनुष्याने सैन्याचा प्रतिकार करत राहिला व कृष्णाने शांतपणे घोडे सोडून व त्याना खरारा करून, अंगात घुसलेले बाण काढून टाकून व हलकेच फिरवून त्याना परत हुशार केले व पुन्हा रथाला जोडले. अर्जुन व कृष्ण पुन्हा रथावर चढलेले पाहून कौरव योद्धे उदासीन झाले व जयद्रथ आता वाचत नाही असें म्हणू लागले. यावेळी मंत्रकवच बांधलेला दुर्योधन स्वत: अर्जुनाला भिडला. तो वृत्तांत पुढील भागात वाचा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-5509689313016254526?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/5509689313016254526/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=5509689313016254526' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5509689313016254526'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5509689313016254526'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post_24.html' title='जयद्रथवध - भाग ४'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-7832805969874788075</id><published>2008-08-20T18:46:00.000+05:30</published><updated>2008-08-20T18:58:54.727+05:30</updated><title type='text'>जयद्रथवध भाग - ३</title><content type='html'>अर्जुनापासून जयद्रथाला एक दिवसभर वांचवण्यासाठी द्रोणाने सर्व कौशल्य पणाला लावून व्यूहरचना केली. सर्व सैन्याच्या व्यूहाच्या मागे दूरवर जयद्रथाला ठेवून त्याच्या रक्षणासाठी खुद्द जयद्रथाचेच मोठे सैन्य ठेवले. शिवाय कर्ण, अश्वत्थामा, शल्य, कृप, भूरिश्रवा, कर्णपुत्र वृषसेन या सहा महावीरांना मोकळे ठेवून त्याना अर्जुनाचा प्रतिकार करण्याचेच काम दिले. मुख्य सैन्याचा चक्रशकट नावाचा व्यूह रचून त्याचे प्रमुखपदी दु:शसन, दुर्मर्ष व विकर्ण याना नेमून व्यूहाच्या अग्रभागी द्रोण स्वत:  होता. पाठीमागील कौरव सैन्याचा पद्मव्यूह रचून त्याचे प्रमुखपद कृतवर्म्याकडे दिले होते. हा सर्व व्यूह तोडून व सहा महावीरांचा प्रतिकार मोडून काढल्यावरच अर्जुनाला जयद्रथ दिसणार होता व मग त्याच्याशी अंतिम युद्ध करावयाचे होते! सहा महावीराना मोकळे ठेवण्याचा हेतु त्यानी दिवसभर अर्जुनाला पाळीपाळीने अडवावयाचे असा होता. हा एक Dynamic Defense चा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. अर्जुन हा व्यूह तोडण्यात व सहांशी लढण्यात दिवसभर मग्न असताना द्रोणाच्या हाताखालील वीरांचा मुख्य रोख युधिष्ठिरावर राहणार होता. त्याला पकडण्याची या दिवशी चांगली संधि होती. पांडवांनाहि याची जाणीव होती त्यामुळे या दिवशी मात्र व्यूहात शिरण्यापूर्वी अर्जुनाने युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी महारथी सात्यकीवर टाकली होती. या  दिवशीच्या युद्धाचे फार निर्णायक परिणाम झाले त्याचे वर्णन महाभारतात फार सुंदर व खुलासेवार केले आहे. ते आता पुढील भागात वाचा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-7832805969874788075?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/7832805969874788075/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=7832805969874788075' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7832805969874788075'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7832805969874788075'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post_20.html' title='जयद्रथवध भाग - ३'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-2970843736031719627</id><published>2008-08-17T17:11:00.000+05:30</published><updated>2008-08-17T17:22:27.748+05:30</updated><title type='text'>जयद्रथवध भाग - २</title><content type='html'>आदल्या दिवशी प्रचंड हानि होऊनहि या दिवशी पुन्हा एकदा त्रिगर्तांनी अर्जुनाला आव्हान दिले व यावेळी मात्र त्याला दिवसभर अडवून ठेवण्यात यशस्वी झाले. सर्व भारतीय युद्धाच्या वर्णनात अर्जुनाच्या अनेक पराक्रमांचे खुलासेवार वर्णन आहे. आदल्या दिवशी त्रिगर्तांचे अर्जुनाने केलेले हाल तसेच खुलासेवार वर्णिले आहेत. या दिवशीचे त्रिगर्त-अर्जुन युद्धवर्णन मात्र अतिशय त्रोटक आहे. हे एक नवल आहे. प्रत्यक्षांत अर्जुन या दिवशी थकव्यामुळे वा जखमांमुळे युद्धापासून दूरच राहिला होता कीं काय अशी मला शंका आहे! दुसरे नवल म्हणजे या दिवशी अर्जुन मुख्य युद्धापासून दूर असूनहि द्रोणाने युधिष्ठिराला पकडण्याचा प्रयत्न केलाच नाही! त्याने सैन्याचा चक्रव्यूह रचला. तो खरेतर बचावात्मक व्यूह होता. &lt;strong&gt;आक्रमण करण्यास अत्यंत कठीण &lt;/strong&gt;असेच त्याचे वर्णन केलेले आहे. तो कसा तोडावा हे अर्जुन सोडून इतर कोणाला माहीत नव्हते. अर्जुनाशिवाय जो कोणी या व्यूहावर आक्रमण करील तो मारला जाईल ही द्रोणाची अपेक्षा असावी. त्यानुसारच त्यांची एकातरी प्रमुख वीराला मारण्याची प्रतिज्ञा होती. मात्र अर्धवट ज्ञानावर अभिमन्यूने प्रयत्न केला व व्यूह तोडल्यावर तो फारच अनावर झाला. एकटा असूनहि दिवसभर त्याने अतुल पराक्रम केला व कौरवसैन्याची अपरिमित हानि झाली. अनेक वीर मारले गेले. दिवस अखेरीला द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा, बृहत्बल व कृतवर्मा या सर्वांनी एकत्र येऊन त्याला घेरण्यात व त्याचे धनुष्य तोडण्यात यश मिळवले व मग कसाबसा त्याचा वध केला व सुटकेचा निश्वास टाकला! प्रत्यक्ष म्रूत्यु मात्र दु:शासनपुत्राबरोबर गदायुद्ध करताना झाला. व्यूहांत अभिमन्यु एकाकी पडण्याचे कारण असे की त्याने मोकळी करून दिलेल्या वाटेने व्यूहात शिरूं पाहणार्‍या सात्यकी, भीम व इतर पांडव वीरांना जयद्रथाने दिवसभर अडवून ठेवले. महाभारतामध्ये याचा खुलासा, &lt;strong&gt;एक दिवस अर्जुन सोडून इतर पांडवांना तू अजिंक्य होशील &lt;/strong&gt;असा शंकराकडून त्याला वर मिळाला होता असा केला आहे. तेव्हां हा जयद्रथाचा दिवस होता असे म्हणावे लागते. मात्र अभिमन्यूच्या वधात त्याचा प्रत्यक्ष सहभाग मुळीच नव्हता. मृत्युमुखीं पडलेल्या अभिमन्यूला त्याने लाथ मारली अशी एक हरदासी कथा आहे पण त्याला महाभारतात आधार मुळीच नाही. एकूण या दिवसाचे लक्ष्य, युधिष्ठिराला पकडणे असे न राहता अभिमन्यूला मारणे हे ठरले व त्यांत मात्र कौरव यशस्वी झाले. त्याची भयंकर किंमत त्याना दुसरे दिवशी मोजावी लागली! &lt;br /&gt;अभिमन्यूच्या मृत्यूबरोबरच या दिवशीचे युद्ध संपले. अर्जुन परत आल्यावर त्याला झालेला प्रकार समजला. अभिमन्यूला संरक्षण न दिल्याबद्दल त्याने सर्व पांडववीरांना दोष दिला. जयद्र्थाने सर्वांना अडवले असे कळल्यावर झाल्या अनर्थाला जयद्रथच व्यक्तिश: जबाबदार आहे असे ठरवून, उद्यां सूर्यास्तापूर्वी जर मी जयद्रथाला मारले नाही तर मी अग्निकाष्टे भक्षण करीन अशी घोर प्रतिज्ञा अर्जुनाने अचानक केली. पांडवपक्षाला ही प्रतिज्ञा अडचणीत टाकणारी होती. अर्जुनाने कृष्णाशी वा इतर पांडववीरांशी सल्लामसलतही केली नाही. रागाच्या भरात केलेल्या या प्रतिज्ञेचे युद्धावर फार निर्णायक परिणाम झाले. याबद्दल पुढील भागात सविस्तर वाचा!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-2970843736031719627?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/2970843736031719627/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=2970843736031719627' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2970843736031719627'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/2970843736031719627'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post_17.html' title='जयद्रथवध भाग - २'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-5284386275486842320</id><published>2008-08-14T19:45:00.000+05:30</published><updated>2008-08-14T19:52:35.820+05:30</updated><title type='text'>जयद्रथवध - भाग १</title><content type='html'>आजपासून नवीन विषयाला सुरवात करीत आहे. जयद्रथवध हे महाभारत युद्धातील एक अतिशय वेधक असे प्रकरण आहे. सर्व अठरा दिवसांच्या युद्धाचे खुलासेवार वर्णन महाभारतात आहे. त्यातील संख्यात्मक अतिशयोक्ति व अद्भुत असे अस्त्रवापराचे वर्णन सोडून दिले तर युद्धहेतु, डावपेच, असेहि बरेच वाचण्यासारखे आहे. जयद्रथवधाच्या दिवशीचे डावपेच, दोन्ही पक्षांच्या प्रमुख योद्ध्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य व कौशल्य, या दिवसाच्या घोर युद्धाचा दोन्ही पक्षांच्या तौलनिक बळांवर झालेला निर्णायक परिणाम, कृष्ण व अर्जुन दोघानीहि अनेक अडचणींवर दिवसभर धैर्याने व युक्तीने मात करून अखेर मिळवलेले यश या सर्वांमुळे हे एक अतिशय रंगतदार युद्धप्रकरण ठरते.&lt;br /&gt;भीष्माच्या आधिपत्याखाली दहा दिवस युद्ध चालले तोवर दोन्ही पक्षांनी थोडाफार संयम राखला होता व अनुचित प्रकार झाले नाहीत. भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला, तसेच दहा दिवस युद्धापासून अलिप्त राहिलेला कर्णहि युद्धात उतरला. त्यानंतर डावपेचांचे युद्ध सुरू झाले! दुर्योधनाच्या सूचनेवरून द्रोणाने युद्धहेतु ठरवला कीं रणात युधिष्ठिराला पकडावयाचे व पुन्हा द्यूत खेळावयास लावून व हरवून वनांत पाठवावयाचे! युद्ध संपवण्याचा कौरवांनी ठरवलेला तो मार्ग होता. द्रोणाने या हेतूसाठी अट घातली की अर्जुनाला दूर ठेवू शकलात तरच हे जमेल, त्याच्या उपस्थितीत नाही! हा बेत साधला तर पांडवाना मारण्याची गरज उरणार नाही हे जाणून द्रोणाने तो मान्य केला असावा. पांडवपक्षाला हा बेत कळल्यामुळे द्रोण जिवंत असेपर्यंतच्या पांच दिवसांच्या युद्धात त्यांनी या बेताचा निकराने प्रतिकार केला. इंद्राकडून कर्णाला मिळालेली अमोघ शक्ति नष्ट होईपर्यंत कृष्णालाहि त्याचा व अर्जुनाचा निर्णायक युद्धप्रसंग टाळावयाचा होता. युधिष्ठिराला पकडण्याच्या बेताचा दुर्योधनाने बराच गाजावाजा केला होता, त्यामुळे आपला शब्द पाळण्याचे द्रोणावरहि दडपण होते.&lt;br /&gt;द्रोणाच्या आधिपत्याखाली पहिल्या दिवशी (युद्धाच्या अकराव्या दिवशी) दोन्ही पक्षांच्या वीरांची घनघोर युद्धे झाली. अर्जुन उपस्थित असल्यामुळे द्रोणाचा बेत सफळ झाला नाही. दिवस अखेर पांडवांचीच सरशी राहिली. द्रोणानी पुन्हा म्हटले कीं अर्जुनाला इतरत्र गुंतवलेत तरच मला काही करतां येईल. तेव्हा त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा व त्याचे भाऊ यानी हे कार्य पत्करले. त्यानी अर्जुनाला अडवण्याची प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे बाराव्या दिवशी सुरवातीलाच त्यानी अर्जुनाला आव्हान दिले. युधिष्ठिराच्या रक्षणाचे काम द्रुपदपुत्र सत्यजित याच्यावर सोपवून अर्जुन त्रिगर्तांकडे वळला. या दिवशी अर्जुनाने अद्भुत पराक्रम करून त्रिगर्त सेनेला धूळ चारली. मात्र इकडे द्रोणापुढे मात्रा न चालून सत्यजित मारला गेला. युधिष्ठिराला धृष्टद्युम्न व इतरानी वाचवले. पाठोपाठ राजा भगदत्ताने पांडवांवर जोराचा हल्ला केला व द्रोण बाजूलाच राहून भगदत्तच पांडवाना भारी पडू लागला तेव्हा त्रिगर्तांचा प्रतिकार मोडून काढून अर्जुन परतला व त्याने भगदत्ताला मारले. दिवसभर निकराचे प्रयत्न करूनहि दुर्योधन-द्रोणांचा बेत सफळ झाला नाही. दुर्योधनाने यासाठी द्रोणाला दोष दिला तेव्हा त्याने पुन्हा तेच म्हटले की अर्जुन असताना काही जमत नाही. त्यामुळे तेराव्या दिवसाचा युद्धबेत पुन्हा तोच ठरला की त्रिगर्तानी अर्जुनाला अडवावयाचे. द्रोणाने आश्वासन दिले की हे जमले तर आज मी पाडवपक्षाच्या एकातरी महान वीराला मारीन. युधिष्ठिराला पकडण्याबद्दल मात्र त्याने काही म्हटले नाही. हा दिवस अभिमन्यूचा व जयद्रथाचा ठरला व अभिमन्यु मारला गेल्यामुळे अर्जुनाने जयद्रथवधाची प्रतिज्ञा केली. त्याबद्दल सविस्तर पुढील भागात वाचा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-5284386275486842320?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/5284386275486842320/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=5284386275486842320' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5284386275486842320'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/5284386275486842320'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post_14.html' title='जयद्रथवध - भाग १'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-7282932004593286034</id><published>2008-08-10T09:48:00.000+05:30</published><updated>2008-08-10T10:02:11.345+05:30</updated><title type='text'>वाचकांस विनंति</title><content type='html'>माझे महाभारतावरील लेखन बरेच लोक आवडीने वाचतात असे दिसते. आपल्या मराठी न जाणणार्‍या मित्रांसाठी मी एक नवीन ब्लॉग इंग्लिश मध्ये सुरू केला आहे. www.mahabharat-newviews.blogspot.com वर तो पहावयास मिळेल. त्यावर पांडवांच्या अज्ञातवासाबद्दल मी लिहिण्यास सुरवात केली आहे. त्याबद्दल आपण आपल्या अ-मराठी मित्रांना माहिती द्यावी ही विनंति. वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर दोन्ही ब्लॉग चालू ठेवणार आहे मात्र इग्लिश ब्लॉगला फारशा भेटी दिल्या गेल्या नाहीत तर एक विषय पुरा करून तो ब्लॉग बंद करण्याचा विचार आहे. इंग्लिश ब्लॉगची माहिती इंग्लिश वाचकांपर्यंत कशी पोचवावी याबद्दल काही सूचना असल्यास जरूर कळवा. (मराठी ब्लॉगविश्व व ब्लॉगवाणी यांचा मला फायदा मिळाला.)या मराठी ब्लॉगवर पुढील पोस्टपासून नवीन विषयाला सुरवात होईल. वाचत रहा!&lt;br /&gt;प्र. के. फडणीस.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-7282932004593286034?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/7282932004593286034/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=7282932004593286034' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7282932004593286034'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/7282932004593286034'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post_09.html' title='वाचकांस विनंति'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-4498604403033893875</id><published>2008-08-05T11:04:00.000+05:30</published><updated>2008-08-05T11:20:52.823+05:30</updated><title type='text'>कृष्णशिष्टाई - भाग ८</title><content type='html'>कौरव दरबारातील सर्व प्रयत्न असफल झाल्यावर पांडवांकडे परत जाण्यापूर्वी कृष्णाने दुसरे दिवशी सकाळी कर्णाची एकांतात भेट घेतली. त्यावेळी त्याने कर्णाला तूं कुंतीपुत्र या नात्याने पांडवांचाच वडील भाऊ आहेस असे सांगितले. त्यांचेविरुद्ध तू दुर्योधनाची बाजू घेणे उचित नाही. पांडव सत्य कळल्यावर तुला वडील भावाचा सर्व सन्मान देतील, तू दुर्योधनाची बाजू सोडलीस तर अजूनहि शम होईल व पांडवाना मिळणार्‍या राज्यभागाचा तूच मालक होशील, द्रौपदी ही सर्व पांडवांची पत्नी या नात्याने तुझीहि पत्नी होईल असे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व जन्म सूतपुत्र म्हणून काढल्यावर आता मला यातून काय मिळणार? दुर्योधनाने मला सर्व सन्मान, वैभव दिले आहे. त्याची बाजू अशी आयत्या वेळी मी सोडली तर ती अर्जुनाला भिऊन, असेच सर्व जग म्हणेल व माझी छीथू होईल. आता वेळ गेली आहे व मला असे करणे मुळीच उचित नाही असे म्हणून कृष्णाच्या सूचनेला त्याने स्पष्ट नकार दिला. तेव्हा कृष्णाने नाइलाज होऊन त्याचेजवळ दुर्योधनाला निरोप दिला की आजपासून सात दिवसानी कार्तिक अमावास्या आहे त्या दिवशी कुरुक्षेत्रावर आपली रणांगणावर गाठ पडू द्या. त्यानंतर कृष्ण रथात बसून सरळ उपप्लव्याला पांडवांकडे गेला.दुसरी महत्वाची घटना म्हणजे कृष्ण परत गेला व अमावास्येला युद्ध सुरू करण्याचे ठरले असे कळल्यावर खुद्द कुंतीने भल्या सकाळी सूर्याला अर्घ्य देत असताना कर्णाला गाठून ’तू माझाच पुत्र आहेस व पांडवांचा वडील भाऊ आहेस तेव्हा त्यांच्या विरुद्ध जाऊ नको असे विनवले. कर्णाने तिलाही स्पष्ट नकारच दिला. फक्त एकच गोष्ट कबूल केली कीं ’मी अर्जुन सोडून इतर चारांशी लढताना त्यांचा वध करणार नाही. माझे व अर्जुनाचे युद्ध मात्र अटळ आहे व आमच्यापैकी कोणीहि एक जगला तरी तुझे पांच पुत्र जिवंत राहतील.’ कुंतीला एवढ्याच आश्वासनावर समाधान मानावे लागले.या दोन घटनांमध्ये कर्णाचे वर्तन धीरोदात्त झाले असे म्हणावे लागते. कृष्ण वा कुंती दोघानीहि कर्णाचा खरा पिता कोण हे सांगितले नाही. सूर्यापासून जन्म याचेवर श्रद्धा असेल तर प्रश्न उरत नाही पण सर्व कथा माणसांची आहे व माणसापासूनच सर्वांचे जन्म आहेत हे मान्य केले तर हा प्रश्न उरतो. कर्णाचा खरा पिता ब्राह्मण वा क्षत्रिय असता तर ते यावेळी सांगावयास प्रत्यवाय नव्हता. त्यामुळे माझ्यामते कर्ण हा (बहुधा) खरोखर सूतपुत्रच असावा! याबद्दल मी कर्णावर लेखन करीन तेव्हा जास्त विस्ताराने लिहिणार आहे. दुसरी नवलाची गोष्ट म्हणजे कर्ण हा कुंतीपुत्र आहे हे कृष्णाला कसे माहीत होते? तो देवाचा अवतार तेव्हा त्याला सर्वच ज्ञात असे मानले तर प्रश्न उरत नाही! पण तो मानवच असे मानणारांसाठी शंका उरते! माझे मते शिष्टाई असफल होऊन कृष्ण विदुराकडे परत आला व कुंतीला भेटून तिला सर्व हकीगत सांगितली तेव्हा पुत्रस्नेहाने कुंतीनेच आपले एवढा दीर्घकाळ जपलेले गुपित स्वत:च कृष्णाला सांगून ’तू हे कर्णाला सांग व त्याला वळवण्याचा अखेरचा प्रयत्न कर’ असे म्हटले असले पाहिजे. तो प्रयत्नहि असफळ झाला व युद्ध होणार हे कळल्यावर मात्र सर्व भीडभाड बाजूला ठेवून तिने स्वत:च कर्णाला भेटून व त्याचे जन्मरहस्य स्वमुखाने सांगून अखेरची विनवणी केली. तीहि असफळ झाली ते एकप्रकारे अटळच होते.अशा प्रकारे सर्व प्रयत्न संपून अखेर कौरव-पांडवाची गाठ नियतीने ठरवल्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर पडली. कृष्णशिष्टाईची कथा येथे संपली. या प्रकरणामध्ये कॄष्णाचे मानवी पातळीवरील सर्व अलौकिक गुण प्रगट झालेले दिसून येतात. त्याला अवतार मानण्याची मला त्यामुळेच गरज वाटत नाही! तो एक थोर व आदर्श मानव म्हणूनच आपल्याला प्रिय व्हावा हेच योग्य.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-4498604403033893875?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/4498604403033893875/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=4498604403033893875' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4498604403033893875'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4498604403033893875'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post_04.html' title='कृष्णशिष्टाई - भाग ८'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-4257301511747845701</id><published>2008-08-03T22:09:00.000+05:30</published><updated>2008-08-03T22:23:22.705+05:30</updated><title type='text'>कृष्णशिष्टाई - भाग ७</title><content type='html'>दुर्योधनाच्या या जबाबानंतर कृष्णाचाहि तोल सुटला व त्याने रागारागाने त्याला त्याच्या सर्व कुटिल कृत्यांची यादी ऐकविली व ’तुझे मातापिता व सर्व हितकर्ते तुला शम करावयास सांगत असून तू शम करूं इच्छित नाहीस तर मग तुला हवी असलेली वीरगति तुला लवकरच मिळेल’ अशी तंबी दिली. दु:शासन त्यावर दुर्योधनाला म्हणाला कीं ’तूं सख्य न करशील तर तूं, मी व कर्ण यांना बांधून भीष्म, द्रोण व धृतराष्ट्र पांडवांचे स्वाधीन करतील असा रंग दिसतो आहे.’ यावर क्रुद्ध होऊन दुर्योधन व त्याचे समर्थक सभा सोडून गेले. भीष्म यावर कृष्णाला म्हणाला कीं हे सर्व लोक कालवश झालेले दिसतात. हें ऐकून, क्रुद्ध होऊन, कृष्ण भीष्मद्रोणांचीहि निंदा करून म्हणाला कीं &lt;strong&gt;&lt;span style="color:#660000;"&gt;दुर्योधनाला तुम्ही थोपवत नाही हा तुम्हा कुरुवृद्धांचा अपराध आहे. आम्ही यादवानी जुलमी कंसाला मारून, उग्रसेनाला पुन्हा सत्तेवर आणले, आता आम्ही सर्व यादव सुखात आहोत. कुळाच्या हितासाठी (कु)पुत्राचा त्याग करणेच योग्य होय.&lt;/span&gt;&lt;/strong&gt; यावर धृतराष्ट्राने विदुराकरवी दुर्योधनाला परत बोलावले व गांधारीकडून त्याला उपदेश करविला. तिने सांगितले की ’परस्परांतील भेदाला भिऊनच भीष्म, युझा पिता व बाल्हीक यानी पांडवाना राज्यभाग दिला होता. तुला अर्धे राज्य पुरेसे आहे. मूर्खा, तुला दिसत नाही का की भीष्म, द्रोण व कृप सर्व शक्तीनिशी तुझ्यातर्फे लढणार नाहीत? तुझा व पांडवांचा राज्यावर सारखाच हक्क आहे हे ते जाणतात.’&lt;br /&gt;पालथ्या घड्यावर पाणी पडून, उलट, दुर्योधनाने शकुनीबरोबर कॄष्णालाच पकडण्याची चर्चा चालवली! ते लक्षांत येताच सात्यकी व कृतवर्मा बाहेर गेले व त्यानी सैन्य सज्ज केले. सात्यकीने परत येऊन कृष्णालाहि सावध केले. कृष्णाने धृतराष्ट्राला म्हटले की दुर्योधनाला खुशाल मला पकडण्याचा प्रयत्न करूं दे!. धृतराष्ट्राने पुन्हा दुर्योधनाला बोलावून उपदेश केला कीं हे बरे नाही. कृष्णाने त्याला सरळ दम दिला कीं तूं मला पकडण्य़ाचा प्रयत्न करच व मग माझा प्रताप पहा! &lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#990000;"&gt;कृष्णाने यावेळी विश्वरूप दर्शन दाखवले काय? हा श्रद्धेचा भाग आहे. महाभारत तसे म्हणते.  माझ्या मते त्याची आवश्यकताच नव्हती.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt; सात्यकी, कृतवर्मा यांची तयारी व कृष्णाचा आविर्भाव पाहून दुर्योधनाला वेळीच भान आले की आपला बेत तर सफळ होणार नाहीच पण उलट कृष्ण उघडच पांडवांच्या वतीने युद्धाला उभा रहावयास मोकळा होईल. बलरामहि मग त्याला थांबवू शकणार नाही. हे जाणून त्याने आपला बेत सोडून दिला.&lt;br /&gt;धृतराष्ट्राने कृष्णापाशी सरळच कबूल केले कीं माझी दुर्योधनावर सत्ता चालत नाही. यावर बोलण्यासारखे काही न उरल्यामुळे कृष्णाने भीष्म-द्रोणाना म्हटले की धृतराष्ट्र काय म्हणाला ते तुम्ही ऐकले आहे. आता मी तुमचा निरोप घेऊन परत जातो. माझे प्रयत्न हरले. त्यानंतर सात्यकी व कृतवर्मा यांच्यासह बाहेर पडून तो कुंतीकडे गेला.&lt;br /&gt;कृष्णशिष्टाई अशा प्रकारे असफळ झाली. मात्र पांडवांचा व कृष्णाचा आपणावर बोल येऊ नये हा उद्देश सफळ झाला.&lt;br /&gt;यानंतर प्रत्यक्ष युद्धापूर्वी दोन महत्वाच्या घटना घडल्या त्यांबद्दल पुढील भागात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7745709347552224158-4257301511747845701?l=mymahabharat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mymahabharat.blogspot.com/feeds/4257301511747845701/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7745709347552224158&amp;postID=4257301511747845701' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4257301511747845701'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7745709347552224158/posts/default/4257301511747845701'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post.html' title='कृष्णशिष्टाई - भाग ७'/><author><name>प्रभाकर फडणीस P.K. Phadnis</name><uri>http://www.blogger.com/profile/08871811819546376901</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='28' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_2nAgpGtnRnU/S1dRL8Pdd7I/AAAAAAAAC20/_0N2wNy5glg/S220/PKP.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-2717215360496192873</id><published>2008-07-28T19:08:00.000+05:30</published><updated>2008-07-28T19:15:47.568+05:30</updated><title type='text'>कृष्णशिष्टाई - भाग ६</title><content type='html'>दुसरे दिवशी कृष्ण कौरवदरबारात उपस्थित झाला. त्याचे यथोचित स्वागत झाले. शिष्टाई ऐकण्यासाठी थोर ऋषि आले होते. त्यांना उचित आसनावर बसविल्यावर मग सभा सुरू झाली. कृष्णाशेजारीं सात्यकी व कृतवर्मा बसले होते. कृष्णाने आपले मुद्देसूद भाषण दुर्योधनाकडे दुर्लक्ष करून, खुद्द धृतराष्ट्रालाच उद्देशून केले. त्याने मुख्य मुद्दे माडले ते असे,&lt;br /&gt;१.      क्षत्रिय वीरांचा व सैन्याचा संहार व सर्वनाश न होतां कौरवपांडवांचा शम व्हावा हेच चांगले.&lt;br /&gt;२.      तुमच्या थोर कुळात तूं निमित्त होऊन कुलक्षय होऊं नये.&lt;br /&gt;३.      शम करणे तुझ्या हातात आहे. तूं कौरवाना आवरलेस तर पांडवाना मी आवरीन.&lt;br /&gt;४.     शम केलास तर पांडव व त्यांचे सर्व समर्थक – आम्ही यादवही – तुझ्या आधीन होतील. ते सर्व व तुझे सध्याचे समर्थक मिळून तूं अजिक्य सम्राट होशील.&lt;br /&gt;५.     युद्ध झाले तर दोन्ही पक्षांचा प्रचंड संहार होईल. त्यांत तुला काय आनंद?&lt;br /&gt;६.      पांडवांची तुला विनंति आहे की आम्ही द्यूताच्या अटी पाळल्या व तूही त्या पाळशील असा विश्वास बाळगला. वडील या नात्याने तूंच आता आमचे रक्षण कर व ठेव म्हणून तुजपाशी ठेवलेले आमचे राज्य आता आम्हाला परत दे.&lt;br /&gt;७.    सभेलाही पांडवांची विनंति आहे की येथे धर्मज्ञ सभासद उपस्थित असताना  अनुचित गोष्ट वा अन्याय होऊ नये.&lt;br /&gt;८.     तुझ्या पुत्रांचा लोभ अनावर झाला आहे. त्यांना तूच आवर.&lt;br /&gt;९.      पांडव तुझ्या सेवेला तत्पर आहेत तसेच युद्धालाहि तयार आहेत. उचित काय ते तूंच ठरव.&lt;br /&gt;         हे भाषण अत्यंत मुद्देसूद आहे. पांडवांचा दावा स्पष्ट्पणे मांडून युद्ध झालेच तर त्याची जबाबदारी तुमचीच आहे असे बजावले आहे. दुसर्‍या महायुद्धाचे वेळी युद्ध करणारी दोन्ही राष्ट्रे एकमेकांकडे वकील पाठवून आमच्या मागण्या मान्य न केल्यात तर होणार्‍या युद्धाला जबाबदार तुम्हीच असे बजावत असत त्याची आठवण येते! लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे &lt;strong&gt;&lt;span style="color:#660000;"&gt;पांडवांनी द्यूताच्या अटी पूर्ण केल्या आहेत&lt;/span&gt;&lt;/strong&gt; असे कृष्ण स्वत: बजावून सांगत नाही! पांडवांचा तुला तसा निरोप आहे असे म्हणतो. पांडवांच्या दाव्यातील कच्चेपणा जाणवत असल्यामुळे त्यावर कमीतकमी भर दिलेला आहे!&lt;br /&gt;      यानंतर सभेमध्ये भाषण करून परशुरामाने सांगितले कीं अर्जुन व कॄष्ण हे नर-नारायणांचे अवतार आहेत, त्यांचेविरुद्ध तुम्ही जिंकू शकणार नाही. कण्वमुनीनेहि त्याला दुजोरा दिला. दुर्योधनाने त्यांच्या भाषणाची ’वटवट’ अशी वासलात लावली! व्यास, भीष्म, नारद यानीहि नानाप्रकारे समझावले. त्यांतल्या कोणीहि, &lt;strong&gt;&lt;span style="color:#660000;"&gt;पांडवांनी द्यूताच्या अटी पूर्ण केल्या आहेत त्यामुळे त्याना राज्य दिले पाहिजे&lt;/span&gt;&lt;/strong&gt; असे म्हटले नाही! तूं जिंकू शकत नाहीस व सर्वनाश होईल म्हणून शम कर एवढेच म्हटले! मुख्य प्रष्नाला सर्वानीच बगल दिली. धृतराष्ट्राने अखेर दुर्योधनाला समजावण्याची आपली असमर्थता व्यक्त करून कृष्णाला म्हटले कीं तूंच त्याला समजाव. कृष्णाने नानाप्रकारे पांडवाची थोरवी सांगून व दु:शासन, कर्ण यांची निंदा करून समजावले. त्यानंतर पुन्हा भीष्म-द्रोणानी पुन्हापुन्हा सांगितले की युद्ध सुरू होण्यापूर्वीच शम करा. इतक्या सर्वांनी केलेले अप्रिय भाषण एवढावेळ मुकाट्याने ऐकून घेणार्‍या दुर्योधनाने अखेर कृष्णाला आपला मुद्देसूद जबाब ऐकवला. तो असा :-&lt;br /&gt;१.      तुम्ही सर्वांनी माझी निंदा करण्याचे मला काही कारण दिसत नाही.&lt;br /&gt;२.     पांडव स्वखुशीने द्यूत खेळले व सर्व राज्य व वैभव हरले, त
