आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Saturday, April 5, 2008

पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग 4

कौरवांकडून पांडवांचा शोध :-
वनवासाचीं बारा वर्षे पुरी होऊन पांडव अद्न्यातवासात गेल्यावर त्यांचा शोध करण्यासाठी कौरवांनी पुष्कळ हुशार माणसे सर्व दिशाना पाठवली होती. पांडवांचा शोध लागला असता तर द्यूताच्या अटीप्रमाणे त्याना पुन्हा बारा वर्षे वनवासाला जावे लागले असते! मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. कीचकाचा वध झाला त्यापाठोपाठच ते सेवक हस्तिनापुराला हात हलवीत परत आले होते. कीचकवध होऊन किती दिवस लोटले होते ते स्पष्ट सांगितलेले नाही. त्यामुळे भीमाने उल्लेखिलेल्या दीड महिन्याच्या काळापैकी किती दिवस शिल्लक होते? कौरवदरबारात भीष्मद्रोणांसमक्ष याची चर्चा झाली. ’अद्न्यातवासाचा थोडाच काळ शिल्लक उरला’ असे म्हटले गेले. मात्र २-३दिवस उरले असे कोणी म्हटले नाही. घबराट उडाली नाही. सेवकाना पुन्हा शोधासाठी पाठवले गेले. भीष्मानी त्याना खुलासेवार सूचना दिल्या व विषय संपला! त्रिगर्तांचा राजा सुशर्मा, दुर्योधनाचा मित्र, दरबारात उपस्थित होता त्याने कीचक मारला गेल्याच्या बातमीला दुजोरा देऊन सुचवले की राजा विराट आता दुर्बळ बनला आहे तेव्हा त्याचे गोधन लुटून आणण्याची संधी आली आहे. तेव्हा आपण दोन्ही दिशांनी हल्ला करावा. त्याची सूचना मान्य होऊन दुसऱ्याच दिवशी हल्ला करावयाचे ठरले. यावरून असे दिसते की कौरवाना अद्याप पांडवांच्या शोधाची निकड भासत नव्हती. अजून वेळ होता! भीष्मानेही पांडव सौरमानाने तेरा वर्षे पुरी करण्याची शक्यता विचारात घेऊन, त्याचे गणित करून, प्रकरण २-३ दिवसांवर आले आहे असे म्हटले नाही. चांद्रमानाने तेरा वर्षे, द्यूताच्या तिथि/मासाची तेरा आवर्तने, हीच मर्यादा सर्वांच्या नजरेसमोर होती असे स्पष्ट दिसते. विराटावरच्या स्वारीत भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, कृप सारेच नि:शंकपणे सामील झाले. तेथे अर्जुनाशी लढावे लागणार आहे याची कोणी कल्पनाहि केली नव्हती!
त्रिगर्त - विराट युद्ध -
दुसऱ्याच दिवशी सुशर्म्याने दक्षिण दिशेने विराटावर स्वारी केली. या दिवसाच्या तिथीचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. युद्ध वर्णनात म्हटले आहे कीं सूर्यास्तानंतर बऱ्याच वेळाने चंद्रोदय होऊन प्रकाश पडला. यावरून ही कृष्णपक्षाची सप्तमी-अष्टमी ठरते. पुढे दुर्योधनाचे तोंडी स्पष्ट उल्लेखच आहे कीं त्रिगर्तांनी सप्तमीला दुपारी हल्ला करण्याचे ठरले होते. विराटाचे बाजूने अर्जुन सोडून इतर चारहि पांडव युद्धात उतरले. मात्र युधिष्टिराने भीमाला सूचना दिली की ’इतर वीरांप्रमाणेच लढ, तुझ्या खास पद्धतीप्रमाणे झाड उपटून लढू नको नाहीतर ओळखला जाशील.’ ओळखणे टाळता आले तर तेरा चांद्रवर्षे पुरी करावीत असा युधिष्ठिराचा विचार असावा. पांडवांच्या मदतीने विराटाने त्रिगर्ताचा सपशेल पराभव केला व गायी सोडवून सर्वजण राजधानीला सकाळी परत आले. त्या आधीच, सकाळीच कौरवांचा उत्तरेकडून हल्ला आल्यामुळे, राजपुत्र उत्तर व बृहन्नडा वेषातील अर्जुन त्यांच्याशी लढायला निघून गेले होते. ती हकीगत पुढील भागात पाहू.

4 comments:

प्रशांत said...

विचार करायला लावणारं असं तुम्ही महाभारतावरील लेखन केलं आहे. महाभारतातील इतर गोष्टींवरही आपण यथावकाश लिहाल अशी आशा आहे.
-प्रशांत

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

धन्यवाद. वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर जरूर लिहीन. आपण पुढील लेखन पाहात रहा व आपल्या मित्रांनाहि सांगा ही विनंति.

sourabh said...

very nice...

can u post somthing more about "Karan"

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

Yes I will. In due course. Thanks for your interest