आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Sunday, July 3, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग २

‘दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्’
कर्णाच्या तोंडचे हे वाक्य फार प्रसिद्ध आहे. उत्तम कुलात जन्म न लाभलेल्या पण असाधारण कर्तबगारी अंगी असलेल्या अनेक व्यक्तीना या वाक्याने स्फूर्ती दिली असेल. ही उक्ती महाभारतात असणार अशी आपली ठाम समजूत असते. मात्र महाभारतात शोधू गेले असता हे वाक्य सापडत नाहीं!
हे महाभारतातील वचन नाहीच मग सापडणार कसे? ‘वेणीसंहार’ नावाच्या संस्कृत नाटकात कर्ण आणि अश्वत्थामा यांच्या कलहाचा एक जोरदार प्रवेश आहे. त्यात अश्व्त्थाम्याने कर्णाला सूतपुत्र म्हणून हिणवल्यावर कर्णाने त्याला हे प्रत्युत्तर दिले आहे. पूर्ण श्लोक असा आहे –
सूतोSवा सूतपुत्रोSवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्तम् कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ||

2 comments:

Panchtarankit said...

तुम्ही मांडत असलेले विचार स्तुत्य आहे.ह्यातून महाभारत नव्या अर्थाने आमच्या समोर उलघडत आहे.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

धन्यवाद. आज जवळपास एक वर्षानंतर आपण माझ्या या जुन्या पोस्टवर विचार व्यक्त करत आहात. अजूनहि माझा ब्लॉग वाचला जातो आहे हे पाहून फार आनंद झाला.