आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Saturday, March 7, 2015

कर्णाचा रथ चिखलात कां रुतला?


भारतीय युद्धामध्ये दोन्ही पक्षांकडून अनेक रथी-महारथी लढले. सतराव्या दिवसापर्यंत कोणाच्याही रथाचे चाक चिखलात रुतले नाही. सतराव्या दिवशी संध्याकाळी कर्णाच्या रथाचे चाक चिखलात रुतले. त्यानंतर अर्जुनाने त्याचा वध केला. कृष्णाने शिष्टाईच्या दिवशी परत जाताना कर्णाला म्हटले होते कीं आता पावसाळा संपला आहे, चिखलाचे नावहि नाही तेव्हा युद्धाला अनुकूल काळ आहे. प्रत्यक्षातहि कर्णाच्या एका अपवादाव्यतिरिक्त कृष्णाचे म्हणणे खरेच ठरले. कर्णाचा रथ कां रुतला या बद्दल माझा तर्क असा – अर्जुनाचे सारथ्य कृष्ण करत होता तर कर्णाचे, शल्य. कृष्ण अर्जुनाचा रथ नेहमीच अतिशय कौशल्याने चालवत होता. उदा. जयद्रथवधाचे दिवशी, अर्जुन द्रोणाचार्याशी लढत न बसतां पुढे निघून गेला. दुर्योधनाने द्रोणाला विचारले कीं असे कसे झाले? द्रोणाने म्हटले कीं कृष्ण रथ एवढ्या जोराने चालवतो कीं तो जाऊं लागल्यावर माझे बाणच त्याचेपर्यंत पोचेनात! असे इतरहि उल्लेख आहेत. शल्याचे कौशल्य कदाचित तुलनेने कमी पडत होते. दोन दिवस कर्ण-अर्जुन दोघांचे रथयुद्ध चालू होते. शत्रूला आपल्या रथाच्या अनुकूल बाजूला घेण्यासाठी दोन्ही सारथ्यांच्या आपल्या रथाच्या विशिष्ट हालचाली, डाव, प्रतिडाव चालले असणार. कृष्णाने हळूहळू शल्याला कुरुक्षेत्रातील उताराच्या, पाणथळ भागाकडे खेचले व त्याची हालचालींची जागा (maneuvering space) कमी करत आणली, अखेर चिखलभागापासून शल्य दूर राहू शकला नाही. व कर्णाच्या रथाचे चाक रुतले! कृष्णाच्या सारथ्यकौशल्याचा हा परिणाम होता. कृष्णाला दैवी गुण चिकटवणे मला मुळीच मान्य नाही. पण त्याच्या सारथ्यकौशल्याला दाद देणे योग्यच आहे.

6 comments:

Anonymous said...

vi4 karnyasarkhe c ahe..........ajun khup khup liha mahabhartabddle.....specialy i m interesed in karna

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

कर्णाबद्दल याच ब्लॉगवर मी खूप विस्ताराने लिहिले आहे. ते आपण पाहिलेले दिसत नाही.

Rupali Sandeep Thombare said...

very good.Mala asha navya goshti, nave vichar vachayla nehmich avadte.keep it up.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

धन्यवाद. महाभारतावर या ब्लॉगमध्ये मी अनेक विषयांवर विस्ताराने लिहिले आहे. आपण जरूर वाचा.

Unknown said...

भगवान श्रीकृष्ण यांना दैवी गुण चिकटवणे योग्य नाही असं तुम्हाला का वावाटतं याच पुर्ण स्पष्टीकरण द्या.

जगामध्ये एवढे तत्वज्ञानी होऊन गेले ते का उगाच भगवान श्रीकृष्ण यांना परमात्मा मानीत नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे देदेव आहेत ते परमात्मा आहेत हे सत्य आहे आणि हे कधीही नाकारता येणार नाही.

तुम्ही तुमचे व्यक्तीगत मत मांडले असले तरी भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत. भगवंतावर म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांबद्दल काहीही वक्तव्य करताना इतरांच्या भाभावना दुखावल्या जाणार नाहीत याचा विचार करावा ही विनंती.

जय श्री कृष्ण

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे |
हरे राम हरे राम राम राम हरे हरे | |

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

तुमची मते मांडण्यासाठी तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरू करा. माझ्या ब्लॉगवर लिहिण्यासाठी मी स्वतंत्र आहे.