आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Wednesday, July 9, 2008

देवयानीची कथा - भाग २

देवयानीच्या कथेचा उत्तरार्ध म्हणजे देवयानी, ययाति व शर्मिष्ठा यांची त्रिकोणी प्रेमकथा. ययाति कादम्बरी व ययाति-देवयानी हे नाटक यामुळे ही कथाही मराठी वाचकांना सुपरिचित आहे. देवयानीचा हट्टी, आग्रही व पोरकट स्वभाव या कथेत स्पष्ट दिसतो. शर्मिष्ठेने केलेल्या आपल्या व आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिला स्वत:ची दासी व्हावयास लावले तरी ती देवयानीची मैत्रीणच राहिली. तिच्यावरचा राग फार टिकला नाही. तिला देवयानीने प्रत्यक्षात दासी म्हणून वागवले नाही. देवयानीचा ययातीशी विवाह झाल्यावर शर्मिष्ठा तिच्याबरोबरच गेली. काही काळाने शर्मिष्ठेने स्वत:च ययातीला वश करून घेतले हे खरे पण असा काही प्रकार होऊ घातला आहे याची देवयानीला कल्पनाच नव्हती. ती बेसावधच होती. शर्मिष्ठेला तीन पुत्र झाले तरी देवयानीला पत्ताच नव्हता! शर्मिष्ठेला पहिला पुत्र झाला तेव्हा ऋषीपासून मला पुत्र झाला असे तिने सांगितले व देवयानीने ते खरे मानले. ती स्वत:च्या सुखोपभोगात दंग होती व निष्काळजी राहिली किंवा तिने कळूनसवरून काणाडोळा केला! शर्मिष्टेचा विवाह होणार नव्हता पण पतिसुखापासून तिला पूर्णपणे वंचित ठेवण्याएवढा तिचा अपराध घोर नव्हता याची जाणीव असल्यामुळे कदाचित दुर्ल्क्ष केले असावे. सत्य सामोरे आल्यावर तिने शुक्राचार्याकडे धाव घेतली पन तक्रार काय केली तर शर्मिष्ठेला तीन पुत्र आणि मला मात्र दोनच! शुक्राचार्याने ययातीला शिक्षा केली पण शर्मिष्ठेला वा तिच्या पुत्रांना शिक्षा केली नाही. ययातीचे शुक्राचार्याच्या शापामुळे आलेले वार्धक्य शर्मिष्ठेच्याच पुत्राने पत्करले व ययातीनंतर तो पुत्र पुरु हाच राजा होऊन त्याचा वंश पौरव या नावावे प्रख्यात झाला. दुष्यंत व भरत हे पौरव वंशाचे. शुक्राचार्याच्या शापामुळे आलेले वार्धक्य पुत्राला घेण्यास सांगताना माझी कामसुखाची आसक्ति अद्याप संपलेली नाही असे म्हणताना ययातीने देवयानीबरोबरच शर्मिष्ठेचाही उल्लेख केला. देवयानी वा शुक्राचार्य यांनी त्याला आक्षेप घेतला नाही हे नवलच. सर्वांनी जणू शर्मिष्ठेचे पत्नीपद मान्यच केले! यापुढील ययातीची कथा एक उत्कृष्ठ बोधकथा आहे व ययाति कादंबरी व महाभारत दोन्हीकडे सारखीच आहे.
शकुंतला व देवयानी यांच्या कथा स्वभावचित्रण, काव्यमयता व तत्वविचार या तिन्ही अंगानी परिपूर्ण व रमणीय आहेत व अनेक साहित्यकृतीना जन्म देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. कवि वा नाटककार थोडेफार कल्पनास्वातंत्र्य घेणारच. मात्र मूळ महाभारतातील कथाही खूपच वेधक आहेत त्या वेधकतेचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी केला आहे.

No comments: