आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Saturday, January 3, 2009

विराम

प्रिय वाचक,
या ब्लॉगवर महाभारतातील काही विषयांवर मी लेखन केले ते आपणास साधारणपणे पसंत पडले असे दिसले. माझ्या मनात असलेले सर्व विषय पुरे झालेले असल्यामुळे या ब्लॉगवरील लेखन मी (सध्यातरी) थांबवत आहे. पुढे कधी काही नवीन सुचले तर पुन्हा लिहीन. आपल्या प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
अशाच प्रकारचे काही लेखन रामायणावर करण्याचा विचार आहे व त्यासाठी नवीन ब्लॉग लवकरच सुरू करणार आहे. आपण वाचाल अशी आशा आहे. ब्लॉग सुरू झाला की ’मराठी ब्लॉग विश्व’ वर दिसेलच
प्र. के. फडणीस.

2 comments:

यशोधरा said...

खूप छान लिहित होतात काका. महाभारतासंबंधित लेखनाला विराम दिलात, त्याचं थोडसं वाईट वाटलं खरं, पण त्याच वेळी रामायणावर लिहिणार आहात हे कळल्यामुळे आनंदही झालाय. :) लवकर लिहा, वाट बघते आहे.

माझ्या मते रामायण आणि महाभारत ह्या दोन कलाकृती एकमेकांपासून सर्वस्वाने भिन्न आहेत. रामायण हे आदर्शांवर आधारीत आहे, तर महाभारत हे मनोवृत्तींवर. आपल्याला काय वाटतं हे पण एका पोस्टमधे लिहिलंत, तर वाचायला खूप आवडेल. लिहाल का?

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

रामायणावर ब्लॉग सुरू केला आहे. आपणासारख्या अनेक वाचकांचे स्वागत आहे. प्रतिक्रियाही हव्यातच. www.myramayan.blogspot.com पहा. धन्यवाद